AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाहनांच्या विमा नियमात होणार बदल, सरकार उचलणार हे कठोर पाऊल

वाढते वाहन अपघात आणि वाहनांचा विमा न काढण्याच्या प्रवृत्तीमुळे अपघातग्रस्तांना आर्थिक मदत मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे सरकार नविन धोरण आणणार आहे.

वाहनांच्या विमा नियमात होणार बदल, सरकार उचलणार हे कठोर पाऊल
traffic-03Image Credit source: socialmedia
| Updated on: Mar 01, 2023 | 10:15 AM
Share

नवी दिल्ली : जर तुम्ही तुमच्या वाहनाचा विमा काढला नसेल तर ट्रॅफीक पोलिसांनी तु्म्हाला पकडताच तुमच्या वाहनाचा विमा जागच्या जागी काढण्याचा नियम आणण्याच्या विचारात सरकार आहे. सरकरच्या आकडेवारीनूसार देशात ४० ते ५० टक्के वाहनांचा विमा काढलेला नसल्याने अपघातातील जखमींना नुकसान भरपाई मिळत नसल्याने सरकारने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे तुमच्याकडील वाहनाचा जर विमा उतरला नसेल तर लवकर विमा उतरवा लागेल, अन्यथा सरकार ऑन द स्पॉट विमा उतरविणार आहे.

देशातील पन्नास टक्क्याहून अधिक वाहनांचा विमा काढलेला नसतो, त्यामुळे एखादा अपघात घडल्यास जखमीला उपचारासाठी आर्थिक मदत मिळत नाही. त्यामुळे सरकारने आता नवीन तंत्रज्ञान आणण्याचा निर्णय घेतला आहे. नियमानूसार वाहनांचा थर्ड पार्टी विमा काढलेला असणे गरजेचे आहे. परंतू अनेक जण आपल्या वाहनांचा विमा काढत नाहीत. त्यामुळे सरकार वाहनांच्या विमा धोरणात बदल करणार आहे. सरकार आता नविन विमा नियमानूसार पोलीस आणि परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी एक अशाप्रकारचे मोबाईल एप विकसित करीत आहे की त्याच्या मदतीने हे शक्य होणार आहे. रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाच्या वाहन एपच्या मदतीने पकडलेल्या वाहनांची संपूर्ण माहीती आता मिळणे सोपे होणार आहे. त्यामुळे जर वाहन चालकाने त्या वाहनाचा विमा काढला नसेल तर वाहनमालकाला विमा खरेदी करण्यासाठी आग्रह केला जाईल. जागच्या जागी अशा वाहनाचा विमा काढला जाईल असे म्हटले जात आहे.

काय असणार प्रक्रिया …..

या प्रक्रीयेत वाहन विमा नसलेल्या चालकांना या विमा पॉलीसीचा हप्ता भरण्यासाठी बॅंकासह विमा कंपन्यांनाही फास्टॅग प्लॅटफॉर्मवर एकत्र आणले जाईल. त्यामुळे फास्टॅगमधून तुमच्या विम्याचा हप्ता कापण्याची योजना आहे. जनरल इंश्योरन्स काऊन्सिलच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनूसार या बैठकीत तत्काळ विमा काढण्याच्या योजनेवरही चर्चा झाली. यासंदर्भात नेमके काय नियम आणि अटी ठरवायच्या यावर १७ मार्च रोजी बैठकी निर्णय घेतला जाणार आहे.

किती असतो थर्ड पार्टी विमा…

थर्ड पार्टी विम्यासाठीचा हप्ता वाहनाचा आकार आणि वयोमानानूसार ठरत असतो. १००० सीसी प्रवासी वाहनासाठी २०७२ रूपये, १०००-१५०० सीसी वाहनासाठी ३,२२१ रूपये आणि १५०० सीसी इंजिनासाठी ७,८९० रूपये विमा हप्ता आहे. विमा नियामक संस्था इरडाने विमा कंपन्यांना जप्त वाहनांसाठी अस्थायी किंवा अल्पकालिन मोटर विमा जारी करण्यासाठी परवानगी दिली आहे.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.