AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Success Story : पीक पध्दतीत बदलाने उत्पादनात वाढ अन् हाताला काम, इगतपुरीच्या शेतकऱ्याने करुन दाखवलं!

राज्यात मराठवाडा हे रेशीम शेतीचे मुख्य केंद्र बनत आहे. विशेषत: जालना येथील वाढते क्षेत्र आणि बाजारपेठेचा आधार केवळ मराठावड्यातील शेतकऱ्यांनाच नाही तर आता उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही मिळत आहे. सखाहरी जाधव यांनी रेशीम शेतीचा प्रयोग दीड एकरामध्येच केला पण तो यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम आणि अत्याधुनिक पध्दती यावर अधिक भर दिला. तुती लागवडीचे सहा महिन्यात पहिले पीक येते.

Success Story : पीक पध्दतीत बदलाने उत्पादनात वाढ अन् हाताला काम, इगतपुरीच्या शेतकऱ्याने करुन दाखवलं!
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: May 26, 2022 | 9:35 AM
Share

नाशिक : द्राक्ष बागायतदारांचा जिल्हा म्हणून नाशिकची ओळख आहे. शिवाय आजही शेतकऱ्यांचा कल हा पारंपरिक शेतीवरच आहे. मात्र, पारंपरिक शेतीतून मिळणारे उत्पन्न आणि रासायनिक खतांचा अतिवापर झाल्यास संभाव्य धोका ओळखता इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्याने निवडलेला वाट अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. काळाच्या ओघात राज्यात रेशीम शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. विशेषत: मराठवाड्यात रेशीम शेतीचे क्षेत्र वाढत असताना इगतपुरी येथील शेतकऱ्यानेही रेशीम शेतीचा प्रयोग करुन केवळ उत्पादनात वाढच केली नाही तर बेरोजगारांच्या हातालाही काम मिळवून दिले आहे. विशेष म्हणजे अत्याधुनिक पध्दतीचे तंत्र वापरून हा यशस्वी प्रयोग कृष्णनगरचे शेतकरी सखाहरी जाधव यांनी केला आहे.

उत्पादन उत्तर महाराष्ट्रात बाजारपेठ मराठावाड्यात

राज्यात मराठवाडा हे रेशीम शेतीचे मुख्य केंद्र बनत आहे. विशेषत: जालना येथील वाढते क्षेत्र आणि बाजारपेठेचा आधार केवळ मराठावड्यातील शेतकऱ्यांनाच नाही तर आता उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही मिळत आहे. सखाहरी जाधव यांनी रेशीम शेतीचा प्रयोग दीड एकरामध्येच केला पण तो यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम आणि अत्याधुनिक पध्दती यावर अधिक भर दिला. तुती लागवडीचे सहा महिन्यात पहिले पीक येते. रेशीमच्या अळ्यांना बाजारात 500 ते 600 रुपये किलो प्रमाणे बाजारभाव मिळतो.दर महिन्याला साधारण 1 लाख 80 हजार उत्पन्न त्यांना मिळत आहे. शिवाय यासाठी जालना बाजारपेठ त्यांनी जवळ केली आहे.

अनोख्या प्रयोगाला आधुनिकतेची जोड

रेशीम शेतीचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी जाधव यांनी लागवडापासूनच योग्य ती काळजी घेतली आहे. ठिबकसिंचन, योग्य अंतरावर लागवड, तुती लागवडीसाठी जीवामृत, शेणखत ,गांडूळ खत या सेंद्रिय खतांचा वापर करून उत्पादन मिळाले. जाधव हे महाराष्ट्रात शेतकऱ्यांना देखील मार्गदर्शन देण्याचे महत्वपूर्ण काम करीत असतात. शिवाय या अनोख्या उपक्रमात त्यांना पत्नी तुळसाबाई, वडिल, मुले यांचे देखील सहकार्य लाभत आहे. यंदा रेशीमला चांगला भाव असल्याने वर्षाकाठी त्यांना 8 ते 9 लाखाचे उत्पन्न मिळाले आहे.

आदर्श शेतकरी पुरस्कार अन् रेशीम संचानालयाकडूनही दखल

एका शेतकऱ्याचा वेगळा प्रयोग इतरांसाठी प्रेरणादायी हा ठररोच. पारंपरिक शेतीमध्ये होणारा खर्च, रासायनिक खतांचे दुष्परिणाम, जमिनीचा खालावत चाललेला पोत यामुळे जाधव यांनी घेतलेल्या निर्णयाचे फलित आज मिळत आहे. कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते आदर्श शेतकरी पुरस्कार तसेच महाराष्ट्र शासनाचा रेशीम संचानालयतर्फे रेशीम श्री पुरस्कार देखील नाना जाधव यांना मिळाला आहे. पीक पध्दतीमध्ये बदल करण्यासाठी त्यांना बेलगाव कुऱ्हेचे आदर्श शिक्षक विष्णू बोराडे यांनी प्रोत्साहित केले होते.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा