AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीत चौरंगी लढत, बंडखोरही गेम बिघडवणार? राजकीय पक्षांचे टेन्शन

BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीत चौरंगी लढत, बंडखोरही गेम बिघडवणार? राजकीय पक्षांचे टेन्शन

| Updated on: Jan 03, 2026 | 11:13 AM
Share

मुंबई महापालिका निवडणुकीत पक्षांनी बंडखोरी शमवण्यासाठी प्रयत्न केले असले तरी, भाजप आणि ठाकरे गटासमोर अनेक ठिकाणी बंडखोर कायम आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही बंडखोरांची मनधरणी केली, तर ठाकरे गटाला वरळी आणि मातोश्री परिसरातही आव्हान आहे. चौरंगी लढतीत बंडखोर प्रमुख पक्षांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी बंडखोरी शांत करण्याचे प्रयत्न केले असले तरी, अनेक ठिकाणी बंडखोर कायम आहेत. यामुळे मुंबईतील चौरंगी लढतीमध्ये बंडखोर उमेदवारांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत पक्षांनी मनधरणीचे प्रयत्न केले. भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) वॉर्ड क्रमांक ६०, १७३, २०५, १७७ आणि १८० मध्ये बंडखोरी कायम राहिली. भाजपने काही बंडखोरांना शांत करण्यात यश मिळवले, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून चर्चा करून १५ हून अधिक बंडखोरांचे अर्ज मागे घ्यायला लावले. दहिसर आणि मागाठाणे परिसरातील महायुतीच्या १० बंडखोरांनीही मंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीनंतर अर्ज मागे घेतले.

दुसरीकडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या (ठाकरेंची शिवसेना) समोरही बंडखोरीचे आव्हान आहे. आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात आणि उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाजवळच्या वॉर्ड क्रमांक ९५ मध्येही बंडखोरी झाली आहे. वॉर्ड क्रमांक १९३, १९७, १९६, २०२, २०५ आणि १५९ मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला बंडखोरांचा सामना करावा लागत आहे. आठ वर्षांनी होणाऱ्या या निवडणुकीत इच्छुकांच्या संख्येमुळे पक्षांमधील अंतर्गत संघर्ष वाढला आहे.

Published on: Jan 03, 2026 11:13 AM