आजी-माजी एकत्र आले तर भावी सहकारी, असं सूचक वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. त्यानंतर युतीच्या चर्चेवरुन पुन्हा खलबतं सुरु झाली. त्यातच राजकारणात काहीही होऊ शकतं असा सूर भाजपच्या नेत्यांनी सुरु केलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरुवातच भाजपला ऑफर देत केली. मुख्यमंत्री म्हणाले, “मंचावर उपस्थित आज-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी”. भाजप नेते रावसाहेब दानवे यांना उद्देशून मुख्यमंत्र्यांनी एकत्रित आले तर भावी सहकारी असा उल्लेख केला.