AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget 2022 : अर्थसंकल्पात शेती आणि शेतकऱ्यांना काय मिळणार? खाद्यतेलाच्या आत्मनिर्भरतेचं धोरण राहण्याची शक्यता

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण या 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करतील. शेतकऱ्यांना आणि शेती क्षेत्राला या अर्थसंकल्पापासून मोठ्या अपेक्षा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 मध्ये दुप्पट करण्याचं जाहीर केलं होतं.

Budget 2022 : अर्थसंकल्पात शेती आणि शेतकऱ्यांना काय मिळणार? खाद्यतेलाच्या आत्मनिर्भरतेचं धोरण राहण्याची शक्यता
farm
| Edited By: sagar joshi | Updated on: Jan 25, 2022 | 7:57 AM
Share

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प (Union Budget) सादर करतील. या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना आणि शेती क्षेत्राला (Agriculture) मोठ्या अपेक्षा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचं जाहीर केलं होतं. अर्थमंत्री आता 2022 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. जेणेकरून शेती क्षेत्रावर त्याचा चांगला परिणाम होईल. किमान आधारभूत किंमतीमध्ये होणारी वाढ आणि कृषी कायदे मागे घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा सरकारकडून वाढलेल्या आहेत. यंदा सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कमी व्याज दरावर कर्ज, शेती क्षेत्रासाठी नवतंत्रज्ञान, कृषी पायाभूत सुविधा, वेगवेगळी पिके, यूरिया वरील अवलंबित्व कमी करणे या सारख्या मुद्द्यावर निर्णय होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

छोट्या शेतकऱ्यांसाठी पॅकेज?

इंडिया इन्फोलाइनच्या रिपोर्टमध्ये येत्या अर्थसंकल्पात छोट्या शेतकऱ्यांसाठी कर्जाची सुविधा आणखी योग्य बनवण्यासाठी सरकार लक्ष देण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आलेय. भारतात छोट्या शेतकऱ्यांनी संख्या सर्वाधिक असून त्यांना वेळेवर आणि सुलभरित्या कर्ज मिळावा यासाठी सरकार प्रयत्न करण्याची शक्यता आहे. याशिवाय पीक विमा योजना शेतकऱ्यांच्यासाठी आणखी सोयीचे आणि त्याच्यामध्ये विस्तार करण्याबाबत घोषणा होऊ शकते. शेती क्षेत्रासाठी नव्या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार पावले उचलण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. ठिबक सिंचन आणि लिफ्ट इरिगेशन यासारख्या सुविधांवर सरकार भर देऊन सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करू शकतं. याशिवाय कर सवलत, कमी व्याजदरावर कर्ज अशा प्रकारच्या घोषणा देखील सरकार करू शकतं. पेरणीपूर्वी आणि पिकं काढल्यानंतर त्याची विक्री करण्यासाठी पायाभूत सुविधांची स्थिती चांगली नाही. मोबाईल माती परिक्षण, शीतगृह,वाहतूक आणि गोदाम यासाठी देखील सरकार मोठ्या तरतुदी करु शकतं.

खाद्यतेलामध्ये आत्मनिर्भर होण्याचं लक्ष

भारताला अद्यापही खाद्यतेलासाठी आयातीवर अवलंबून राहावं लागत आहे, सरकारला दरवर्षी मोठ्या प्रमाणात विदेशी चलन यावर खर्च करावं लागतं. या अर्थ संकल्पात केंद्र सरकार खाद्यतेलनिर्मितीसाठी तेलबियांच्या शेतीला प्रोस्ताहन देण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करु शकते. 1990 मध्ये खाद्यतेलात भारत आत्मनिर्भर होते. मात्र, त्यानंतर स्थिती बदलत गेली.

जैविक शेतीला प्रोत्साहन

गेल्या काही वर्षांपासून जैविक शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढतो आहेत काही राज्य सरकारं विविध पिकांच्या शेतीला प्रोत्साहन देण्याचं काम सुरु आहे. केंद्रीय मंत्री जैविक शेती आणि विविध पिकांच्या शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी योजना बनवू शकतात. तर, शेतकऱ्यांचं यूरियावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्राकडून योजना जाहीर होऊ शकते. याशिवाय लिक्विड यूरियाला प्रोस्ताहन देण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या:

भाजप आमदाराच्या मुलाचा कार अपघातात मृत्यू, विजय रहांगदळेंच्या मुलाचा वर्ध्यातील कार अपघातात दुर्दैवी अंत

National Tourism Day 2022 | राष्ट्रीय पर्यटन दिवस कधीपासून साजरा केला जातो, महत्त्व काय आहे? जाणून घ्या

Budget 2022 Farmers and agriculture sector have many expectations from union budget 2022 agriculture budget from Nirmala Sitharaman

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ