AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थंडीचे अनेक फायदे, अवकाळीचा मात्र धोकाच, कसा होतो पिकांवर परिणाम? वाचा सविस्तर

सध्या हिवाळ्यात पावसाळ्याची अनुभती येत आहे. दर पंधरा दिवासाला अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे फळबागा तसेच दोन्ही हंगामातील पिकांचे नुकसान होत आहे. तर गुलाबी थंडीमुळे रब्बी हंगामातील पिकांची वाढ जोमात होत असून आंबा बागांना मोहरही बहरत आहे. एवढेच नाही तर वाढत असलेल्या थंडीमुळे साखरेचा नैसर्गिक उतारही वाढतो.

थंडीचे अनेक फायदे, अवकाळीचा मात्र धोकाच, कसा होतो पिकांवर परिणाम? वाचा सविस्तर
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Dec 31, 2021 | 11:49 AM
Share

लातूर : सध्या हिवाळ्यात (Change in environment) पावसाळ्याची अनुभती येत आहे. दर पंधरा दिवासाला अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे फळबागा तसेच दोन्ही हंगामातील पिकांचे नुकसान होत आहे. तर (benefit scolding crop) गुलाबी थंडीमुळे रब्बी हंगामातील पिकांची वाढ जोमात होत असून आंबा बागांना मोहरही बहरत आहे. एवढेच नाही तर वाढत असलेल्या थंडीमुळे साखरेचा नैसर्गिक उतारही वाढतो. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या या वातावरणामुळे ‘कहीं खुशी कहीं गम’ अशीच अवस्था झाली आहे. शेतकऱ्यांनी उत्पादनवाढीसाठी एक ना अनेक पर्याय अवलंबले तरी गेल्या वर्षभरापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे पीकाचे नुकसान हे ठरलेलेच अशीच अवस्था आहे. मात्र, सध्याच्या अवकाळी पावसामध्येही गारठा टिकून असल्याने आंब्याचा मोहर अणखीन फुलेल अशीच आशा व्यक्त केली जात आहे.

रब्बी पिकांबाबत कहीं खुशी कहीं गम…

राज्यात रब्बी हंगामाचा पेरा होऊन महिन्याभराचा कालावढी लोटलेला आहे. मुबलक पाणी आणि पोषक वातावरणामुळे ज्वारी, गहू, हरभरा, सुर्यफूल, राजमा या पिकांची जोमात वाढ झाली आहे. राजमा आणि हरभरा ही पिके फुलोऱ्यात असतानाच गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारीची पडझड झाली आहे तर हरभऱ्यावर घाटी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. दुसरीकडे राजमा आणि सुर्यफूल यांची वाढ झाली नसल्याने या पिकांना धोका नाही पण पावसामध्ये सातत्य राहिले तर मात्र, परिणाम होणार आहे.

आंब्याचा मोहर बहरला

मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा पिकाचा मोहर गळाला होता. आंबा पिक दुसऱ्या टप्प्यात असतानाच मोहर गळती झाल्यामुळे उत्पादनाबाबत शेतकऱ्यांच्या आशा मावळल्या होत्या. पण वाढत्या थंडीमुळे पुन्हा मोहर बहरत आहे. त्यामुळे उशिरा का होईना पण आंबा लागवडीस सुरवात होणार असा आशावाद फळबागायतदार शेतकऱ्यांना आहे. थंडीमुळे पोषक वातावरण झाले आहे तर दुसरीकडे गेल्या दोन दिवसांपासून कोकणातही ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांचा जीव पुन्हा टांगणीला लागलेला आहे.

साखरेच्या उताऱ्यामध्ये नैसर्गिक वाढ

डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला झालेल्या पावसामुळे खालावलेला साखरेचा उतार पुन्हा वाढत आहे. वाढत्या थंडीमुळेच हा बदल होत आहे. अवकाळी पावसामुळे साखर उद्योगाचे मोठे नुकसान झाले होते. अपरिपक्वच ऊस हा गाळपासाठी कारखान्यावर दाखल होत होता. यामुळे साखर उताऱ्यात सरासरी 1 टक्क्याची घट झाली होती. आता 8 ते 10 दिवसांपासून विशेषत: ऊसाच्या पट्ट्यामध्ये थंडीत वाढ झालेली आहे. अनेक ठिकाणी पारा हा 15 अंश सेल्सिअसपर्यंत आलेला आहे. याचा परिणाम साखरेच्या उताऱ्यावर झालेला आहे. त्यामुळे बाधित क्षेत्रातील ऊसही आता साखर कारखान्यावर दाखल होत आहे.

संबंधित बातम्या :

Kharif Season : पावसाने नाही तर कशामुळे घटले राज्यात तुरीचे उत्पादनात? आता खरेदी केंद्राचाच आधार

Red Chilly : नंदुरबारच्या बाजारपेठेत ‘तेजा’ मिरचीची ची तेजी, तब्बल 200 एकरात लाल मिरचीचे वाळवण

काय सांगता ? शेतीकामासाठी नाईट शिफ्ट अन् मजूरांना ओव्हरटाईमही देऊन, कशामुळे आली ही वेळ?

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा