AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या मार्गावर बांबू क्रास बॅरिअरची निर्मिती; येथे करण्यात आला देशातील पहिला प्रयोग

बालकोआ प्रकारातील हा बांबू विशिष्ट प्रक्रिया करून अधिक मजबूत व बारमाही वातावरणासाठी टिकाऊ बनविण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बांबूची उपलब्धता आहे.

या मार्गावर बांबू क्रास बॅरिअरची निर्मिती; येथे करण्यात आला देशातील पहिला प्रयोग
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Mar 06, 2023 | 2:12 PM
Share

चंद्रपूर : गडचिरोली, चंद्रपूर भागात मोठ्या प्रमाणात बांबूचे उत्पादन होते. बांबू हा वेगवेगळ्या पद्धतीने वापरला जातो. त्यामुळे या बांबूपासून वेगवेगळ्या वस्तू तयार केल्या जातात. रस्त्याच्या बाजूल बॅरिअर म्हणूनही आता बांबूचा वापर केला गेला. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी बांबू क्रास बॅरिअरबाबत ट्विट करत माहिती दिली. देशात प्रथमच रस्ते उभारणी कामात बांबू क्रास बॅरिअरचा वापर करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा ते वणी या मार्गाचे नव्याने बांधकाम केले जात आहे. यादरम्यान चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर वर्धा नदीवर मोठा पूल बांधला जात आहे. या पुलाच्या परिसरात या बांबू क्रास बॅरिअरची उभारणी करण्यात आली आहे. एरवी देशभर महामार्गाच्या बाजूला स्टील मिश्रित क्रास बॅरिअरची उभारणी केली जाते. मात्र बांबूचा वापर करून क्रास बॅरिअरची उभारणी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

बांबू व्यवसायाला चालना मिळणार

बालकोआ प्रकारातील हा बांबू विशिष्ट प्रक्रिया करून अधिक मजबूत व बारमाही वातावरणासाठी टिकाऊ बनविण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बांबूची उपलब्धता आहे. अशा स्थितीत पर्यावरण अनुकूल असलेला बांबू रस्ते निर्मितीच्या कामात क्रास बॅरिअरच्या रूपात वापरला गेल्यास बांबू व्यवसायाला चालना मिळणार आहे. बांबू हा बहुउपयोगी आहे. त्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवल्या जातात. घरसुद्धा फक्त बांबूपासून तयार केला जातो. आता रस्त्याच्या बाजूला बॅरिअर म्हणून या बांबूचा वापर करण्यात आला.

२०० मीटर बांबू क्रास बॅरिअर

बांबू क्रास बॅरिअरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या बॅरिअरचा 50 ते 60 टक्के फेरवापर करता येणार आहे. दळणवळण मंत्रालयाच्या देशातील विविध प्रयोगशाळांमध्ये या बांबू क्रास बॅरिअरची अग्नीरोधक व क्षमता विषयक तपासण्या केल्यानंतर याची उभारणी करण्यात आली. सध्या 200 मीटर बांबू क्रास बॅरिअर उभारण्यात आला आहे. या प्रयोगाचे परिणाम पाहून देशात इतरत्र असा प्रयोग राबविला जाणार आहे. बांबू क्रास बॅरिअरच्या उभारणीमुळे देशात रस्ते निर्मितीच्या बाबतीत मेक इन इंडियाचा नवा अध्याय लिहिला जाणार आहे.

Follow Us
ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याचं धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच मोठं
Omraje Nimbaklar | ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याने धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच केलं मोठं विधान, पुन्हा...
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री
CM Devendra Fadnavis | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कुटुंबीयांच्या भेटीला
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत...
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत... बड्या नेत्याने एक एक करत सगळंच सांगितलं
एकच खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री
खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री; त्याला सगळंच... डोकं चक्रावणारा खुलासा
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन नेत्यांमध्ये रुसवारुसवी... कारण अत्यंत चकित करणार
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची ऑफर? 
मृत्युदंड की जन्मठेप? कोर्टाने सुट्टीच्या दिवशी... मुख्यमंत्र्यांचं
मृत्युदंड की जन्मठेप? कोर्टाने सुट्टीच्या दिवशी... मुख्यमंत्र्यांचं नसरापूर अत्याचार प्रकरणी मोठं विधान
राज ठाकरेंच्या संतापानंतर जैन समाज नरमला; शिवाजी महाराजांच्या जिरे...
राज ठाकरेंच्या संतापानंतर जैन समाज नरमला; शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावरील वाद... शिवतिर्थावर मोठं घडलं?
शिवसेनेने दान केलेली 4 किलो चांदीची ती विट अन्... अयोध्या मंदिरातील चो
शिवसेनेने दान केलेली 4 किलो चांदीची ती विट अन्... अयोध्या मंदिरातील चोरीबाबत राऊतांचं खळबळजनक ट्वीट
Sanjay Raut | अशी अवस्था होईल की... पुन्हा कधीच सत्ता येणार नाही...
Sanjay Raut | अशी अवस्था होईल की... पुन्हा कधीच सत्ता येणार नाही... संजय राऊतांनी आज पत्रकार परिषदेत हे काय सांगून टाकलं?