AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठवाड्यातील स्थिती : नुकसान 8 जिल्ह्यात पंचनामे 3 जिल्ह्यातीलच पूर्ण

पावसाने खरिप हंगाम आजही पाण्यातच आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला झालेल्या पावसामुळे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील तब्बल 15 लाख हेक्टरहून अधिकचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. असे असताना गेल्या दोन दिवसापासून पुन्हा पावसाने हजेरी लावलेली आहे. दरम्यानच्या पावसानंतर शेतकऱ्यांनी ऑनलाईन दावेही केली. मात्र, पंचनामे करण्याची प्रक्रीया ही धिमी असून आतापर्यंत लातूर, हिंगोली आणि उस्मानाबाद तीन जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. उर्वरीत जिल्ह्यात ही प्रक्रीया अजूनही सुरुच असून प्रत्यक्षात मदत केव्हा मिळणार हा प्रश्न आहे.

मराठवाड्यातील स्थिती : नुकसान 8 जिल्ह्यात पंचनामे 3 जिल्ह्यातीलच पूर्ण
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Sep 24, 2021 | 2:30 PM
Share

लातूर : पावसाने खरिप हंगाम आजही पाण्यातच आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला झालेल्या पावसामुळे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील तब्बल 15 लाख हेक्टरहून अधिकचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. असे असताना गेल्या दोन दिवसापासून पुन्हा पावसाने हजेरी लावलेली आहे. दरम्यानच्या पावसानंतर शेतकऱ्यांनी ऑनलाईन दावेही केली. मात्र, पंचनामे करण्याची प्रक्रीया ही धिमी असून आतापर्यंत लातूर, हिंगोली आणि उस्मानाबाद तीन जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. उर्वरीत जिल्ह्यात ही प्रक्रीया अजूनही सुरुच असून प्रत्यक्षात मदत केव्हा मिळणार हा प्रश्न आहे.

पावसाने मराठवाड्यातील 15 लाख हेक्टरवरील पीके ही बाधित झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार 67.26 टक्केवरील पीकांचे हे नुकसान झाले आहे. मात्र, पंचनाम्याची प्रक्रीया ही कासव गतीने आहे. त्यामुळे त्वरीत प्रक्रीया पूर्ण करुन शेतकऱ्यांना पैसे देण्याची मागणी आता होऊ लागली आहे. ऑगस्ट महिन्यात खरिपातील पीके बहरात असतानाच पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे सोयाबीन, उडीद, मूग या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

यावेळी शेतकऱ्यांनी ऑनलाईन, ऑफलाईन अशा पध्दतीने नुकसानीचे दावे केले होते. शिवाय सरसकट पीकाचे नुकसान झाले असून पंचनाम्याची औपचारिकता शासनाने करु नये अशी मागणीही शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पंचनामे करण्यास सुरवात झाली असून आतापर्यंत लातूर, हिंगोली आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील पंचनामे हे 100 टक्के पूर्ण झालेले आहेत.

शासनाच्या वतीने पंचनामे करण्याची प्रक्रीया सुरु आहे तर दुसरीकडे दिवसेंदिवस पावसाचा जोर हा वाढतच आहे. त्यामुळे नुकसानीचे क्षेत्र वाढण्याबरोबरच वाचलेल्या पिकातूनही उत्पादनात घट होणार हे नक्की.

अशी आहे पंचनाम्यांची आकडेवारी

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात आतापर्यंत 10 लाख 34 हजार हेक्टरावरील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे झाले आहेत. सर्वात कमी औरंगाबाद जिल्ह्यात केवळ 53 टक्केवरील पंचनामे पूर्ण झाले आहेच तर जालना 71, परभणी 61.81, नांदेड 71.46 बीड जिल्ह्यात 68.23 टक्क्यावरील पीकांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. तर लातूर, उस्माबाद आणि हिंगोली येथील पंचनामे हे पूर्ण झाले आहेत.

आता होत असलेल्या नुकसानीचे काय?

सध्या प्रशासनाच्यावतीने पंचनामे करण्याची प्रक्रीया ही सुरु असतानाच पावसाने सर्वच जिल्ह्यात हजेरी लावलेली आहे. त्यामुळे जवळपास खरीप पाण्यात गेल्याची शेतकऱ्यांची भावना झाली असून सध्या होत असलेल्या नुकसानीचे शासन कसे मोजमाप लावणार. या नुकसानीची भरपाई मिळणार का असे सवाल उपस्थित होत आहेत.

खरिपातील सर्वच पिकांचे नुकसान

खरिपीतील केवळ एकाच पिकाला पावसाचा फटका बसला आहे असे नाही, सोयाबीन, उडीद, मूग या पिकांचे नुकसान झाल्याच्या नोंदी आहेत. पंचनामे करण्यासाठी अधिकारी-कर्मचारी हे शेतकऱ्यांच्या बांधावर असताना देखील पावसाने हजेरी लावल्याची अनेक प्रसंग मराठवाड्यात घडलेले आहेत.(Damage to crops in 8 districts of Marathwada, Panchnama, however, completed in 3 districts)

संबंधित बातम्या :

सामूहिक सातबाऱ्यावरील प्लॅाट विक्रीला बंदी ; मग काय पर्याय आहे, जाणून घ्या

ऊसतोड कामगारांना मिळणार ओळखपत्र, ग्रासेवकामार्फत होणार पूर्तता

काय सांगता ? शेतकऱ्यांना आता 3 लाखापर्यंत नव्हे तर 5 लाखापर्यंत बिनव्याजी पीक कर्ज, लातूर जिल्हा बॅंकेची घोषणा

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा