AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Interest Rate Cut : काय म्हणता, कर्ज खरंच होणार स्वस्त, महागड्या ईएमआयची संपणार झंझट

Interest Rate Cut : कर्जदारांना आणि कर्ज घेणाऱ्यांना एकाच वेळी मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. महागड्या ईएमआयचा ताप कमी होण्याची शक्यता आहे. पण यामागच्या चर्चा तरी काय आहे.

Interest Rate Cut : काय म्हणता, कर्ज खरंच होणार स्वस्त, महागड्या ईएमआयची संपणार झंझट
| Updated on: May 17, 2023 | 5:47 PM
Share

नवी दिल्ली : कर्जदारांना आणि कर्ज घेणाऱ्यांना एकाच वेळी मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. महागड्या ईएमआयचा (EMI) ताप कमी होण्याची शक्यतेने जोर धरला आहे. अर्थात याविषयीची अधिकृत घोषणा केंद्रीय रिझर्व्ह बँकेने (RBI) केलेली नाही. गेल्या वर्षभरापासून कर्जदारांवर वाढत्या ईएमआयचा सातत्याने मारा सुरु होता. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात रेपो दर (Repo Rate) 4 टक्के होता. सध्या रेपो दर 6.50 टक्क्यांवर पोहचला आहे. अर्थात आरबीआयच्या या धोरणांचा सामान्य ग्राहकांना आणि कर्जदारांना मोठा फटका बसला आहे. मग आताच ईएमआय कमी होण्याच्या चर्चांना फोडणी का देण्यात येत आहे.

काय आहे कारण गेल्या चार दिवसांपासून किरकोळ आणि घाऊक महागाईच्या आकड्यांनी दिलासा दिला आहे. किरकोळ महागाई दर 18 महिन्यांच्या निच्चांकी स्तरावर 4.70 टक्क्यांवर पोहचला. तर एक वर्षांपूर्वी हा दर 7.79 टक्के होता. तर घाऊक महागाई दर गेल्या 3 वर्षांत उणे झाला आहे. हा दर सर्वात निच्चांकीस्तरावर -0.92 टक्के इथपर्यंत घसरला.

इतका वाढला कर्जाचा बोजा समजा एखाद्याने 8.75 टक्के व्याजदराने 25 लाख रुपयांचे 15 वर्षांसाठी गृहकर्ज घेतले आहे. ग्राहकाला दरमहा 24,986 रुपये ईएमआय जमा करावा लागेल. 19,97,518 इतके व्याज चुकते करावे लागेल. पण जर ग्राहकाने 25 वर्षांसाठी कर्ज घेतले तर मासिक हप्ता 20,554 रुपये होईल. पण त्यावर 36,66,076 रुपयांचे व्याज मोजावे लागेल

आता ईएमआय होईल कमी महागाई दरात घसरणीचा फायदा कर्जदारांना होईल. त्यांना गेल्या वर्षभरापासून वाढत्या ईएमआयचे चटके सहन करावे लागले होते. त्यांना एका वर्षांत वारंवार वाढीव ईएमआयचा ताप सहन करावा लागला. पण आता महागाई दर घसरल्याने व्याजदरात कपतीची चर्चा रंगली आहे.

पतधोरण समितीची बैठक भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक 6 ते 8 जून 2023 रोजी दरम्यान होण्याची शक्यता आहे. 8 जून रोजी समितीच्या निर्णयाची घोषणा आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास करतील. गेल्यावेळी रेपो दरात कुठलाही बदल करण्यात आलेला नव्हता. पतधोरण समितीतील काही सदस्यांनी रेपो दरात कपातीचा मुद्दा लावून धरला होता. यावेळी रेपो दरात वाढीची शक्यता नाही. पण त्यात कपात होईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय आहे दावा पुन्हा किरकोळ आणि घाऊक महागाई दरात घसरण आल्यास ऑगस्ट महिन्यात आरबीआय रेपो दरात कपातीचा निर्णय घेऊ शकते. नोमुरा होल्डिंगसने याविषयीचा अंदाज यापूर्वीच वर्तविला आहे. रेपो दरात 2023 च्या अखेरीस 75 बेसीस पॉईंटची कपात होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. असे झाल्यास रेपो दर 6.50 टक्क्यांहून 5.75 टक्क्यांपर्यंत खाली घसरू शकतो.

कर्जदारांना होईल फायदा आरबीआय आता बँकांच्या मनमानीला लगाम घालणार आहे. त्यासाठी 12 पॉईंट्सचा एक नवीन प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावात दंडात्मक शुल्कावरील व्याज (Penal Charge) वर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. अनेक कर्जदारांनी बँकांच्या मनमानी विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आरबीआयने त्याविरोधात कडक पाऊल टाकले आहे. बँका, आर्थिक संस्था, कंपन्या आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्या यांना आता या प्रस्तावावर मत मांडायचे आहे. 15 मे 2023 रोजीपर्यंत त्यांना सूचना द्यायच्या आहेत. जर हे नवीन नियम लागू झाले तर कर्जदारांना त्याचा थेट फायदा होईल.

Follow Us
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.