Ambadas Danve : ‘वर्षा’वरच्या बैठकीत पार्थवरून अजितदादा संतापले सरकारमधून बाहेर पडतो अन्… दानवेंच्या दाव्यानं खळबळ
पार्थ पवार जमीन प्रकरणी अंबादास दानवेंनी अजित पवार वर्षा बंगल्यावर सरकारमधून बाहेर पडण्याची भाषा केल्याचा दावा केला आहे. या दाव्याचे चंद्रशेखर बावनकुळेंनी खंडन करत दानवे खोटं बोलत असल्याचं म्हटलं. विजय वडेट्टीवार यांच्या म्हणण्यानुसार, हा भाजपचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला डागाळण्याचा प्रयत्न आहे. राजकीय वर्तुळात या प्रकरणावरून जोरदार चर्चा सुरू आहे.
पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तीव्र वादंग सुरू आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी असा दावा केला आहे की, पार्थ पवार यांच्या कंपनीला मिळालेल्या ४२ कोटींच्या नोटीसीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत सरकारमधून बाहेर पडण्याचा विचार करत होते.
दानवेंच्या मते, अजित पवारांनी त्वेषाने सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. या आरोपांना भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. बावनकुळे यांनी दानवेंचे आरोप फेटाळून लावत, आपण स्वतः त्या बैठकीला उपस्थित होतो आणि अशा कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी दानवे खोटं बोलत असल्याचा दावा केला. विजय वडेट्टीवार यांनी याला भाजपचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला डागाळण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. या घडामोडींमुळे महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा समोर आल्याचे चित्र आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

