देवेंद्र फडणवीस यांच्या कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या आरोपावर सुनील राऊतांचं उत्तर

| Updated on: Aug 12, 2022 | 1:09 PM

उद्धव साहेबांनी खूप चांगला निर्णय घेतला होता. झाडं कापून चालणार नाही. मुंबईत इमारती जास्त आणि झाडं कमी आहेत. त्यामुळे आरेमधील झाडं वाचवणं आवश्यक आहे, असं ते म्हणाले.

Follow us on

“उद्धव ठाकरेंना इगो नव्हता, तर फडणवीस यांनाच आहे”, अशी टीका सुनील राऊत यांनी केली आहे. उद्धव यांच्या इगोमुळेच कांजूर मार्गमध्ये मेट्रोची कारशेड केली जात होती, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्या टीकेला सुनील राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव साहेबांनी खूप चांगला निर्णय घेतला होता. झाडं कापून चालणार नाही. मुंबईत इमारती जास्त आणि झाडं कमी आहेत. त्यामुळे आरेमधील झाडं वाचवणं आवश्यक आहे, असं ते म्हणाले.