AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मध केंद्रासाठी 50 टक्के अनुदान, खादी व ग्राम उद्योग केंद्राकडून अनुदनासह मिळणार प्रशिक्षण

मध उद्योग वाढविणे आणि तरुण शेतकऱ्यांना प्रोहत्साहन देण्यासाठी राज्य सरकार स्थरावर प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग मंडळाच्या माध्यमातून केवळ अनुदानच नाहीतर योग्य ते प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याकरिता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

मध केंद्रासाठी 50 टक्के अनुदान, खादी व ग्राम उद्योग केंद्राकडून अनुदनासह मिळणार प्रशिक्षण
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Sep 20, 2021 | 6:57 PM
Share

लातुर : मध उद्योग वाढविणे आणि तरुण शेतकऱ्यांना प्रोहत्साहन देण्यासाठी राज्य सरकार स्थरावर प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग मंडळाच्या माध्यमातून केवळ अनुदानच नाहीतर योग्य ते प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याकरिता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या माध्यमातून मोफत प्रशिक्षण, साहित्यासाठी 50 टक्के अनुदान हे गुंतवणुकीनुसार दिले जाणार आहे. यातून शासनाच्या हमी भावाने मध खरेदी छंद प्रशिक्षणाची सुविधा तसेच मधमाशांचे संरक्षण व संवर्धनाबाबत जनजागृती केली जाणार आहे.

मधमाशांचे संरक्षण आणि तरुण शेतकऱ्यांना उद्योग मिळावा या उद्देशाने ही योजना राबवण्यात येत आहे. याकरिती अर्जदारास 24 हजार रुपये भरल्यास 24 हजाराचे साहित्य दिले जाणार आहे. याकरिता अर्जदार हा साक्षर असून त्याचे वय हे 18 पेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. याकरिता 10 दिवसाचे प्रशिक्षण हे गरजेचे आहे. प्रगतशील मधपाळ याकरिता वयोमर्यादा ही 21 वर्ष असणार आहे. शिवाय अर्जदार हा 10 वी उत्तीर्ण असून त्याच्या नावे एक एक्कर शेत जमिन किंवा त्याने भाडेतत्वावर जमिन घेतलेली असावी. मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबत मार्गदर्शन देण्याची त्याची क्षमता असणे आवश्यक आहे.

केंद्र चालक संस्थेसाठी संस्थेच्या नावे अथवा भाडेतत्वावर 1 हजार चौरस फुटाची इमारत गरजेची आहे. शिवाय या संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन व उत्पादन बाबत नागरिकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.

असा घेता येणार प्रवेश

विशेष छंद घटकाअंतर्गत 25 रुपये प्रवेश शुल्क अदा करणे आवश्यक आहे. शाळा, कॅालेडमधील विद्यार्थी, तसेच नागरिक किंवा ज्येष्ट नागरिक यांना देखील 5 दिवसाचे प्रशिक्षण हे घेणे बंधनकारक राहणार आहे. आग्या मध संकलन प्रशिक्षणासाठी लाभार्थी हा साक्षर असणे आवश्यक आहे. शिवाय 18 ते 50 वयोगटातील नागरिकालाच यामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. याकरिता किमान 5 दिवसाचे प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. ही सर्व निवड ग्राम उद्योग मंडळाच्या माध्यमातून केली जाणार आहे. हे सर्व असले तरी प्रशिक्षण घेण्यापुर्वी लाभार्थ्यास मध व्यवसाय सुरु करणार अशा मूकराचे पत्र देणे बंधनकारक राहणार आहे.

काय आहे उद्देश

आजही तरुण शेतकरी हे पारंपारिक शेतीकडेच वळलेला आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग मंडळाच्या माध्यमातून मध व्यवसायाबाबत योग्य ते प्रशिक्षण देऊन एक वेगळा व्यवसाय तरुण शेतकऱ्यांना सुरु करता यावा हा त्याचा उद्देश आहे. याकरिता केवळ अनुदानच नाही तर प्रशिक्षणही दिले जाणार आहे. याकरिता अधिक माहितीसाठी मध संचालनालय महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग महाबळेश्वर येथे संपर्क साधता येणार आहे. याकरिता 02168- 260 264 हा क्रमांकही देण्यात आला आहे. (50% grant for honey centre, training with grants from Khadi and Gram Udyog Kendras)

इतर बातम्या :

केंद्र सरकारचा दिलासा : दाळीचे दर राहणार मर्यादीत, सणाच्या तोंडावर मोठा निर्णय

पांढर ‘सोनं’ही चिखलात, पावसामुळे शेती कामे रखडलेलीच

शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी : सोयबीनच्या दरात झपाट्याने घसरण, शेतकऱ्यांचे लक्ष लातुरच्या बाजारकडे

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली