IPL 2025 : आयपीएलचे उर्वरित सामने रद्द होणार? BCCI लवकरच घेणार निर्णय, उपाध्यक्ष राजीव शुक्लांच्या वक्तव्यानं चर्चा
IPL 2025 Updates amid India Pakistan Tension : धर्मशाला येथे आयपीएलचा काल होणारा सामना रद्द करण्यात आला होता आणि खेळाडूंना दिल्ली येथे आणण्यात आलं . त्यामुळे आता आगामी आयपीएलचे सामने खेळले जाणार की नाही? अशी चिंता क्रिकेट प्रेमी आणि चाहत्यांमध्ये आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे आयपीएल २०२५ वरील संकट अधिकच गडद झाले आहे. पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्यांमुळे गुरुवारी जम्मू, पंजाब आणि राजस्थानमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. धर्मशाला येथे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाणारा ५८ वा सामना १०.१ ओव्हर नंतर थांबवण्यात आला आणि रद्द करण्यात आला, त्यानंतर बीसीसीआयने आपत्कालीन बैठक बोलावली होती. दरम्यान, आयपीएल क्रिकेट सामन्यांबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. आयपीएलचे उर्वरित सामने स्थगित होण्याची शक्यता आहे. आयपीएलसंदर्भात बीसीसीआय लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आता मात्र आता आयपीएलच्या उर्वरित सामन्यांबाबत बीसीसीआय लवकर योग्य तो निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. आयपीएल क्रिकेट सामने खेळाणारे खेळाडू आणि आयपीएल सामने पाहणारे प्रेक्षकांच्या दृष्टीने बीसीसीआय कोणता निर्णय घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी असे म्हटले की, ‘आम्ही सध्याच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. या मुद्द्यावर बोर्ड सरकारकडून सल्लाही घेत आहे. आयपीएलबाबतचा अंतिम निर्णय उद्या घेतला जाईल.

फायदा करून देणार 100 टक्के... दमानियांचा सुपेकरांवर आरोप, ऐकवली ऑडिओ

वैष्णवीकडून 2 वर्षांपूर्वीच आत्महत्येचा प्रयत्न, कीटकनाशक पिऊन...

सासऱ्यानं सूनेच्या छातीवर...मयुरीच्या आईच 7 महिन्यापूर्वी आयोगाला पत्र

नुसता माज, सौंदर्य पाहून पद..चाकणकरांवर करूणा शर्मा भडकल्या दिला इशारा
