AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चंद्रकांत पाटलांसाठी सेफ गेम, पुण्यातील कोथरुडमधून उमेदवारी?

चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा लढवावी, अशी इच्छा भाजपाच्या नेत्यांची होती पण, कोल्हापूरमध्ये शिवसेनेचं वर्चस्व असल्यामुळे त्यांच्यासाठी कोणताही मतदारसंघ सुरक्षित वाटत नव्हता.

चंद्रकांत पाटलांसाठी सेफ गेम, पुण्यातील कोथरुडमधून उमेदवारी?
| Updated on: Sep 30, 2019 | 8:43 AM
Share

पुणे : भाजपच्या दृष्टीने पुण्यातील सर्वात सुरक्षित मतदारसंघ समजल्या जाणाऱ्या कोथरुडमधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि पुणे-कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil Kothrud BJP Candidate) यांना मैदानात उतरवलं जाण्याची शक्यता आहे. कोल्हापुरात शिवसेनेचं प्राबल्य पाहता चंद्रकांतदादांसाठी भाजप पुण्यातून सेफ गेम खेळण्याची शक्यता आहे.

चंद्रकांत पाटील सध्या पुणे पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून आले आहेत. चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा लढवावी, अशी इच्छा भाजपाच्या नेत्यांची होती पण, कोल्हापूरमध्ये शिवसेनेचं वर्चस्व असल्यामुळे त्यांच्यासाठी कोणताही मतदारसंघ सुरक्षित वाटत नव्हता. अखेर त्यांच्यासाठी कोथरुड मतदारसंघ निश्चित केल्याची माहिती आहे.

मेधा कुलकर्णी या सध्या भाजपच्या तिकीटावर कोथरुड मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. 2014 मध्ये कोथरुडमधून मेधा कुलकर्णींनी शिवसेनेच्या चंद्रकांत मोकाटे यांच्याविरुद्ध 64 हजार मतांनी विजय मिळविला होता.

काँग्रेस-राष्ट्रवादीकडे या मतदारसंघात उमेदवारच नसल्यामुळे आघाडीमध्ये हा मतदारसंघ मित्रपक्षांसाठी सोडण्यात आला आहे. त्यामुळे अन्य मतदारसंघाच्या तुलनेत युतीसाठी कोथरुड सर्वात सुरक्षित समजला जात आहे. चंद्रकांत पाटलांनी कोथरुडमधून निवडणूक लढवल्यास (Chandrakant Patil Kothrud BJP Candidate) कुलकर्णींचं पुनर्वसन कुठे होणार, याकडे लक्ष लागून राहिलं आहे.

भाजपच्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब, तिकीटं जाहीर होण्यात दिरंगाई

कोथरुड, कसबा आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात युतीचं नेहमीच प्राबल्य राहिलं आहे. लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट यांना कोथरुडमधून सर्वाधिक 97 हजार 410 मतांची आघाडी मिळाली होती. कसबा विधानसभा मतदारसंघातून 50 हजार तर शिवाजीनगरमध्ये 25 हजार मतांची आघाडी बापट यांना मिळाली होती. त्यामुळे या मतदारसंघातून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचं नाव निश्चित केलं गेलं आहे.

मुक्ता टिळक यांना कसबा पेठ?

पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातून महापौर मुक्ता टिळक यांचं नाव निश्चित झाल्याचीही माहिती आहे़. विद्यमान आमदार गिरीश बापट यांच्या जागी मुक्ता टिळक यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. कसबा पेठ या भाजपच्या बालेकिल्ल्यावर बापटांनी गेली अनेक वर्ष झेंडा फडकवला आहे. बापट खासदार झाल्याने 20 वर्षांनंतर प्रथमच कसबा पेठेमध्ये तिकीटासाठी भाजपमध्ये रस्सीखेच सुरु झाली. गेली अडीच वर्षे पुण्याचं महापौर पद सांभाळताना मुक्ता टिळक यांनी स्वच्छ प्रतिमा जपल्यामुळे त्यांना प्राधान्य मिळण्याची चिन्हं आहेत.

दरम्यान, शिवाजीनगर मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात येणार आहे. मात्र भाजपच्या अनिल शिरोळे यांचे पुत्र आणि नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांची उमेदवारी निश्चित झाल्याचंही म्हटलं जातं. त्यामुळे या मतदारसंघात काय होणार, याची उत्सुकता आहे.

भाजपच्या संसदीय समितीची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत पार पडली. यावेळी महाराष्ट्रातील विधानसभा उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं, मात्र उमेदवारांची घोषणा करण्यात दिरंगाई होत आहे.

झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून....
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून.....
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण.
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका.
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा.
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना....
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना.....
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले...
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले....
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर...
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर....
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले.
पहाटेचा शपथविधी, अजितदादा का नाराज व्हायचे? फडणवीसांनी सांगितला किस्सा
पहाटेचा शपथविधी, अजितदादा का नाराज व्हायचे? फडणवीसांनी सांगितला किस्सा.