AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nandurbar : शासनाने कागदी घोडे नाचण्यात दंग न राहता शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी

शेतकऱ्यांच्या पांढरं सोनू म्हणून ओळख असलेल्या कापसाला गेल्या वर्षाप्रमाणे यंदा देखील समाधान कारक दर मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. फेब्रुवारी अखेरपर्यंत दर वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला होता.

Nandurbar : शासनाने कागदी घोडे नाचण्यात दंग न राहता शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी
nandurbar newsImage Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Mar 11, 2023 | 10:26 AM
Share

जितेंद्र बैसाणे, नंदुरबार : नंदुरबार (Nandurbar) तालुक्यातील पूर्व भागातील शेतकरी (Farmer) गेल्या अनेक वर्षापासून दुष्काळाची परिस्थितीचे झळ सहन करत आहे. दरवर्षी या भागात दुष्काळाची परिस्थिती होत आहे. यासाठी शासनाने २०१९ पासून पूरक 25 टक्के अनुदान देण्याची घोषणा केली आहे. मात्र शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. चार वर्षे झाले असून अद्यापपर्यंत शेतकरी यांचे 25% पूरक अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे शासनाने पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या विचार करून लवकर मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधिकारी (Agricultural Officer) कडे केली आहे. त्यासोबत या भागात पाण्याची मोठी समस्या असल्याने या भागासाठी तापी बुराई योजना सुरू करण्याची घोषणा गेल्या अनेक वर्षापासून केली आहे. मात्र ही योजना अजूनही शासनाने तापी बुराई योजना लवकर सुरू करावी, शासनाने शेतकऱ्यांना पूरक 25 टक्के अनुदान आणि तापी बुराई योजना लवकर सुरू करावी अशी मागणी देखील शेतकरी आता करू लागले आहेत.

नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या प्रचंड नुकसान झालं आहे. नंदुरबार जिल्ह्यात सतराशे हेक्टर क्षेत्रावर नुकसान झालं असून सर्वाधिक नुकसान रब्बी हंगामातील गहू आणि ज्वारी झालं आहे. त्यासोबत पपई आणि केळीचे देखील यात नुकसान झालं असून, शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. शासनाकडून पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. लवकरच पंचनामे पूर्ण होतील, मात्र शेतकऱ्यांना मदत देखील तातडीने मिळावी अशी अपेक्षा शेतकरी करू लागला आहे. जिल्ह्यातील नवापूर, नंदुरबार आणि शहादा तालुक्यात सर्वाधिक अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे शासनाने कागदी घोडे नाचण्यात दंग न राहता प्रतिक्षेत शेतकऱ्यांना मदत लवकर मिळाला पाहिजे अशी अपेक्षा बळीराजा करू लागला आहे.

शेतकऱ्यांच्या पांढरं सोनू म्हणून ओळख असलेल्या कापसाला गेल्या वर्षाप्रमाणे यंदा देखील समाधान कारक दर मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. फेब्रुवारी अखेरपर्यंत दर वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला होता. मात्र आता मार्च अर्धा उलटत आला असतांना भाववाढीची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. घरात साठवून ठेवलेले पांढरे सोने आता शेतकऱ्यांच्या जीवावरच उठले असल्याचे दिसून येत आहे. कापसामध्ये किडे तयार होत असून या पिसवांमुळे शेतकऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या आरोग्याच्या समस्या होता असून, रुग्णालयात रुग्णांची गर्दीत वाढ होत आहे. मात्र ग्रामीण भागात आरोग्याच्या समस्या नसल्याने शेतकऱ्यांना आता शहरात रुग्णालयासाठी यावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे सोनं आता शेतकऱ्यांसाठी जीवावरच उठले असल्याचे दिसून येत आहे.

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार