AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत 75 हजार क्विंटल कापसाची आवक, चारा खराब झाल्यामुळे शेतकरी चिंतेत

मागील वर्षी कापसाची ५५ हजार क्विंटल आवक झाली होती. मात्र यावर्षी आवक चांगली वाढली आहे. कापसाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापूस साठवणूक करून ठेवला होता

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत 75 हजार क्विंटल कापसाची आवक, चारा खराब झाल्यामुळे शेतकरी चिंतेत
Unseasonal RainImage Credit source: tv9marathi
| Updated on: May 25, 2023 | 2:51 PM
Share

जितेंद्र बैसाणे : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात मार्च महिन्यात अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) आणि गारपिटीमुळे शेती पिकांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. तर त्यासोबतचं चाऱ्याचे देखील मोठे नुकसान झाले होते, आता गुराढोरांसाठी चारा टंचाई निर्माण होणार आहे. अवकाळी पावसामुळे चाऱ्याच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर आता नवीनच समस्या उद्भवणार आहे. शेतकरी दरवर्षी वर्षभरासाठी गुराढोरांसाठी चारा साठवणूक करून ठेवतात. मात्र यंदा अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या (farmer news) अतोनात नुकसान केलं आहे. तर गुरांना लागणारा चारा देखील खराब झाला असल्याने शेतकऱ्यांना चारा टंचाईला सामोरे जावा लागणार आहे. त्यामुळे शासनाने चारा उपलब्ध करून द्यावा अशीच काहीसी मागणी आता शेतकरी राजा करू लागला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात विक्रमी आवक झाली

शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याने यंदा नंदुरबार जिल्ह्यात विक्रमी आवक झाली आहे. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत ७५ हजार क्विंटल कापसाची आवक झाल्या असून, हंगाम लांबला असून आणखी काही दिवस हंगाम सुरू राहणार असल्याने आवक वाढण्याची शक्यता आहे. मागील वर्षी कापसाची ५५ हजार क्विंटल आवक झाली होती. मात्र यावर्षी आवक चांगली वाढली आहे. कापसाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापूस साठवणूक करून ठेवला होता, मात्र आता हळूहळू शेतकरी कापूस विक्री करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल होत आहे. मागील वर्षी कापसाला सोन्यासारखा भाव मिळाला असल्यामुळे यंदा कापसाची आवक प्रचंड वाढली आहे. परंतु शेतकऱ्यांना कापसाला अपेक्षित भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीच्या सूर आहे. परंतु कापूस किती दिवस घरी ठेवणार त्यासाठी कापूस विक्रीकडे शेतकऱ्यांच्या कल अधिक वाढला आहे.

शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याच्या घटना

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याच्या घटना घडत आहेत. बुधवारी रात्री शेतकऱ्यांनी भुईमुगाच्या शेंगा विक्रीसाठी आणल्या होत्या. मात्र व्यापाऱ्यांच्या थप्प्या मोंढ्यात असल्यामुळे शेतकऱ्यांना पोते टाकण्यासाठी जागा नव्हती. त्यामुळे व्यापाऱ्याने मुजोरी करत चक्क गेट बंद करून शेतकऱ्यांचा माल बाहेर ठेवला. मात्र शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना जाब विचारल्यानंतर व्यापाऱ्याने नरमाईची भूमिका घेऊन गेट उघडले. बाजार समितीच्या दुर्लक्षामुळे हिंगोलीच्या मोंढ्यात व्यापाराची मुजोरी वाढल्याचे पहावयास मिळत आहेत.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.