AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhandara : पावसाचा कहर, उगवलेले धानपीकही गाळाखाली, 25 हजार हेक्टरावरील पिकांना फटका

खरीप हंगामावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. यंदा तर शेतकऱ्यांना या हंगामातून अधिकच्या अपेक्षा होत्या. गतवर्षी परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे यंदा क्षेत्र वाढवून उत्पादन वाढवण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार होता. पण हंगामाच्या सुरवातीपासूनच निसर्गाने आपला लहरीपणा दाखवण्यास सुरवात केली आहे. त्यामुळेच धान पिकांची लागवड उरकून उगवण होताच नुकसानही झाले आहे.

Bhandara : पावसाचा कहर, उगवलेले धानपीकही गाळाखाली, 25 हजार हेक्टरावरील पिकांना फटका
भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरिपातील 25 हजार हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Aug 12, 2022 | 6:54 PM
Share

भंडारा : आतापर्यंत पावसाने (Crop Damage) पिकांचे नुकसान झाले होते पण पावसाचा असा काय कहर होत आहे की, पुरामुळे गाळही आता शेतशिवारात साचू लागला आहे. त्यामुळे उगवण झालेली पिके थेट गाळाखाली अशी स्थिती (Bhandara District) भंडारा जिल्ह्यात पाहवयास मिळत आहे. त्यामुळे यंदाच्या खरिपात सर्वकाही नुकसनीचे घडत असून हे भरुन तरी काढावे असा प्रश्न राज्यभरातील शेतकऱ्यांसमोर आहे, भंडारा जिल्ह्यात दोन दिवसांमध्ये पावसाने हाहाकार घातला असून तब्बल 25 हजार हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले आहे तर 100 एकरावर केवळ पुरामुळे गाळाचे अच्छादन आहे. त्यामुळे हे नुकसान भरुन काढावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. यंदाच्या खरिपात जिल्ह्यात (Paddy Crop) भातशेतीचे क्षेत्र वाढले होते. गतवर्षी झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी हा प्रयत्न केला होता पण निसर्गाच्या लहरीपणासमोर सर्वकाही मातीमोल होत आहे.

दोन दिवसांमध्ये 25 हजार हेक्टरावरील पिकांचे नुकसान

खरीप हंगामावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. यंदा तर शेतकऱ्यांना या हंगामातून अधिकच्या अपेक्षा होत्या. गतवर्षी परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे यंदा क्षेत्र वाढवून उत्पादन वाढवण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार होता. पण हंगामाच्या सुरवातीपासूनच निसर्गाने आपला लहरीपणा दाखवण्यास सुरवात केली आहे. त्यामुळेच धान पिकांची लागवड उरकून उगवण होताच नुकसानही झाले आहे. एकट्या भंडारा जिल्ह्यात तब्बल 25 हजार हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

मोहाडी तालुक्यात सर्वाधिक फटका

यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला असला तरी सर्वत्र समप्रमाणात पाऊस झाला असे नाही. भंडारा जिल्ह्यामध्येही मोठी तफावत आढळून येत आहे. दोन दिवसांपूर्वी अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. या पावसामध्ये धान पिकाचे तर नुकसान झालेच पण शेतजमिनही खरडून गेली आहे. संपूर्ण शेती ही रेतीमय झाली आहे. तब्बल 100 एकर शेती पुराचा गाळ आल्याने पीके गाळाली खाली आली आहे. कधी नव्हे ते हंगामाच्या सुरवातीलाच असे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

शेतकऱ्यांकडून भरीव मदतीची मागणी

यंदा ज्याप्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे त्या तुलनेत मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. कारण सध्या पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरु असली तर नियम अटींवर बोट ठेवत नुकसानीपेक्षा कमी क्षेत्रावरील पंचनामे केले जात आहेत. उर्वरित भरपाई मिळणार तरी कशी असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. राज्य सरकारने मदतनिधीमध्ये वाढ केली पण त्या तुलनेत भरपाई वेळेत मिळावी अशी मागणी आता शेतकरी करीत आहेत.

ही बातमी पण वाचा

Airtel 5G Network: ‘एअरटेल’ भारतीय ग्राहकांसाठी 5G क्रांती आणण्यासाठी सज्ज!

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.