AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जून महिन्यात सुध्दा कडक उन्हं, पेरण्या लांबल्या, शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पेरणी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे पावसाकडे लागले आहेत. त्याचबरोबर काही शेतकरी मान्सूनची वाट पाहत आहेत.

जून महिन्यात सुध्दा कडक उन्हं, पेरण्या लांबल्या, शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत
कोळपण केलेला कापूसImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 13, 2023 | 12:18 PM
Share

धुळे : धुळे (dhule cotton cultivation) जिल्ह्यात तापमानाचा (temprature) पारा 40 अंश सेल्सिअसपर्यंत आहे. जून महिना लागल्यानंतर सुध्दा तापमान कमी होत नसल्याने शेतकरी अडचणी सापडला आहे. अधिक उन्हं आणि उपलब्ध पाण्याचा विचार करून शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन पद्धत सुरु केली आहे. शेतकऱ्यांनी निसर्गावर अवलंबून न राहता ठिबक अंथरणीला सुरुवात केली असून, त्यावर कापूस पेरणी सुरू केली आहे. अनेक ठिकाणी सुमारे पंधरा दिवसाचे कापसाचे पीक आता शेतात दिसू लागले आहे. शेतकऱ्यांनी (farmer news in marathi) आता कोळपणी कामाला वेग दिला आहे. निसर्गतः पिकाला पाणी मिळाले तर रोपांची वाढ झपाट्याने तसेच चांगली होते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पावसाने वेळेवर हजेरी लावावे अशी, अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

धुळे जिल्ह्यात कृषी विभाग आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खरीप हंगाम पूर्व शेतकरी मेळावा घेण्यात आला. शिंदखेडा येथील बिजासनी मंगल कार्यालयात शिंदखेडा तालुका खरीप हंगामपूर्व आढावा बैठक व शेतकरी मेळावा संपन्न झाला. शिंदखेडा तालुक्याचे आमदार जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडला. एकेकाळी शिंदखेडा तालुक्याला दुष्काळी कलंक लागला होता, पण आज शेतकरी नगर, नाशिक, धुळे आणि जळगांव जिल्ह्यात सर्वाधिक उत्पन्न घेणारे पारितोषिक मिळवित आहे. त्यामुळे येणाऱ्या हंगामात ही चांगले उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांनी तृणधान्य पिकाकडे आपला कल असू दयावा असे आवाहन देखील केले गेले. यावेळी नॅनो युरिया या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पेरणी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे पावसाकडे लागले आहेत. त्याचबरोबर काही शेतकरी मान्सूनची वाट पाहत आहेत. कारण पेरणीची वेळ एकदा निघून गेल्यानंतर पीक काढणीच्यावेळी अनियमित पावसाचा सामना करावा लागतो. यंदा महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्यानं जाहीर केलं आहे. त्यामुळे शेतकरी जोमाने पेरणी करीत आहे. त्याचबरोबर कृषी विभागाचे अधिकारी बनावट बियाणांवरती लक्ष ठेऊन आहेत.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.