धाराशिव : राज्यात अवकाळीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. पिकवलेल्या पिकाचे मोठे नुसकान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्याला न्याय मिळावा यासाठी आता शेतकरीच रस्त्यावर उतरला आहे. धाराशिव येथील ढोकी या ठिकाणी शेतकऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसने रास्ता रोको केला. शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी तेरणा शेतकरी सहकारी कारखाना परिसरामध्ये रास्ता रोको केला आहे.