Aditya Thackeray : .. तरच आम्ही हे राम राज्य असल्याचं मानू, आदित्य ठाकरेंचं भाजपला चॅलेंज
Aditya Thackeray Challenge BJP : शिवसेना उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपला चॅलेंज करून अयोध्येतील जमिनी या गरीब हिंदू यांना देण्याची मागणी केली आहे.
आयोध्येत असलेल्या जमिनी लोढा आणि आदानी यांच्याकडून घेऊन गरीब जनतेला द्या, असं चॅलेंज शिवसेना उबाठाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. राम नवमीच्या दिवशी त्यांनी भाजपला हे चॅलेंज केल आहे. यावेळी ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे, आमचं हिंदुत्व स्पष्ट आहे. हृदयात राम आणि हाताला काम हेच आमचं हिंदुत्व आहे. त्यामुळे आम्ही भाजपला चॅलेंज करतो की तुम्हाला खरच हिंदुत्व हवं आहे, तर आयोध्येतल्या ज्या जमिनी तुम्ही लोढा आणि आदानी यांना दिलेल्या आहेत त्या परत घेऊन तिथल्या गरीब जनतेला द्या, तेव्हाच आम्ही हे राम राज्य असल्याचं मानू, असं ठाकरे यांनी यावेळी म्हंटलं आहे.
Published on: Apr 08, 2025 8:43 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
