AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Banana : अवकाळीतून सुटका आता वाढत्या ऊन्हाच्या झळा, केळी उत्पादकांसाठी ‘बुरे दिन’

गेल्या वर्षभरात निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम हा शेती उत्पादनावर झालेला आहे. कधी अवकाळी तर कधी कडाक्याची थंडी हे कमी म्हणून आता तापमानात अशी काय वाढ झाली आहे की, फळबागा करपून जात आहेत. केळी हे बारमाही घेतले जाणारे फळपीक असले तरी गेल्या वर्षभरात यामधून चांगले उत्पन्न शेतकऱ्यांना मिळालेले नाही. आता रमजान महिन्याच्या तोंडावर अधिकचा दर मिळेल या आशेवर असणाऱ्या शेतकऱ्यांचा हिरमोड हा या वाढत्या उन्हाने केला आहे.

Banana : अवकाळीतून सुटका आता वाढत्या ऊन्हाच्या झळा, केळी उत्पादकांसाठी 'बुरे दिन'
वाढत्या तापमानामुळे केळी बागा करपत असल्याचे चित्र नांदेड जिल्ह्यामध्ये पाहवयास मिळत आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Mar 31, 2022 | 1:18 PM
Share

नांदेड : गेल्या वर्षभरात (The vagaries of nature) निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम हा शेती उत्पादनावर झालेला आहे. कधी (Unseasonal Rain) अवकाळी तर कधी कडाक्याची थंडी हे कमी म्हणून आता (Temperature Increase) तापमानात अशी काय वाढ झाली आहे की, फळबागा करपून जात आहेत. केळी हे बारमाही घेतले जाणारे फळपीक असले तरी गेल्या वर्षभरात यामधून चांगले उत्पन्न शेतकऱ्यांना मिळालेले नाही. आता रमजान महिन्याच्या तोंडावर अधिकचा दर मिळेल या आशेवर असणाऱ्या शेतकऱ्यांचा हिरमोड हा या वाढत्या उन्हाने केला आहे. कारण नांदेडचा पारा गेल्या दोन दिवसांपासून 40 अंश सेल्सिअसपेक्षाही अधिक आहे. त्यामुळे केळीबागा करपून जात आहे. केळीची पाने जागेवरच जळून जात आहेत. त्यामुळे वाढीव उत्पन्न तर सोडाच पण या बागा जोपासायच्या कशा असा सवाल शेतकऱ्यांसमोर आहे.

वर्षभर सरासरी एवढाही दर नाही

केळी हे बारमाही घेतले जाणारे पीक असले तरी गेल्या वर्षभरात समाधानकारक दर मिळालेला नाही. अवकाळीमुळे उत्पादनात घट झाली पण मागणीच नसल्याने चढे दर शेतकऱ्यांना मिळाले नाही. अवकाळीनंतर थंडीमध्येही केळीला मागणी राहिली नाही. याऊलट अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे करपा, खोडकिड या रोगांचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे पदरुन पैसे खर्चून शेतकऱ्यांना बागा जोपासाव्या लागल्या होत्या. आता रमजानच्या पवित्र महिन्यात केळीला अधिकचा दर मिळेल असा आशावाद होता पण वाढत्या ऊनामुळे उत्पादन तर सोडाच पण बागा जोपासाव्या कशा असा सवाल शेतकऱ्यांसमोर आहे.

तापमान वाढीचे नवनवे उच्चांक

ऐन सुगी सुरु असतानाच तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून नांदेडचा पारा तर 40 अंश सेल्सिअसपेक्षाही अधिक आहे. त्यामुळे याचा परिणाम उन्हाळी सोयाबीनवरही होत आहे. पिकांची वाढ खुंटली असून भविष्यात उत्पादनावरही परिणाम होणार असल्याचा अंदाज आहे. वाढणारे तापमान केळी उत्पादकांसाठी तापदायक ठरलंय, त्यातच सध्या नांदेडमध्ये रोजच तापमान नवनवे उच्चांक गाठत असल्याने फळबागा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

केळीच्या मागणीत घट

निसर्गाच्या लहरीपणामुळे फळपिकांचा दर्जाही सुधारला नाही आणि उत्पादनात घट होऊन दर मिळाले नाहीत. आंब्याप्रमाणेच आता केळीची अवस्था झाली आहे. उत्पादन घटूनही अधिकचा दर सोडा आहे त्या दरात केळीची विक्री होत नाही. रमजान महिन्यात केळीच्या मागणीत वाढ होत असते पण व्यापारीच शेतकऱ्यांकडे फिरकत नसल्याने कवडीमोल दरात केळी विक्री करावी लागणार आहे.

संबंधित बातम्या :

Photo Gallery : गोठ्याला लागलेल्या आगीत मुकी जनावरेही भाजली, शेतकऱ्याच्या स्वप्नाचा चक्काचूर!

Sugarcane : वर्षभर जोपासलेला ऊस शेतकऱ्यानेच पेटवला..! काडी लावताच फडात कारखान्याची गाडी

Latur : अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायम, लातूरच्या पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना काय दिले आश्वासन?

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.