AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Success Story: तीन एकरात, तीन वर्षात आंब्यातून 18 लाखाचे उत्पन्न, प्रयोगशील शेतकऱ्यांचा सल्ला तर वाचा

उत्पन्न वाढीसाठी पारंपरिक शेती पध्दतीचा उपयोग नाही तर शेतकऱ्यांनी प्रयोगशील असणे गरजेचे आहे. शेती व्यवसायाला सुरवात करतानाच बिरजदार यांनी हे सूत्र अंमलात आणले होते. त्यामुळेच त्यांनी पारंपरिक शेती पध्दतीला फाटा देत तीन एकरामध्ये केशर आंब्याची लागवड केली होती. अवघ्या तीन वर्षात आंब्याला फलधारणा झाली असून आता हा आंबा सातासमुद्रापार जात आहे.

Success Story: तीन एकरात, तीन वर्षात आंब्यातून 18 लाखाचे उत्पन्न, प्रयोगशील शेतकऱ्यांचा सल्ला तर वाचा
केशर आंबा
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: May 31, 2022 | 10:58 AM
Share

सोलापूर : शेती निसर्गावर अवलंबून, शेतीत काय राम आहे अशी नकारात्मकता ठासून भरलेल्यांसाठी (Solapur Farmer) सोलापूरच्या शेतकऱ्याचा प्रयोग नक्कीच प्रेरणादायी ठरणारा आहे. दक्षिण तालुक्यातील दर्गनहळ्ळी येथील केदारनाथ बिरजदार यांनी केवळ (Farming) शेती पध्दतीमध्येच बदल केला नाही तर अधिकच्या उत्पादनासाठी आपली जीवन शैलीच बदलली आहे. 10 हजाराच्या नौकरीच्या मागे न लागता त्यांनी शेती व्यवसायात अशी काय प्रगती केली आहे की वर्षाकाठी 18 लाखाचे उत्पन्न हे ठरलेलेच आहे. तीन वर्षापूर्वी त्यांनी 3 एकरामध्ये (Keshar Mango) केशर आंब्याची लागवड केली होती. आज केशर आंब्याची निर्यात होत असून त्यांना यामधून 18 लाखाचा फायदा झाला आहे. केवळ उत्पादनात बदल आणि तंत्रशुध्द पध्दतीने केलेली जोपासणा आज त्यांच्या कामी आली आहे.

फळबागांमधूनच अधिकची उत्पाकता

उत्पन्न वाढीसाठी पारंपरिक शेती पध्दतीचा उपयोग नाही तर शेतकऱ्यांनी प्रयोगशील असणे गरजेचे आहे. शेती व्यवसायाला सुरवात करतानाच बिरजदार यांनी हे सूत्र अंमलात आणले होते. त्यामुळेच त्यांनी पारंपरिक शेती पध्दतीला फाटा देत तीन एकरामध्ये केशर आंब्याची लागवड केली होती. अवघ्या तीन वर्षात आंब्याला फलधारणा झाली असून आता हा आंबा सातासमुद्रापार जात आहे. राज्यात केवळ हापूसलाच मागणी असे नाही तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात उत्पादित होत असलेल्या केशर आंब्यालाही तेवढीच मागणी आहे.

नोकर बनण्यापेक्षा मालक होऊन काळ्या आईची सेवा करा

शेती व्यवसयात रात्रीतून यश मिळत नाही तर त्यासाठी अथक परिश्रम आणि वेगळ्या प्रयोगाची गरज आहे. हाच निर्धार करुन केदरनाथ यांनी शेती व्यवसयात पदार्पण केले होते. 10 हजाराची नौकरी करण्यापेक्षा मालक होऊन शेती व्यवसाय केलेला केव्हाही फायद्याचाच असल्याचे बिरजदार यांचे मत आहे. त्यामुळेच नौकरीच्या मागे न लागता शेती व्यवसाय करण्याचा निर्धार केल्याचे बिरजदार यांनी सांगितले आहे. आता वर्षाकाठी 18 लाखाचे उत्पन्न घेत आहेत. शेतीमध्येही पारंपरिक शेतीला महत्व नाही तर फळबागांमधूनच उत्पादन वाढविता येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

केशरला परदेशातून मागणी

फळांचा राजा म्हणले की आपल्यासमोर येतो तो कोकणचा हापूस आंबा. मात्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील केशरलाही तेवढेच महत्व आहे. केशरचा हंगाम हा उशिराचा असला तरी त्याला आता परदेशातून मागणी वाढत आहे. दर्जेदार आंब्याची निर्यात झाल्यानेच प्रतिकूल परस्थितीमध्येही भरघोस उत्पादन मिळाल्याचे बिरजदार यांनी सांगितले आहे. शिवाय तरुणांनी नौकरीच्या मागे न लागता शेती व्यवसयातच नवनवीन प्रयोग करणे फायद्याचे ठरणार असल्याचा संदेश त्यांनी दिला आहे.

Follow Us
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...