AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Buldhana : पावसाचा कहर त्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव, उगवलेल्या सोयाबीनची वाढ खुंटली

यंदा निसर्गाचा लहरीपणाचा परिणाम खरीप हंगामावर अगदी सुरवातीपासून पाहवयास मिळत आहे. यंदा जून महिन्यात वरुणराजाची अवकृपाच राहिले त्यामुळे पेरणीचे मुहूर्त सोडाच पण खरिपातील पेरण्या होतील की नाही अशी स्थिती होती. जूनच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अल्पशा पावसाच्या जोरावर शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ ठेवली ती पण नुकसानीची ठरत आहे.

Buldhana : पावसाचा कहर त्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव, उगवलेल्या सोयाबीनची वाढ खुंटली
खरीप हंगामातील सोयाबीनवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे.
| Edited By: | Updated on: Jul 14, 2022 | 9:27 AM
Share

बुलढाणा : (Kharif Season) खरीप हंगामातील पिकांचा पेरा होताच पावसाने हाहाकार केला आहे. खरिपासाठी पाऊस हा पोषक असतो पण यंदा पिकांची उगवण होताच लागून राहिलेला पाऊस हा बाधित होत आहे. पावसाचे संकट कमी म्हणून की काय आता (Soybean Crop) सोयाबीनवर (Pest outbreak) लष्करी अळीचाही प्रादुर्भाव वाढत आहे. गेल्या 8 दिवसांपासूनच सुर्यदर्शनच झाले नसल्याने लष्करी अळी वाढण्यासाठी हे पोषक वातावरण आहे. सध्याच्या दुहेरी संकटामुळे शेकतरी मेटाकूटीला आला आहे. किड नियंत्रणासाठीचे प्रयत्न केले जात आहेत पण सध्याच्या वातावरणामुळे किटकनाशकांचा देखील परिणाम या अळीवर होताना दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट हे कायम आहे. 5 वर्षापूर्वीही जिल्ह्यात लष्करी अळीच्या प्रादुर्भावमुळे सोयाबीन पीकाचे मोठे नुकसान झाले होते. त्याचीच पुन्नरावृती होताना पाहवयास मिळत आहे.

उशिराची पेर अन् पिकांना धोका

यंदा निसर्गाचा लहरीपणाचा परिणाम खरीप हंगामावर अगदी सुरवातीपासून पाहवयास मिळत आहे. यंदा जून महिन्यात वरुणराजाची अवकृपाच राहिले त्यामुळे पेरणीचे मुहूर्त सोडाच पण खरिपातील पेरण्या होतील की नाही अशी स्थिती होती. जूनच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अल्पशा पावसाच्या जोरावर शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ ठेवली ती पण नुकसानीची ठरत आहे. पेरणी होताच सुरु झालेला पाऊस गेल्या 8 दिवसांपासून कायम आहे. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. शिवाय अधिकच्या पावसामुळे खरिपातील पिके ही पिवळी पडत आहेत. त्यामुळे खरिपाबाबत सर्वकाही उशिराने झाले आहे. त्याचाच परिणाम आता पाहवयास मिळत आहे.

लष्करी अन् उंट अळीचा प्रादुर्भाव

सध्याच्या ढगाळ वातावरणात पिकांची वाढ तर खुंटली आहे पण बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, शेगाव, संग्रामपूर या तालुक्यातील सोयाबीन हे लष्करी आणि उंट अळीच्या संकटात सापडले आहे. शेतकऱ्यांनी किटकनाशकांची फवारणी केली आहे मात्र, सततच्या पावसामुळे त्याचाही परिणाम या अळीवर होत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल आहे. त्यामुळे सोयाबीनची उगवण होताच ते धोक्यात आले आहे. कीड-नियंत्रणासाठी प्रयत्न करुन देखील शेतकऱ्यांना प्रादुर्भाव रोखण्यात अपयश आल्यानं ते मेटाकुटीला आलाय.

काय आहे शेतकऱ्यांची मागणी ?

यंदा प्रतिकूल परस्थितीमध्ये खरिपातील पेरणी झाली असली तरी पोषक वातावरणामुळे उत्पादनात वाढ होईल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, पिकांची उगवण होताच ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसामुळे सोयाबीनवर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. आता पीक पेरणीबाबत मार्गदर्शन करणाऱ्या कृषी अधिकाऱ्यांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. कृषी अधिकाऱ्यांनी पीक पाहणी करुन योग्य तो सल्ला द्यावा असा सूर शेतकऱ्यांमध्ये आहे. आता योग्य उपाय झाले तरच पिकांची वाढ होऊन उत्पादन वाढणार आहे. अन्यथा नुकसान अटळ असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.