Sanjay Raut : जगणं झालंय छान कारण चोरला आमचा धनुष्यबाण, संजय राऊत यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
संजय राऊत यांनी ठाण्यात निष्ठावान विरुद्ध बेईमान अशी लढाई असल्याचे म्हटले. त्यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकजुटीवर भर देत, ठाणे महानगरपालिकेत ठाकरे बंधूंचा महापौर बसवण्याची जबाबदारी ठाणेकरांवर असल्याचे सांगितले. सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आणि थापेबाजीचे आरोप करत, महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
ठाण्यात झालेल्या सभेत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सत्ताधारी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. ही लढाई निष्ठावान विरुद्ध बेईमान असल्याची घोषणा त्यांनी केली. महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यामुळे एका नव्या पर्वाची सुरुवात झाली असून, हे वादळ सत्ताधाऱ्यांसाठी तडाखे देणारे ठरेल, असे राऊत यांनी नमूद केले. राऊत यांनी ठाणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ठाणेकरांना आवाहन केले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या निष्ठेचे बीज ठाण्यात अजूनही कायम असून, ठाण्याच्या महानगरपालिकेवर ठाकरे बंधूंचा म्हणजेच शिवसेना-मनसेचा भगवा फडकवण्याची जबाबदारी ठाणेकरांवर आहे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर थापा मारण्याचा आणि भ्रष्टाचाराचा आरोप करत, ठाणे महानगरपालिकेत सर्वाधिक टेंडरबाजी आणि कमिशनबाजी झाल्याचा दावा राऊत यांनी केला. वसई-विरारमध्ये मुख्यमंत्र्यांनी हिंदीत भाषण केल्याबद्दल राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. मराठी मुलुखात मराठी भाषा सोडून हिंदीचा वापर करणे म्हणजे महाराष्ट्राच्या अखंडतेला धोका असल्याचे त्यांनी सांगितले. ठाकरे बंधूंची युती सत्ताधाऱ्यांचा संपूर्ण नायनाट करून महाराष्ट्रात एक नवीन पर्व सुरू करेपर्यंत एकत्र राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,

