AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत 75 हजार क्विंटल कापसाची आवक, चारा खराब झाल्यामुळे शेतकरी चिंतेत

मागील वर्षी कापसाची ५५ हजार क्विंटल आवक झाली होती. मात्र यावर्षी आवक चांगली वाढली आहे. कापसाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापूस साठवणूक करून ठेवला होता

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत 75 हजार क्विंटल कापसाची आवक, चारा खराब झाल्यामुळे शेतकरी चिंतेत
Unseasonal RainImage Credit source: tv9marathi
| Updated on: May 25, 2023 | 2:51 PM
Share

जितेंद्र बैसाणे : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात मार्च महिन्यात अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) आणि गारपिटीमुळे शेती पिकांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. तर त्यासोबतचं चाऱ्याचे देखील मोठे नुकसान झाले होते, आता गुराढोरांसाठी चारा टंचाई निर्माण होणार आहे. अवकाळी पावसामुळे चाऱ्याच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर आता नवीनच समस्या उद्भवणार आहे. शेतकरी दरवर्षी वर्षभरासाठी गुराढोरांसाठी चारा साठवणूक करून ठेवतात. मात्र यंदा अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या (farmer news) अतोनात नुकसान केलं आहे. तर गुरांना लागणारा चारा देखील खराब झाला असल्याने शेतकऱ्यांना चारा टंचाईला सामोरे जावा लागणार आहे. त्यामुळे शासनाने चारा उपलब्ध करून द्यावा अशीच काहीसी मागणी आता शेतकरी राजा करू लागला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात विक्रमी आवक झाली

शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याने यंदा नंदुरबार जिल्ह्यात विक्रमी आवक झाली आहे. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत ७५ हजार क्विंटल कापसाची आवक झाल्या असून, हंगाम लांबला असून आणखी काही दिवस हंगाम सुरू राहणार असल्याने आवक वाढण्याची शक्यता आहे. मागील वर्षी कापसाची ५५ हजार क्विंटल आवक झाली होती. मात्र यावर्षी आवक चांगली वाढली आहे. कापसाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापूस साठवणूक करून ठेवला होता, मात्र आता हळूहळू शेतकरी कापूस विक्री करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल होत आहे. मागील वर्षी कापसाला सोन्यासारखा भाव मिळाला असल्यामुळे यंदा कापसाची आवक प्रचंड वाढली आहे. परंतु शेतकऱ्यांना कापसाला अपेक्षित भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीच्या सूर आहे. परंतु कापूस किती दिवस घरी ठेवणार त्यासाठी कापूस विक्रीकडे शेतकऱ्यांच्या कल अधिक वाढला आहे.

शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याच्या घटना

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याच्या घटना घडत आहेत. बुधवारी रात्री शेतकऱ्यांनी भुईमुगाच्या शेंगा विक्रीसाठी आणल्या होत्या. मात्र व्यापाऱ्यांच्या थप्प्या मोंढ्यात असल्यामुळे शेतकऱ्यांना पोते टाकण्यासाठी जागा नव्हती. त्यामुळे व्यापाऱ्याने मुजोरी करत चक्क गेट बंद करून शेतकऱ्यांचा माल बाहेर ठेवला. मात्र शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना जाब विचारल्यानंतर व्यापाऱ्याने नरमाईची भूमिका घेऊन गेट उघडले. बाजार समितीच्या दुर्लक्षामुळे हिंगोलीच्या मोंढ्यात व्यापाराची मुजोरी वाढल्याचे पहावयास मिळत आहेत.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.