AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा..! खरिपाचे नुकसान न भरुन निघणारे

गडचिरोली जिल्ह्यातील 12 तालुक्यापैकी अहेरी, सिरोंचा, भामरागड या भागांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येऊन गेले त्यांनी पंचनामे करायला सांगून दहा ते बारा दिवस झाले तरी सगळीकडील पंचनामे झालेले नाहीत. आधारकार्ड व अर्ज फक्त घेतला आहे. परंतु पंचनामे केल्याशिवाय शेतकऱ्यांना मदत कशी देणार आहात याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे अजित पवार यांनी विचारणा केली.

Ajit Pawar : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा..! खरिपाचे नुकसान न भरुन निघणारे
विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेताना विरोधी पक्षनेते अजित पवारImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jul 28, 2022 | 2:27 PM
Share

नागपूर : राज्यात सध्या (Rain) पावसाने उसंत घेतली असली तरी अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे झालेल्या (Signs of damage) नुकसानीच्या खुणा ह्या कायम आहेत. उघडपीच्या काळात आता राजकीय नेते शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन समस्या जाणून घेत आहेत. नुकसानीची दाहकता ही अधिक असून शेतकऱ्यांना हेक्टरी 75 हजार रुपयांची आर्थिक मदत आणि ज्यांनी जीव गमवलेला आहे त्यांच्या कुटुंबियांना भरीव मदत केली तरच या नुकसानीच्या खुणा मिटणार असल्याचे विरोधी पक्षनेते (Ajit Pawar) अजित पवार यांनी सांगितले आहे. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा विदर्भातील शेतकऱ्यांना बसलेला आहे. पीक नुकसानीची पाहणी केल्यानंतर विरोधी पक्षनेते  यांनी ही मागणी राज्य सरकारकडे केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान आणि विरोधकांचा रेटा यामुळे सरकार काय निर्णय घेणार हे पहावे लागणार आहे.

गडचिरोलीत सर्वाधिक नुकसान

एकट्या गडचिरोली जिल्हयात 25 हजार हेक्टर क्षेत्रावर शेतीचे नुकसान झाले तर अतिवृष्टी आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे 12 जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. सिरोंचा, भामरागड आणि अहेरी भागातील गावांची पाहणी आज अजित पवार यांनी केल्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.शेतकऱ्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे. पंचनामे करताना ज्या घरांना ओलावा आला आहे त्यांचाही समावेश करावा अशी विनंती अजित पवार यांनी सरकारला केली आहे. अतिवृष्टीने खरीप हंगामातील पिकांचे तर नुकसान झाले आहे पण धानपिकाला सर्वाधिक फटका बसलेला आहे.

मजुरांवर उपासमारीचे वेळ

सततच्या पावसामुळे शेतीकामे तर खोळंबली आहेतच पण अनेकांच्या हाताला कामही नाही. सलग पाऊस सुरु राहिल्याने मजुरांना कामच मिळाले नाही. जिल्हयात अतिवृष्टीमुळे दहा दिवस सुट्टी जाहीर झाली होती म्हणजे एवढे दिवस मोलमजुरी करणार्‍या लोकांना काहीच मिळणार नसेल तर त्यांनी जगायचं कसं हा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला आहे असेही अजित पवार म्हणाले. त्यामुळे नुकसानीच्या झळा ह्या तीव्र आहेत. केवळ औपचारिकता म्हणून मदतीची घोषणा करु नये तर त्या रकमचा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना आणि मजुरांना मदत व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

पंचनाम्यांचे आदेश, अमंलबजावणी नाही

गडचिरोली जिल्ह्यातील 12 तालुक्यापैकी अहेरी, सिरोंचा, भामरागड या भागांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येऊन गेले त्यांनी पंचनामे करायला सांगून दहा ते बारा दिवस झाले तरी सगळीकडील पंचनामे झालेले नाहीत. आधारकार्ड व अर्ज फक्त घेतला आहे. परंतु पंचनामे केल्याशिवाय शेतकऱ्यांना मदत कशी देणार आहात याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे अजित पवार यांनी विचारणा केली. शिवाय पावसाळी अधिवेशन व्हायला विलंब होतो आहे ही वस्तुस्थिती आहे.मुंबईतून बघणं आणि 37 जिल्ह्यात मंत्री नेमून पालकमंत्री पद देणं, त्यांना तिथे बसून या यंत्रणांना कामाला लावायला लागणं यामध्ये खूप फरक पडतो असेही अजित पवार यांनी सुनावले आहे.

Follow Us
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.