AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Agriculture News : कापसाचा दर पुन्हा 200 रुपयांनी घसरला, शेतकऱ्यांची चिंता वाढली

दरवाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांचा कापूस साठवणीकडे कल वाढत असून सद्यस्थितीत दरवाडीची शक्यता नसल्याचे तज्ज्ञांकडून जाहीर करण्यात आल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.

Agriculture News : कापसाचा दर पुन्हा 200 रुपयांनी घसरला, शेतकऱ्यांची चिंता वाढली
Agriculture News TodayImage Credit source: tv9marathi
| Updated on: Feb 07, 2023 | 9:43 AM
Share

अमरावती : कापसाला योग्य भाव (Fair price for cotton) मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना (Farmer) मोठा अडचणीचा सामना करावा लागत आहे. शेतकरी कापूसाची विक्री करण्यासाठी वेगवेगळ्या आयडीया शोधून काढत आहेत. गेल्यावर्षी अमरावती (Amravati) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापसाला उच्चांकी तेरा हजार रुपये क्विंटल असा दर मिळाला होता. मात्र यावर्षी दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. पाच दिवसात क्विंटलचा दर 200 रुपयाने कमी होऊन कापूस पुन्हा आठ हजार रुपये क्विंटलवर आल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.

दरवाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांचा कापूस साठवणीकडे कल वाढत असून सद्यस्थितीत दरवाडीची शक्यता नसल्याचे तज्ज्ञांकडून जाहीर करण्यात आल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. यंदाच्यावर्षी कापसाचं पीक सगळीकडं चांगलं आलं आहे. परंतु दर मिळत नसल्यामुळे नेमकं काय करावं अशी स्थिती शेतकऱ्यांच्या समोर उभी राहिली आहे.

कापसाला भाव मिळत नसल्याने तहसील कार्यालयावर मोर्चा

शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळत नसल्याच्या निषेधार्थ जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात शेतकऱ्यांसह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात केली. महाविकास आघाडीच्या सरकारने मागच्या वर्षी शेतकऱ्यांच्या कापसाला दहा हजार रुपये भाव दिला होता, मात्र यावर्षी कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याचा कापूस हा घरामध्ये पडून असून राज्य सरकार व केंद्र सरकार शेतकऱ्याची चेष्टा करत असल्याचा आरोप शिंदे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी केला आहे.

धाराशिव आणि परळीत अवकाळी पावसाचा कहर! ज्वारी पिकाचे नुकसान
धाराशिव आणि परळीत अवकाळी पावसाचा कहर! ज्वारी पिकाचे नुकसान.
प्रेम विवाहासाठी आता आई-वडिलांची परवानगी आवश्यक!
प्रेम विवाहासाठी आता आई-वडिलांची परवानगी आवश्यक!.
मुंबईच्या रुईया कॉलेज परिसरात ग्रंथोत्सव 2026 ला सुरुवात
मुंबईच्या रुईया कॉलेज परिसरात ग्रंथोत्सव 2026 ला सुरुवात.
विलिनीकरण होणार की नाही? अनिल देशमुख स्पष्टच बोलले
विलिनीकरण होणार की नाही? अनिल देशमुख स्पष्टच बोलले.
राज्यातील एक सुजलाम सुफलाम जिल्हा दाखवा; ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
राज्यातील एक सुजलाम सुफलाम जिल्हा दाखवा; ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल.
राज्य मागे पडले; शेतकरी, बेरोजगारी, गुंतवणूक..वडेट्टीवार सरकारवर बरसले
राज्य मागे पडले; शेतकरी, बेरोजगारी, गुंतवणूक..वडेट्टीवार सरकारवर बरसले.
विरोधकांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला विरोध
विरोधकांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला विरोध.
ठाकरे बंधूंच्या युतीवर मिठाचा खडा पडलाय?राऊतांनी दोन शब्दात दिले उत्तर
ठाकरे बंधूंच्या युतीवर मिठाचा खडा पडलाय?राऊतांनी दोन शब्दात दिले उत्तर.
चंद्रपूर महापौर वादावर संजय राऊतांचा पलटवार, संपूर्ण खापर शिवसेनेवर...
चंद्रपूर महापौर वादावर संजय राऊतांचा पलटवार, संपूर्ण खापर शिवसेनेवर....
भरधाव कारच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू; नागपूरमधील दुर्दैवी घटना
भरधाव कारच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू; नागपूरमधील दुर्दैवी घटना.