AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

झाडाला तरुणाचा मृतदेह लटकतोय, लोकांची गर्दी पाहून पोलिसांना घाम फुटला, पाच तास लागले…

पुणे नाशिक महामार्गावर एका तरुणाचा मृतदेह लटकत होता. त्याची हत्या की आत्महत्या हे पाहण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी केली. त्यावेळी पोलिसांनी तिथून वाहतूक सुरळीत करीत असताना घाम फुटला.

झाडाला तरुणाचा मृतदेह लटकतोय, लोकांची गर्दी पाहून पोलिसांना घाम फुटला, पाच तास लागले...
kalyan crime news in marathiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 13, 2023 | 8:31 AM
Share

सुनिल जाधव, कल्याण : कल्याण रेल्वे स्टेशन, पत्रिपुल रेल्वे परिसरात (Kalyan news) तरुणाचा मृतदेह असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. झाडाला रशीने लटकलेला मृतदेह असल्यामुळे लोकांनी तिथं तोबा गर्दी केली. विशेष म्हणजे तो परिसर पुणे नाशिक महामार्गावर (nashik pune highway)लागून असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांची मोठी गर्दी झाली होती. काल तिथं रात्रीच्या दरम्यान पोलिसांना मोठी गर्दी पाहायला मिळाली. पोलिसांनी (kalyan crime news in marathi) तिथली गर्दी पांगवताना अधिक त्रास झाला. मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर हत्या की आत्महत्या हे स्पष्ट होईल असं पोलिसांनी सांगितलं आहे.

नेमकं काय झालं

कल्याण रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या पत्रीपूल रेल्वे ट्रॅक परिसरात काल रात्री उशिरा एका 25 वर्षीय तरुणांचा मृतदेह एका झाडाला दोरीने लटकलेल्या अवस्थेत सापडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. मृतदेह पाहण्यासाठी बघ्यांनी कल्याण पत्रीपूल परिसरात गर्दी केल्याने पुणे नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कोळसेसाडी वाहतूक पोलिसांना तब्बल पाच तास तारेवरची कसरत करावी लागली. रात्रीच्या वेळेला अवजड वाहनही या मार्गावरून जात असल्याने वाहतूक पोलिसांचा चांगलाच घाम निघाला. दुसरीकडे रेल्वे पोलिसांनी त्या तरुणाचा मृतदेह ताब्यात घेत ही आत्महत्या आहे की हत्या याचा तपास सुरू केला आहे.

हत्या की आत्महत्या ?

तरुणाची ओळख पटवण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरु होतं. त्या तरुणाचा मृतदेहाचं शवविच्छेदन केल्यानंतर हत्या की आत्महत्या हे स्पष्ट होईल असंही पोलिसांनी सांगितलं आहे. लोकांनी पाहण्यासाठी इतकी गर्दी केली की, पाच तिथं गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. पाच तासानंतर वाहतूक सुरळीत झाली.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.