AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या कारणामुळे पावसाळ्याच्या तोंडावर सोयाबिनची आवक वाढली, आठवड्याच्या पहिल्याचं दिवशी…

जे पीकं वाचले आहे, त्या पिकांना दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी त्या पिकांची साठवणूक घरी केली होती. सध्या शेतकऱ्यांकडे पर्याय नसल्यामुळे सोयाबिनची विक्री करावी लागतं आहे.

या कारणामुळे पावसाळ्याच्या तोंडावर सोयाबिनची आवक वाढली, आठवड्याच्या पहिल्याचं दिवशी...
Soybean crop washimImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 13, 2023 | 11:33 AM
Share

वाशिम : वाशिम (Washim) जिल्ह्यात पावसाळ्याच्या तोंडावर सोयाबीनची (Soybean crop) विक्रमी आवक होत आहे. शेतकरी खरीपाच्या तयारीसाठी सोयाबीन विकण्याची लगबग करीत असल्याने बाजार समितीमध्ये आवक वाढत आहे. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांत मिळून २० हजार क्विंटलपेक्षा अधिक आवक झाल्याची माहिती मिळाली आहे. महाराष्ट्रात (maharashtra agricultural news in marathi)पावसाच्या अनियमित पणामुळे रब्बी आणि खरीप दोन्ही हंगामात नुकसान झालं आहे. जे पीकं वाचले आहे, त्या पिकांना दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी त्या पिकांची साठवणूक घरी केली होती. सध्या शेतकऱ्यांकडे पर्याय नसल्यामुळे सोयाबिनची विक्री करावी लागतं आहे.

सोयाबीनचे दर गत हंगामात झपाट्याने खाली घसरत गेले. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री थांबवली होती, तर दर वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. त्यात काही बड्या शेतकऱ्यांनी नेहमीप्रमाणे खरीपाच्या तयारी साठीही सोयाबीन राखून ठेवले होते. मात्र हंगाम संपत आला तरी सोयाबीनच्या दरात वाढ होण्याऐवजी घसरणच झाली. सद्यस्थितीत सोयाबीनला जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये दर सरासरी ४ हजार ८०० रुपये प्रती क्विंटलपर्यंतचे दर मिळत आहेत. शेतकऱ्यांना आता दरवाढीची अपेक्षा राहिलेली नाही. त्यात पावसाळा तोंडावर आला असून, खरीप पेरणीची तयारी शेतकरी करीत असल्याने त्यांनी सोयाबीन विक्रीवर भर देत असल्याने पावसाळ्याच्या तोंडावर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची विक्रमी आवक होत आहे. सोमवारी जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्या आणि उपबाजारांत मिळून २० हजार क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक झाली आहे.

यंदा वेळेपूर्वी मान्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. शेतकऱ्यांनी शेतातील मशागतीचे कामं पूर्ण केलेली आहेत. मात्र मान्सून पाऊस लांबणीवर जात असल्याचं चित्र आहे. त्यामुळे पावसापूर्वी मुबलक पाण्याची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांनी शेत ओलित करीत पिकाची लागवड करीत आहे. या वर्षी हळद, सोयाबीन, तूर, मुंग उडीद या पिकाच्या पेरणी होत असून या पिकांना पावसाच्या पाण्याची वाट न बघतात सिंचन सोय करीत पिकाची लागवड करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.