AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sugarcane : महिन्याचा कालावधी अन् 41 लाख टन ऊस गाळपाचे ‘टार्गेट’, साखर आयुक्तांचे धोरण काय ?

राज्यात सर्वाधिक अतिरिक्त उसाचा प्रश्न हा मराठवाड्यात आहे. त्यामुळे या भागातील उसतोडीवर प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले होते. त्यानुसार सध्या मराठवाड्यात 130 हार्वेस्टर कार्यंरत असल्याचे साखर आयुक्तांच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. त्यामुळे मे महिन्याच्या अंतिम टप्प्यापर्यंत हा प्रश्न सुटलेला असेल.

Sugarcane : महिन्याचा कालावधी अन् 41 लाख टन ऊस गाळपाचे 'टार्गेट', साखर आयुक्तांचे धोरण काय ?
जून महिना उजाडला ती लातूर जिल्ह्यामध्ये अतिरिक्त उसाचा प्रश्न कायम आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Apr 30, 2022 | 1:04 PM
Share

पुणे :  (Surplus Sugarcane) अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आता प्रशासनाकडे केवळ 1 महिन्याचा कालावधी शिल्ल्क आहे. तर दुसरीकडे राज्यात अजून 41 लाख हेक्टर (Sugarcane) ऊस फडात उभा असल्याचे सांगण्यात येत आहे. ही प्रशासकीय आकडेवारी असली तरी स्थानिक पातळीवरील परस्थिती काही वेगळीच आहे. असे असले तरी पावसाळा सुरु होण्यापूर्वीच या अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे असणार आहे. ही एक प्रक्रिया झाली तरी प्रत्यक्षात शिल्लक (Weight Sugarcane) उसाचे वजन किती आणि त्याला उतारा किती हा देखील संशोधनाचा विषय झाला आहे. कारण सध्याचे रकरकते ऊन आणि 19 महिन्याचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे या अतिरिक्त उसातून किती उत्पन्न मिळणार असा सवाल उपस्थित होत आहे.

मराठवाड्यात 130 हार्वेस्टर ऊसाच्या फडात

राज्यात सर्वाधिक अतिरिक्त उसाचा प्रश्न हा मराठवाड्यात आहे. त्यामुळे या भागातील उसतोडीवर प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले होते. त्यानुसार सध्या मराठवाड्यात 130 हार्वेस्टर कार्यंरत असल्याचे साखर आयुक्तांच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. त्यामुळे मे महिन्याच्या अंतिम टप्प्यापर्यंत हा प्रश्न सुटलेला असेल. केवळ मराठवाडाच नाहीतर राज्यातील अतिरिक्त उसाचा प्रश्न हा मे अखेरपर्यंत संपलेला असेल असे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले आहे.

साखर उत्पादनातही विक्रम

अतिरिक्त उसाचा प्रश्न कायम असला तरी यंदा ऊसाचे गाळप आणि साखरेच्या उत्पादनात महाराष्ट्र हा देशात पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे. महाराष्ट्रात 133 लाख टन साखरेचे उत्पादन घेतील असा अंदाज होता. पण दिवसेंदिवस गाळप वाढतच गेल्याने आता साखरेचे उत्पादन हे 136 लाख टनावर येऊन पोहटले आहे. शिवाय अजून महिनाभर साखर कारखाने हे सुरुच राहणार आहेत. त्यामुळे यामध्ये आणखीन वाढ होणारच आहे. साखरेच्या उत्पादनाबरोबरच उसाचे गाळपही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यंदाचे एकूण गाळप 1 हजार 307 लाख टनाच्या आसपास होईल असेही साखर आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

सरकारी अनुदानामुळे प्रश्न मार्गी

हंगामाच्या अंतिम टप्प्यात सर्वकश प्रयत्न करुन गाळप पूर्ण करण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. त्यासाठी आता राज्य सरकारनेही भूमिका घेतली आहे. उसाच्या वाहतूकीसाठी आणि गाळपासाठी अनुदान मंजूर करण्यात आले आहे. अतिरिक्त ऊस कार्यक्षेत्राच्या बाहेरुन गाळपास आणावा लागणार आहे त्यामुळे त्यासाठी 10 कोटी 38 लाख तर उताऱ्यात घट झाल्यास प्रतीटन 200 रुपये असे अनुदान दिले जाणार आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.