AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केवळ मंत्रीपदांसाठी वाद सुरू, वरिष्ठ नेते मार्ग काढतील : सुभाष देशमुख

माजी सहकार मंत्री आणि भाजप नेते सुभाष देशमुख यांनी (Subhash Deshmukh on BJP Shivsena dispute) भाजप-शिवसेना वाद केवळ मंत्रिपदासाठी असल्याचं म्हटलं आहे.

केवळ मंत्रीपदांसाठी वाद सुरू, वरिष्ठ नेते मार्ग काढतील : सुभाष देशमुख
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Nov 09, 2019 | 11:21 PM
Share

सोलापूर: माजी सहकार मंत्री आणि भाजप नेते सुभाष देशमुख यांनी (Subhash Deshmukh on BJP Shivsena dispute) भाजप-शिवसेना वाद केवळ मंत्रिपदासाठी असल्याचं म्हटलं आहे. जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री आणि जागांच्या तुलनेत मंत्रिपदे हा भाजप आणि शिवसेनेचा जुना फॉर्म्युला आहे. सध्याचा वाद केवळ मंत्रिपदांसाठी आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी यात लक्ष घातलं आहे. लवकरच यावर तोडगा निघून महायुतीचा मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा सुभाष देशमुख (Subhash Deshmukh on BJP Shivsena dispute) यांनी केला आहे. तसेच शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेल्यास जनतेचा घोर अपमान होईल, असंही ते म्हणाले.

सुभाष देशमुख म्हणाले, “राज्यातील जनतेने महायुतीला कौल दिला आहे. मुख्यमंत्रीपदाचा दावा शिवसेनाही करते आहे आणि भाजपही करते आहे. अमित शहा यांच्यासोबत काय ठरलं हे मी सांगू शकत नाही. मात्र जुना फॉर्म्युला बघितला, तर ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री आणि जागांच्या तुलनेत मंत्रीपद असा होता. आता दोन्ही बाजूने मार्ग निघाला, तर राज्यातील जनतेला न्याय दिल्यासारखं होईन. हा वाद केवळ मंत्रिपदांसाठी आहे. वरिष्ठ नेत्यांनी यात लक्ष घातलं असून लवकरच मार्ग निघेल. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगेससोबत जातील असं मला वाटतं नाही. मात्र, तसं झालं तर तो महाराष्ट्रातील जनतेचा घोर अपमान होईन.”

जनतेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात महायुतीला कौल दिला आहे. आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावं असं वाटणं स्वाभाविक आहे. मात्र यात काहीना काही मार्ग निघेल, असंही देशमुख यांनी नमूद केलं.

अमित शहा आणि कंपनी खोटारडे असल्याच्या उद्धव ठाकरे यांच्या आरोपांवर देशमुख म्हणाले, “अमित शाह यांच्यासी काय चर्चा झाली हे मी सांगू शकत नाही. मात्र, आजपर्यंतचे अनुभव पाहिले, तर ते जे बोलतात ते करण्याचा प्रयत्न करतात.”

Follow Us
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सर्वात मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द, नेमकं काय घडलं?
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थक...
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थकांची जोरदार बॅनरबाजी; चक्क...
याला म्हणतात luxurious! रुपाली चाकणकर यांचं हॉटेल व्यवसायात पदार्पण
याला म्हणतात luxurious! रुपाली चाकणकर यांचं हॉटेल व्यवसायात पदार्पण
पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...बड्या नेत्याचा दावा
मोठी बातमी ! पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...या नेत्याच्या दाव्याने पुन्हा खळबळ
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटन...
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री...
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री काँग्रेस नेत्याच्या...
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसणाचे दर तब्बल 200 रुपये किलोपर्यंत
सरसकट 80 ते 100 रुपयांची वाढ, कांद्यानंतर आता स्वयंपाकघरात दररोज उपयोगात येणारी वस्तुही महागली
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप,
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप, तब्बल 15 लाख...
विक्रेत्यांना 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साखरेचा साठा करता येणार नाही
साखरेच्या साठेबाजीवर चाप लावण्यासाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
'मुंबई रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषा अनिवार्य करा'
मुंबई रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषा अनिवार्य करा: पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी