AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Osmanabad : पावसाने वाढ खुंटली अन् गोगलगायीने पीक फस्त केलं, अवघ्या काही दिवसांमध्ये खरिपाचं होत्याचं नव्हतं झालं

नैसर्गिक संकटानंतर शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे होते. पण अद्यापही अनेक ठिकाणी पंचनाम्याला देखील सुरवात झालेली नाही. पावसानंतर काही तासांमध्ये पंचनामे झाले तर त्याच्या नुकसानीची दाहकता लक्षात येते. मात्र, पावसाने उघडीप देऊन आता चार दिवस उलटले तरी कृषी विभागाचे अधिकारी फिरकलेले नाही. त्यामुळे उस्मानाबादचे आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि कैलास पाटील यांनी पिकांची पाहणी केली आहे.

Osmanabad : पावसाने वाढ खुंटली अन् गोगलगायीने पीक फस्त केलं, अवघ्या काही दिवसांमध्ये खरिपाचं होत्याचं नव्हतं झालं
उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवष्टीमुळे खरिपातील पिके पाण्यात आहेत.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Aug 01, 2022 | 5:01 PM
Share

उस्मानाबाद : मराठवाड्यात पावसाने उघडीप दिली असली तरी (Kharif Season) खरीप हंगामातील पिकांवरील धोका टळलेला नाही. मध्यंतरीच्या पावसाने पिकांची वाढ खुंटली तर आता गोगलगायीच्या वाढत्या प्रादुर्भावाने पिकेच फस्त होत आहेत. सोयाबीन, कापूस, मूग या पिकांवर गोगलगायी ताव मारत आहेत. पिके कोवळी असतानाच गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढल्याने पिकांची वाढ तर सोडाच (Crop Damage) पिकेच फस्त केली जात असल्याने खरिपाचे पीक शेतकऱ्यांच्या पदरी पडेल तरी कसे असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. बीडनंतर (Osmanabad Farmer) उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये गोगलगायीची संख्या वाढत आहे. त्यामुळे पीक पाहणी करुन पंचनामे आणि त्वरीत शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील आणि शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी केली आहे.

अतिवृष्टीने पिकांचे नुकसान

खरीप हंगामातील पिकांची पेरणी होताच वरुणराजाने सलग 15 दिवस हजेरी लावली. यामुळे शेत शिवरात पाणी साचून तर राहिले आहे. पाण्यात पिके असल्याने वाढ तर खुंटलीच शिवाय पिके पिवळीही पडलेली आहेत. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तवली जात असतानाच आता गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढल्याने सोयाबीन शेंग अवस्थेपर्यत वाढणार की नाही अशी शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे राज्यसरकारने अद्याप ही पंचनामे करण्याचे स्पष्ट आदेश दिले नाहीत माञ या शेतकऱ्यांना मदत मिळवुन देण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार असल्याची माहिती आमदार कैलास पाटील यांनी दिली आहे.

लोकप्रतिनिधींकडून आढावा

नैसर्गिक संकटानंतर शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे होते. पण अद्यापही अनेक ठिकाणी पंचनाम्याला देखील सुरवात झालेली नाही. पावसानंतर काही तासांमध्ये पंचनामे झाले तर त्याच्या नुकसानीची दाहकता लक्षात येते. मात्र, पावसाने उघडीप देऊन आता चार दिवस उलटले तरी कृषी विभागाचे अधिकारी फिरकलेले नाही. त्यामुळे उस्मानाबादचे आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि कैलास पाटील यांनी पिकांची पाहणी केली आहे. शिवाय नुकसानभरपाईचीही मागणी राज्य सरकारकडे केली आहे.

गोगलगायीवर असे मिळवा नियंत्रण

पिकांची उगवण होताच किडीचा प्रादुर्भाव झाला तर मात्र वाढीवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बांध हे तणविरहीत ठेवावे लागणार आहेत. त्यामुळे गोगलगाईला थांबण्यासाठी सुरक्षित जागा राहणार नाही. सकाळी किंवा संध्याकाळी ह्या गोगलगायी ह्या साबणाचे किंवा मिठाचे पाणी घेऊन त्यामध्ये मारुन टाकाव्यात. पिकाच्या क्षेत्रात 7 ते 8 मीटरवर वाळलेल्या गवताचे बुचाडे उभा करावेत. जेणेकरुन गोगलगायी त्याच्या आश्रयाला येतील आणि मग त्या अंडी घालण्यास एकत्र आल्यावर त्या नष्ट कराव्या लागणार आहेत.

... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं.
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान.
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा.
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी.
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!.
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक.
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका.
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका.
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक.