AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kharif Season: उत्पादनात घट मात्र, वाढत्या दराने खरिपातील तीन पिकांचा मिळतोय शेतकऱ्यांना ‘आधार’

शेतकऱ्यांनी घेतलेली भूमिका आणि बाजारपेठेचे बदललेले स्वरुप यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर या पिकांना अंतिम टप्प्यात का होईना चांगला दर मिळत आहे. शिवाय आवक प्रमाणात राहिली तर दरात अणखीन वाढ होणार असल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी tv9 मराठी शी बोलताना सांगितले आहे.

Kharif Season: उत्पादनात घट मात्र, वाढत्या दराने खरिपातील तीन पिकांचा मिळतोय शेतकऱ्यांना 'आधार'
लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती
| Updated on: Jan 12, 2022 | 4:42 PM
Share

लातूर : खरिपातली पिकं वावरात असताना शेतकऱ्यांची चिंता कायम होती. कारण निसर्गाची अवकृपा अशी काय राहिली यंदा की अर्थार्जनाच्या दृष्टीने महत्वाचे असणरा (Kharif season) खरीप हंगामच पाण्यात होता. त्यामुळे उत्पादनात तर मोठी घट झाली होती. (Marathwada) मराठावड्यात सोयाबीनची उत्पादकता ही एकरी 7 ते 8 क्विंटल असते यंदा मात्र, शेंगा लागल्यापासून हे पीक पाण्यातच राहल्याने उत्पादकता ही निम्म्यावरच आली होती. शिवाय काढणी नंतर बाजारपेठेत (Soybean Crop) सोयाबीन दाखल होताच दरात घट झाली. त्यामुळे सर्वकाही नुकसानीचेच असे मानले जात होते. जी अवस्था सोयाबीनची तीच कापूस आणि आता तूरीची होत आहे. मात्र, शेतकऱ्यांनी घेतलेली भूमिका आणि बाजारपेठेचे बदललेले स्वरुप यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर या पिकांना अंतिम टप्प्यात का होईना चांगला दर मिळत आहे. शिवाय आवक प्रमाणात राहिली तर दरात अणखीन वाढ होणार असल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी tv9 मराठी शी बोलताना सांगितले आहे.

काय आहेत सध्याचे दर?

खऱीप हंगामातील सोयाबीन, कापूस आणि आता तूरीची आवक सुरु झाली आहे. मात्र, सुरवातीच्या काळात या पिकांना कवडीमोल दर होते. सोयाबीनला मुहूर्ताचा दर मिळाला होता 11 हजार रुपये क्विंटल मात्र, हा दर काही दिवसांपूरताच होता. त्यानंतर सोयाबीन अनेक दिवस 4 हजार 500 रुपयांवर स्थिरावले होते. दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात सुधारणा होत गेली ती आज 6 हजार 600 रुपये असा दर मिळत आहे. दुसरीकडे पांढऱ्या सोन्याला बाजारात दाखल झाल्यापासूनच चांगला दर आहे. मात्र, उत्पादनात मोठी घट झाली आहे. मध्यंतरी 7 हजार 500 रुपयांवर स्थिरावलेला कापसाने आज 10 हजारांचा टप्पा पार केला आहे. पुरवठा कमी आणि मागणी अधिक यामुळे कापसाच्या दरात वाढ झालेली आहे. गेल्या आवठवड्याभरापासून खरीपातील अंतिम पिक असलेल्या तूरीची आवक सुरु झाली आहे. सुरवातीला हमी भाव केंद्र सुरु होण्यापूर्वी तुरीचे दर हे 6 हजारापर्यंतच होते. पण सध्या तूरीनेही 6 हजार 500 चा टप्पा ओलांडलेला आहे. त्यामुळे या तीन्हीही पिकांचे उत्पादन घटले असले तरी वाढीव दरामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळालेला आहे.

शेतकऱ्यांची भूमिका ठरली निर्णायक

दरवर्षी खरिपातील पिकांची काढणी झाली की थेट बाजारपेठेत विक्री हे शेतकऱ्यांचे ठरलेलं. यंदा मात्र, बाजारपेठेचे गणितच शेतकऱ्यांना समजलेले होते. शेती मालाला योग्य दर मिळाला तरच विक्री अन्यथा साठवणूक अशी भूमिका संपूर्ण हंगामात घेतली होती. केवळ सोयाबीनसाठीच नाही तर कापूस आणि आता तूरीसाठीही हेच एकक लावले जात आहे. उत्पादनात घट होऊनही वाढीव भाव कसा नाही असा सवाल शेतकऱ्यांना होता. त्यामुळेच अपेक्षित दर मिळत नाही तोपर्यंत धान्याची साठवणूक करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला होता. त्यामुळे अजूनही निम्मे सोयाबीन शेतकऱ्यांकडेच आहे. हा प्रयोग शेतकऱ्यांनी केल्यामुळेच सोयाबीन आणि कापसाचे दर वाढले आहेत. तूरीची आवक गेल्या आठवड्यापासून सुरु झाली आहे. सुरवातीलाच हमीभावापेक्षा अधिकचे दर तुरीला खुल्या बाजारपेठेत मिळू लागले आहेत. त्यामुळे सोयाबीन आणि कापसाप्रमाणेच शेतकऱ्यांनी तुरीबाबतही निर्णय घेतला तर फायद्याचे राहणार असल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

Untimely Rain : नुकसानीचा अहवाल अन् मदतीसाठी ठरावही, वर्धा पाठोपाठ ‘या’ जिल्ह्याची तत्परता

रब्बी हंगामातील पिकांची काळजी अन् कांदा लागवडीबाबत कृषी तज्ञांचा काय आहे सल्ला?

farmer producer company: आता शेतकरी उत्पादक कंपन्याही करणार तूरीची खरेदी, नेमका फायदा काय?

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....