AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Osmanabad : वाढत्या उन्हामुळे आंबा बागेचे नुकसान, बागेची अवस्था पाहून कृषी अधिकारीही चक्रावले

मराठवाड्यातही उत्पादन वाढीसाठी शेतकरी एक ना अनेक प्रयोग करीत आहेत. असाच प्रयोग कळंब तालुक्यातील दिगंबर कापसे यांनी केला होता. त्यांनी तब्बल 5 एकरावर आंबा बाग लावली. शिवाय आता तोडणी काही दिवसांवर आली असतानाच आंबे हे पूर्णत: भाजले आहेत. त्यामुळे त्याच्यावर प्रक्रिया होऊन त्याची विक्री आता शक्यच नाही.

Osmanabad : वाढत्या उन्हामुळे आंबा बागेचे नुकसान, बागेची अवस्था पाहून कृषी अधिकारीही चक्रावले
वाढत्या उन्हामुळे माळरानावरील आंब्याची अशी अवस्था झाली आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: May 02, 2022 | 2:34 PM
Share

उस्मानाबाद : निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका हा (Mango Fruit) आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला आहे. मध्यंतरी मोहर लगडला असताना अवकाळीमुळे सुरु झालेले नुकसान हे फळ लागेपर्यंत कायम राहिले. आता (Mango) आंबा तोडणी अवस्थेत वाढत्या उन्हाचा असा काय परिणाम झाला आहे की (Osmanabad) कळंब तालुक्यातील दिगंबर कापसे यांची 5 एकरातील आंबा अक्षरश: करपला आहे. आता तोडणीला आला असतानाच ही अशी अवस्था झाल्याने कापसे यांना लाखोंचा फटका बसला आहे. कृषी अधिकारी यांनी पंचनामा केला असून आंबा बागेची ही अवस्था शॉर्टसर्किटमुळे झाली की वाढत्या उन्हामुळेच बाग कपरली याची पाहणी केली जात आहे. मात्र, हंगामाच्या सुरवातीपासून निसर्गाची सुरु झालेली अवकृपा आता अंतिम टप्प्यातही कायम असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.

माळरानावर बाग अन् रखरखते ऊन

मराठवाड्यातही उत्पादन वाढीसाठी शेतकरी एक ना अनेक प्रयोग करीत आहेत. असाच प्रयोग कळंब तालुक्यातील दिगंबर कापसे यांनी केला होता. त्यांनी तब्बल 5 एकरावर आंबा बाग लावली. शिवाय आता तोडणी काही दिवसांवर आली असतानाच आंबे हे पूर्णत: भाजले आहेत. त्यामुळे त्याच्यावर प्रक्रिया होऊन त्याची विक्री आता शक्यच नाही. कधी अवकाळी तर कधी उन्हाचा तडाखा हे शेतकऱ्यांच्या मुळावर कायम आहे. यामध्ये 10 लाखाचे नुकसान झाले असून भरपाईची मागणी शेतकरी करीत आहेत.

अधिकारीही चक्रावून गेले

फळतोडणीच्या अवस्थेतील बागेची पाहणी करुन कृषी अधिकारीही चक्रावून गेले. अवघ्या काही दिवसांवर आंबा काढणी सुरु होणार तेवढ्यात हे न भरुन निघणारे त्यांचे नुकसान झालेन आहे. आंब्याची झाडे तर करपली असून आंबा पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या तीन वर्षापासून कापसे हे बाग जोपासत होते. बागेचा काही भाग हा शॉर्चसर्किटमुळे जळाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

वाढत्या उन्हामुळे उत्पादनावर परिणाम

गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातही ऊन्हाचा पारा वाढला आहे. 42 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामातील पिके तर धोक्यात आलीच आहेत पण फळबागांनाही त्याचा धोका निर्माण झाला आहे. आंबा फळपिकाची गळती झाली की तो एका भागाकडून भाजलाच जातो. त्यामुळे हे न भरुन निघणारे नुकसान असून भरपाईची मागणी कापसे यांनी केली आहे.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.