AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई एपीएमसी फळ बाजारात देवगड हापूसची आवक वाढली, दर मात्र चढेच

मुंबई एपीएमसी फळ बाजारात देवगड हापूसची आवक वाढल्याचे दिसून आले मात्र, आंब्याचे दर चढेच आहेत. Alphonso Mango Navi Mumbai APMC

मुंबई एपीएमसी फळ बाजारात देवगड हापूसची आवक वाढली, दर मात्र चढेच
देवगड हापूस
| Updated on: Feb 22, 2021 | 5:11 PM
Share

नवी मुंबई: मुंबई एपीएमसी फळ बाजारात देवगड हापूसची आवक वाढल्याचे दिसून आले. मात्र, आंब्याचे दर चढेच आहेत. जवळपास 1200 पेटी देवगड हापूस तर 2500 क्रेट कर्नाटक आंबा बाजार समितीमध्ये दाखल झाला. हापूस आंब्याच्या पाच डझनाच्या पेटीला 5000 ते 8000 रुपये भाव मिळाला तर कर्नाटक आंब्याला तीन हजार ते पाच हजार प्रती क्रेट इतका दर मिळाला आहे. (Alphonso Mango and Karnataka Mango rates increased in Navi Mumbai APMC)

अवकाळी पावसाचा फटका

अवकाळी पावसामुळे रत्नागिरी आणि देवगड परिसरात आंबा पीक कमी आले आहे. एप्रिल ते मे महिन्यात मोठ्या प्रमाणात आंबा आवक वाढेल, अशी आशा आहे. आंबा सामानांच्या आवाक्यात लवकर येणाच्या अंदाज दिसत नाही.

देवगड हापूसची आवक वाढली, दर मात्र चढेच

फळांचा राजा आंबा मुंबई एपीएमसी बाजारात येऊ लागल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्याची आवक बाजारात हळूहळू वाढू लागलीय. जवळपास हापूस 1200 पेटी तर 2500 क्रेट कर्नाटकचा आंबा बाजारात आला आहे. तर मार्च महिना मध्यावर असातना आंब्याची आवक वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

देवगडची पेटी 5 ते 8 हजाराला

सध्या देवगड हापूस पाच डझनाच्या पेटीला 5 हजार ते हजार रुपये भाव मिळत आहे. तर, कर्नाटकी आंबा तीन हजार ते पाच हजार प्रती क्रेट विकला जात आहे. दिवसेंदिवस आंबा बाजारात वाढेल परंतू आंब्याचे दर मात्र लवकर कमी होतील असे वाटत नाही. त्यामुळे अजून महिनाभर तरी आंबा सामान्य नागरिकांच्या आवाक्यात येणार नसल्याचे अंदाज व्यक्त केला जात आहे.

अवकाळी पावसामुळे रत्नागिरी आणि देवगड परिसरात आंबा पीक कमी असल्याचे बोलले जात आहे. तर, एप्रिल ते मे महिन्यात मोठ्या प्रमाणात आंबा आवक वाढेल. त्यावेळी मात्र आंबा सामानांच्या आवाक्यात येऊ शकतो. असा अंदाज व्यापारी विजय ढोले यांनी व्यक्त केला. .

फवारणीचा खर्च वाढणार

वातावरणातील बदल आणि पावसामुळे आंब्याच्या मोहोरावर रोगांचा प्रादुर्भाव वाढणार आहे. त्यामुळे फवराणीचा खर्चाची भर पडणार आहे. सध्या हवामानातील बदलामुळे पालवीला मोहोर आलेला नाही. तर १५ मे नंतरच्या आंब्यावर संक्रांत येण्याची चिन्हे आहेत त्यामुळे आंबा बागायतदार धास्तावलाय.

आंबा धोक्यात का आलंय त्याची कारणे

आंबा बागायतदार तुकाराम घवाळी हापूस आंब्याला थंडी गायब झाल्यानं अपेक्षित मोहोर आलेला नाही. सध्या सुरु असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीसह ढगाळ वातावरणामुळे मोहोरातून तयार झालेली कणी गळून जाणार आहे. पाऊस आणि उन्हाळा आंब्याच्या मोहोराला धोकादायक वातावरण समजले जाते. त्यामुळे पालवीला मोहर फुटण्याची शक्यता कमी असल्याचे तुकाराम घवाळी यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

PM Kisan: 2.89 कोटी शेतकरी किसान सन्मान योजनेपासून वंचित, तुम्हाला पैसे मिळाले का?

पीएम किसान सन्मान : 60 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले 2 हजार रुपये, तुम्हाला मिळाले का?

(Alphonso Mango and Karnataka Mango rates increased in Navi Mumbai APMC)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.