AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Sindoor : तपासात दहशतवाद्यांचे पाकिस्तानशी संबंध उघड झाले - परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री

Operation Sindoor : तपासात दहशतवाद्यांचे पाकिस्तानशी संबंध उघड झाले – परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री

| Updated on: May 07, 2025 | 12:24 PM

Vikram Misri Press Conference : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदुर’द्वारे जशास तसा बदला घेतला आहे. या हल्ल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यावर भाष्य केलं.

पहलगाम हा एक भ्याड हल्ला होता, ज्यामध्ये लोक त्यांच्या कुटुंबियांसमोर मारले गेले. लोकांना या हल्ल्याचा संदेश पसरवण्यास सांगण्यात आले. जम्मू आणि काश्मीरच्या चांगल्या स्थितीवर परिणाम करण्यासाठी हा हल्ला करण्यात आला. २६/११ नंतरची ही सर्वात मोठी घटना आहे, असं परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना म्हंटलं आहे. पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर आज मध्यरात्री भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवलं. यात पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणांवर हल्ला केला. या ऑपरेशननंतर आज सकाळी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषद घेण्यात आली.

पुढे बोलताना मिस्री म्हणाले की, गेल्या वर्षी २.२५ कोटींहून अधिक पर्यटक काश्मीरमध्ये आले होते. विकास आणि प्रगतीला हानी पोहोचवून मागासलेपणा टिकवून ठेवणे हा या हल्ल्याचा उद्देश आहे. पहलगाम हल्ल्याच्या तपासात दहशतवाद्यांचे पाकिस्तानशी असलेले संबंध उघड झाले आहेत. टीआरएफचे दावे आणि लष्करच्या सोशल मीडिया पोस्ट हे सिद्ध करतात. हल्लेखोरांचीही ओळख पटली आहे. या हल्ल्याचा कट हा भारतात सीमापार दहशतवाद पसरवण्याच्या पाकिस्तानच्या योजनेचा भाग असल्याचे सिद्ध झाले आहे. पाकिस्तानने दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान म्हणून प्रतिष्ठा मिळवली असल्याचंही यावेळी मिस्री यांनी सांगितलं.

 

Published on: May 07, 2025 12:24 PM