Banana : अवकाळीतून सुटका आता वाढत्या ऊन्हाच्या झळा, केळी उत्पादकांसाठी ‘बुरे दिन’

गेल्या वर्षभरात निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम हा शेती उत्पादनावर झालेला आहे. कधी अवकाळी तर कधी कडाक्याची थंडी हे कमी म्हणून आता तापमानात अशी काय वाढ झाली आहे की, फळबागा करपून जात आहेत. केळी हे बारमाही घेतले जाणारे फळपीक असले तरी गेल्या वर्षभरात यामधून चांगले उत्पन्न शेतकऱ्यांना मिळालेले नाही. आता रमजान महिन्याच्या तोंडावर अधिकचा दर मिळेल या आशेवर असणाऱ्या शेतकऱ्यांचा हिरमोड हा या वाढत्या उन्हाने केला आहे.

Banana : अवकाळीतून सुटका आता वाढत्या ऊन्हाच्या झळा, केळी उत्पादकांसाठी 'बुरे दिन'
वाढत्या तापमानामुळे केळी बागा करपत असल्याचे चित्र नांदेड जिल्ह्यामध्ये पाहवयास मिळत आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 31, 2022 | 1:18 PM

नांदेड : गेल्या वर्षभरात (The vagaries of nature) निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम हा शेती उत्पादनावर झालेला आहे. कधी (Unseasonal Rain) अवकाळी तर कधी कडाक्याची थंडी हे कमी म्हणून आता (Temperature Increase) तापमानात अशी काय वाढ झाली आहे की, फळबागा करपून जात आहेत. केळी हे बारमाही घेतले जाणारे फळपीक असले तरी गेल्या वर्षभरात यामधून चांगले उत्पन्न शेतकऱ्यांना मिळालेले नाही. आता रमजान महिन्याच्या तोंडावर अधिकचा दर मिळेल या आशेवर असणाऱ्या शेतकऱ्यांचा हिरमोड हा या वाढत्या उन्हाने केला आहे. कारण नांदेडचा पारा गेल्या दोन दिवसांपासून 40 अंश सेल्सिअसपेक्षाही अधिक आहे. त्यामुळे केळीबागा करपून जात आहे. केळीची पाने जागेवरच जळून जात आहेत. त्यामुळे वाढीव उत्पन्न तर सोडाच पण या बागा जोपासायच्या कशा असा सवाल शेतकऱ्यांसमोर आहे.

वर्षभर सरासरी एवढाही दर नाही

केळी हे बारमाही घेतले जाणारे पीक असले तरी गेल्या वर्षभरात समाधानकारक दर मिळालेला नाही. अवकाळीमुळे उत्पादनात घट झाली पण मागणीच नसल्याने चढे दर शेतकऱ्यांना मिळाले नाही. अवकाळीनंतर थंडीमध्येही केळीला मागणी राहिली नाही. याऊलट अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे करपा, खोडकिड या रोगांचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे पदरुन पैसे खर्चून शेतकऱ्यांना बागा जोपासाव्या लागल्या होत्या. आता रमजानच्या पवित्र महिन्यात केळीला अधिकचा दर मिळेल असा आशावाद होता पण वाढत्या ऊनामुळे उत्पादन तर सोडाच पण बागा जोपासाव्या कशा असा सवाल शेतकऱ्यांसमोर आहे.

तापमान वाढीचे नवनवे उच्चांक

ऐन सुगी सुरु असतानाच तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून नांदेडचा पारा तर 40 अंश सेल्सिअसपेक्षाही अधिक आहे. त्यामुळे याचा परिणाम उन्हाळी सोयाबीनवरही होत आहे. पिकांची वाढ खुंटली असून भविष्यात उत्पादनावरही परिणाम होणार असल्याचा अंदाज आहे. वाढणारे तापमान केळी उत्पादकांसाठी तापदायक ठरलंय, त्यातच सध्या नांदेडमध्ये रोजच तापमान नवनवे उच्चांक गाठत असल्याने फळबागा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

केळीच्या मागणीत घट

निसर्गाच्या लहरीपणामुळे फळपिकांचा दर्जाही सुधारला नाही आणि उत्पादनात घट होऊन दर मिळाले नाहीत. आंब्याप्रमाणेच आता केळीची अवस्था झाली आहे. उत्पादन घटूनही अधिकचा दर सोडा आहे त्या दरात केळीची विक्री होत नाही. रमजान महिन्यात केळीच्या मागणीत वाढ होत असते पण व्यापारीच शेतकऱ्यांकडे फिरकत नसल्याने कवडीमोल दरात केळी विक्री करावी लागणार आहे.

संबंधित बातम्या :

Photo Gallery : गोठ्याला लागलेल्या आगीत मुकी जनावरेही भाजली, शेतकऱ्याच्या स्वप्नाचा चक्काचूर!

Sugarcane : वर्षभर जोपासलेला ऊस शेतकऱ्यानेच पेटवला..! काडी लावताच फडात कारखान्याची गाडी

Latur : अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायम, लातूरच्या पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना काय दिले आश्वासन?

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.