आत्मनिर्भर भारतासाठी पंतप्रधान मोदींचा महत्त्वाचा निर्णय!

आत्मनिर्भर भारतासाठी पंतप्रधान मोदींचा महत्त्वाचा निर्णय!

राखी राजपूत | Updated on: Sep 21, 2025 | 5:28 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन पिढीच्या जीएसटी सुधारणांची घोषणा केली आहे. या सुधारणांमुळे रोजच्या वापराच्या वस्तू स्वस्त होतील आणि ५% आणि १८% या दोनच टॅक्स स्लॅब राहतील. यामुळे मध्यमवर्ग आणि गरिबांना मोठा फायदा होईल, तसेच आत्मनिर्भर भारत या मोहिमेलाही चालना मिळेल. हे सुधारणा आर्थिक विकासाला गती देतील आणि देशातील उद्योगांना बळ मिळेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 सप्टेंबर रोजी नवीन पिढीच्या जीएसटी सुधारणांची घोषणा केली. या सुधारणांचा उद्देश आत्मनिर्भर भारताच्या ध्येयाला बळ देणे हा आहे. सुधारणांनुसार, रोजच्या वापराच्या बहुतेक वस्तूंवर लागणारा कर कमी करण्यात आला आहे. आता फक्त 5% आणि 18% हे दोनच कर दर राहतील. यामुळे ग्राहकांना मोठी बचत होईल आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळेल. या सुधारणांचा लघु, मध्यम आणि कुटीर उद्योगांना (MSMEs)ही फायदा होईल, त्यांची विक्री वाढेल आणि करभार कमी होईल. पंतप्रधानांनी सर्व राज्य सरकारांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Published on: Sep 21, 2025 5:28 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us