पुन्हा इतिहासाची पुन्नरावृत्ती होणार, शरद पवार यांचा मोठा दावा अन् अजितदादांना थेट इशारा
राज्यातील ५० टक्के जागा या महाविकास आघाडी जिंकणार असल्याचा मोठा दावा शरद पवार यांनी केलाय. तर भाजपाला विजयाची खात्री नाही म्हणून ते फोडाफोडीचं राजकारण करत असल्याचे म्हणत शरद पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय.
मुंबई, २१ फेब्रुवारी २०२४ : सर्व्हेनुसार राज्यातील ५० टक्के जागा या महाविकास आघाडी जिंकणार असल्याचा मोठा दावा शरद पवार यांनी केलाय. तर भाजपाला विजयाची खात्री नाही म्हणून ते फोडाफोडीचं राजकारण करत असल्याचे म्हणत शरद पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. दरम्यान, शरद पवार यांनी ५० टक्के जागा या महाविकास आघाडी जिंकणार असल्याचा दावा करत असताना त्यांनी अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. शरद पवार म्हणाले, काही लोकं सोडून गेले त्याची चिंता नाही तर १९८० मध्ये जे आमदार सोडून गेलेत त्यातील ९० टक्के आमदार पराभूत झाले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही इतिहासाची पुन्नरावृत्ती होणार असल्याचं भाकित शरद पवार यांनी वर्तविलं आहे, असे म्हणत शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार यांना हा इशारा दिला आहे.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी

