भाजपचाच मुख्यमंत्री होणार होता, आता काय झालं, संजय राऊतांची भाजपला कोपरखळी

भाजपने राज्यपालांच्या विचारणेनंतर सरकार स्थापनेस नकार दिल्यानंतर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut on government formation) भाजपला कोपरखळी लगावली आहे.

भाजपचाच मुख्यमंत्री होणार होता, आता काय झालं, संजय राऊतांची भाजपला कोपरखळी
Follow us
| Updated on: Nov 10, 2019 | 7:19 PM

मुंबई: भाजपने राज्यपालांच्या विचारणेनंतर सरकार स्थापनेस नकार दिल्यानंतर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut on government formation) भाजपला कोपरखळी लगावली आहे. कालपर्यंत भाजप आमचाच मुख्यमंत्री होणार असं म्हणत होते. मग आज त्यांनी नकार का दिला, यानंतर त्यांचा मुख्यमंत्री कसा होणार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार कसे बनणार असे अनेक प्रश्न करत संजय राऊत यांनी (Sanjay Raut on government formation) भाजपला घेरले.

संजय राऊत म्हणाले, “आम्ही विरोधी पक्षात बसू पण शिवसेनेला ठरल्याप्रमाणे अडीच वर्षे मुख्यमंत्री पद देणार नाही, यातच भाजपचा अहंकार दिसतो. भाजपला मुख्यमंत्रीही बनवायचा होता आणि शिवसेनेसोबतचं वचनही पाळायचं नाही. उद्धव ठाकरे वारंवार सांगत आहेत आणि ते आजही म्हणालेत की मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार. सत्ता स्थापनेच्या शिवसेनेच्या दाव्यावर उद्या बोलू.”

चंद्रकांत पाटील म्हणाले, “यावेळीच्या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, रिपाइं, रासप, शिवसंग्राम, रयत या महायुतीला जनतेने भरगोस जनादेश दिला. त्यामुळे राज्यपालांनी भाजपला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिले. आम्ही निवडणूक महायुती म्हणून लढलो, जनादेश देखील महायुतीला दिला. मात्र, शिवसेना सोबत येत नसल्याने आम्ही राज्यपालांना सत्तास्थापनेस नकार दिला आहे. त्यामुळे राज्यपाल यापुढे काय निर्णय घेणार हे पाहावे लागणार आहे.”

जनतेने दिलेल्या जनादेशाचा अपमान करुन शिवसेनेला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन सरकार स्थापन करायचं असेल, तर त्यांना आमच्या खूप खूप शुभेच्छा, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे आता राज्यपाल शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी विचारणा करणार का आणि त्यानंतर शिवसेना सत्तास्थापन करणार का हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.

विशेष म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीने अद्याप आपली भूमिका गुलदस्त्यातच ठेवली आहे. त्यामुळे शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी पाठिंबा देणार की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे. शिवसेनेकडून काय हालचाली होतात हेही पाहावं लागणार आहे.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.