Imtiaz Jaleel : तुझ्या सिंदूरचा बदला… जलील यांनी पहलगाम हल्ल्यानंतर रागात पाकिस्तानचा झेंडा जाळला आता Operation Sindoor बघा काय म्हणाले?
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्त्वात एमआयएम या पक्षाने केल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर आता ऑपरेशन सिंदूरचं देखील जलील यांनी स्वागत केलंय.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताकडून पाकिस्तानवर मोठा हवाई हल्ला करण्यात आला. या कारवाईच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानातील मुजफ्फराबाद, कोटली, गुलपुर, बिंबर आणि सियालकोट, चक अमरू, मुरीदके, बहावलपूर अशा 9 ठिकाणी एअर स्ट्राईक केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, भारताकडून करण्यात आलेल्या या कारवाईचे छत्रपती संभाजीनगरमध्येही माजी खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी स्वागत केले आहे. ‘जेव्हा पहलगाममध्ये हल्ला झाला. त्यावेळी निष्पाप पर्यटकांना दहशतवाद्यांनी मारलं. अशा गोष्टीचं कोणीचं समर्थन करू शकत नाही. मला अशी अपेक्षा होती की, २४ तासाचा आतच पाकिस्तानला हल्ला चढवला पाहिजे होतं.’, असं इम्तियाज जलील म्हणाले. पहलगाम हल्ल्यात आमच्या बहिणींसमोर त्यांच्या पतीची हत्या करण्यात आली होती. बहुतेक या बहिणींच्या सिंदूरचा बदलाच भारताकडून घेण्यात आलाय. पहलगाम ही एक वाईट घटना होती. ते पाहून माणुसकीच्या नात्यानं कोणाचाही जीव पिळवटून निघेल, असं म्हणत त्यांनी ऑपरेशन सिंदूरवर आपली प्रतिक्रिया दिली.