AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कृषी विभागाच्या एका निर्णयामुळे हळदीला चढणार ‘पिवळा’ रंग, नेमके धोरण काय ? वाचा सविस्तर

काळाच्या ओघात हळदीच्या क्षेत्रात पुन्हा वाढ होत आहे. मात्र, वाढत्या क्षेत्राबरोबरच उत्पादन वाढवण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. यामध्येच हळद लागवडीपासून प्रक्रिया आणि त्यानंतर निर्यातीसाठी येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया उद्योग धोरण निश्चित करण्याासाठी एक समिती नेमली आहे. त्यामुळे सर्व प्रक्रिया किंवा धोरण हा समितीच ठरविणार नाही तर यामध्ये सर्वसामान्य शेतकरी, कृषितज्ञ तसेच प्रगतशील शेतकरी यांना देखील सहभाग नोंदवता येणार आहे.

कृषी विभागाच्या एका निर्णयामुळे हळदीला चढणार 'पिवळा' रंग, नेमके धोरण काय ? वाचा सविस्तर
हळदीवर प्रक्रिया करुन उद्योग उभारणीसाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे.
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Mar 07, 2022 | 3:04 PM
Share

पुणे : काळाच्या ओघात (Turmeric Crop) हळदीच्या क्षेत्रात पुन्हा वाढ होत आहे. मात्र, वाढत्या क्षेत्राबरोबरच उत्पादन वाढवण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. यामध्येच हळद लागवडीपासून प्रक्रिया आणि त्यानंतर निर्यातीसाठी येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी हळद संशोधन व (Processing Industry) प्रक्रिया उद्योग धोरण निश्चित करण्याासाठी एक समिती नेमली आहे. त्यामुळे सर्व प्रक्रिया किंवा धोरण हा समितीच ठरविणार नाही तर यामध्ये सर्वसामान्य (Farmer) शेतकरी, कृषितज्ञ तसेच प्रगतशील शेतकरी यांना देखील सहभाग नोंदवता येणार आहे. यामुळे सर्वाच्या विचारांची देवाण-घेवाण करुन हळद उत्पादन वाढीसाठीचे प्रयत्न केले जाणार आहेत. आशा प्रकारे सूचना घेऊन धोरण ठरवण्याची ही पहिलीच वेळ असून अंतिम टप्प्यात नेमके काय हाती लागणार हे देखील पहावे लागणार आहे.

समिती स्थापनेचा नेमका उद्देश काय ?

राज्यात हळदीचे क्षेत्र हे वाढलेले आहे. पण त्या तुलनेत प्रक्रिया उद्योगाची माहिती नसल्याने उत्पन्नात वाढ झालेली नाही. हळद लागवडीपासूनची प्रक्रिया आणि विक्रीपर्यंतच्या शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी संशोधन प्रक्रिया धोरण हे निश्चित केले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोरील समस्यांवर उपाययोजना काय याचा मसुदा तयार करण्यात येणार आहे. यामध्ये समिती आणि सर्वासामान्य शेतकऱ्यांच्या सूचनांचा विचार केला जाणार असून कृषी विभागाच्या माध्यमातून ते प्रसिध्द देखील केले जाणार आहे.

प्रक्रिया उद्योगातूनच अधिकचे उत्पन्न

हळद हे विविध कारणांसाठी वापरली जाते. यामध्ये औषधी गुण तर आहेतच पण सौंदर्य प्रसाधने करण्यासाठीही वापर केला जातो. मात्र, या दरम्यानचे प्रक्रिया उद्योगच शेतकऱ्यांना माहिती नसतात. आता त्याच अनुशंगाने सूचना मागवून मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे लागवड ते प्रक्रिया उद्योग इथपर्यंतची माहिती होणार आहे.

अशा पाठवा सूचना

ग्राहक, शेतकरी, निर्यातदार उत्पादक तसेच उद्योजकांनाही कृषी विभागाकडे सूचना पाठवता येणार आहेत. phytocel@gmail.com या वेबसाईटवर किंवा कृषी उपसंचालक, फलोत्पादन-03 कृषी आयुक्तालयाकडे पाठवता येणार आहेत. यामुळे विचारांची देवाण-घेवाण होऊन हळद उत्पादन आणि उत्पन्न वाढीसाठी उपयोगी ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

Chickpea Crop: खरेदी केंद्रावर सुविधांपेक्षा अडचणी अधिक, उत्पादन वाढले पण विकायचे कुठे?

Soybean Market : सोयाबीनची आवक वाढली, आठवड्याच्या पहिल्या दिवशी दराचे काय?

कृषी पंपावरुन रणकंदन : राज्य सरकारच्या सुल्तानी कारभारामुळेच ‘सुरज’ सारख्या शेतकऱ्याचा अस्त

Follow Us
अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फो
Supriya Sule | अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फोटो
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये..
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये...
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन