AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Agriculture News : कापसाचा दर पुन्हा 200 रुपयांनी घसरला, शेतकऱ्यांची चिंता वाढली

दरवाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांचा कापूस साठवणीकडे कल वाढत असून सद्यस्थितीत दरवाडीची शक्यता नसल्याचे तज्ज्ञांकडून जाहीर करण्यात आल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.

Agriculture News : कापसाचा दर पुन्हा 200 रुपयांनी घसरला, शेतकऱ्यांची चिंता वाढली
Agriculture News TodayImage Credit source: tv9marathi
| Updated on: Feb 07, 2023 | 9:43 AM
Share

अमरावती : कापसाला योग्य भाव (Fair price for cotton) मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना (Farmer) मोठा अडचणीचा सामना करावा लागत आहे. शेतकरी कापूसाची विक्री करण्यासाठी वेगवेगळ्या आयडीया शोधून काढत आहेत. गेल्यावर्षी अमरावती (Amravati) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापसाला उच्चांकी तेरा हजार रुपये क्विंटल असा दर मिळाला होता. मात्र यावर्षी दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. पाच दिवसात क्विंटलचा दर 200 रुपयाने कमी होऊन कापूस पुन्हा आठ हजार रुपये क्विंटलवर आल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.

दरवाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांचा कापूस साठवणीकडे कल वाढत असून सद्यस्थितीत दरवाडीची शक्यता नसल्याचे तज्ज्ञांकडून जाहीर करण्यात आल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. यंदाच्यावर्षी कापसाचं पीक सगळीकडं चांगलं आलं आहे. परंतु दर मिळत नसल्यामुळे नेमकं काय करावं अशी स्थिती शेतकऱ्यांच्या समोर उभी राहिली आहे.

कापसाला भाव मिळत नसल्याने तहसील कार्यालयावर मोर्चा

शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळत नसल्याच्या निषेधार्थ जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात शेतकऱ्यांसह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात केली. महाविकास आघाडीच्या सरकारने मागच्या वर्षी शेतकऱ्यांच्या कापसाला दहा हजार रुपये भाव दिला होता, मात्र यावर्षी कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याचा कापूस हा घरामध्ये पडून असून राज्य सरकार व केंद्र सरकार शेतकऱ्याची चेष्टा करत असल्याचा आरोप शिंदे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी केला आहे.

Follow Us
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.
भाजप मोर्चामुळे वाहतूक कोंडी; संतप्त महिलेचा मंत्री महाजनांना थेट जाब
भाजप मोर्चामुळे वाहतूक कोंडी; संतप्त महिलेचा मंत्री महाजनांना थेट जाब.
मोठी बातमी! नाशिकनंतर पुण्यातही कॉर्पोरेट जिहाद? ऑफिसच्या रेस्टरूमध्ये
मोठी बातमी! नाशिकनंतर पुण्यातही कॉर्पोरेट जिहाद? ऑफिसच्या रेस्टरूमध्ये.
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला आज जामीन मिळणार का?
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला आज जामीन मिळणार का?.