Osmanabad : वाढत्या उन्हामुळे आंबा बागेचे नुकसान, बागेची अवस्था पाहून कृषी अधिकारीही चक्रावले

मराठवाड्यातही उत्पादन वाढीसाठी शेतकरी एक ना अनेक प्रयोग करीत आहेत. असाच प्रयोग कळंब तालुक्यातील दिगंबर कापसे यांनी केला होता. त्यांनी तब्बल 5 एकरावर आंबा बाग लावली. शिवाय आता तोडणी काही दिवसांवर आली असतानाच आंबे हे पूर्णत: भाजले आहेत. त्यामुळे त्याच्यावर प्रक्रिया होऊन त्याची विक्री आता शक्यच नाही.

Osmanabad : वाढत्या उन्हामुळे आंबा बागेचे नुकसान, बागेची अवस्था पाहून कृषी अधिकारीही चक्रावले
वाढत्या उन्हामुळे माळरानावरील आंब्याची अशी अवस्था झाली आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 02, 2022 | 2:34 PM

उस्मानाबाद : निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका हा (Mango Fruit) आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला आहे. मध्यंतरी मोहर लगडला असताना अवकाळीमुळे सुरु झालेले नुकसान हे फळ लागेपर्यंत कायम राहिले. आता (Mango) आंबा तोडणी अवस्थेत वाढत्या उन्हाचा असा काय परिणाम झाला आहे की (Osmanabad) कळंब तालुक्यातील दिगंबर कापसे यांची 5 एकरातील आंबा अक्षरश: करपला आहे. आता तोडणीला आला असतानाच ही अशी अवस्था झाल्याने कापसे यांना लाखोंचा फटका बसला आहे. कृषी अधिकारी यांनी पंचनामा केला असून आंबा बागेची ही अवस्था शॉर्टसर्किटमुळे झाली की वाढत्या उन्हामुळेच बाग कपरली याची पाहणी केली जात आहे. मात्र, हंगामाच्या सुरवातीपासून निसर्गाची सुरु झालेली अवकृपा आता अंतिम टप्प्यातही कायम असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.

माळरानावर बाग अन् रखरखते ऊन

मराठवाड्यातही उत्पादन वाढीसाठी शेतकरी एक ना अनेक प्रयोग करीत आहेत. असाच प्रयोग कळंब तालुक्यातील दिगंबर कापसे यांनी केला होता. त्यांनी तब्बल 5 एकरावर आंबा बाग लावली. शिवाय आता तोडणी काही दिवसांवर आली असतानाच आंबे हे पूर्णत: भाजले आहेत. त्यामुळे त्याच्यावर प्रक्रिया होऊन त्याची विक्री आता शक्यच नाही. कधी अवकाळी तर कधी उन्हाचा तडाखा हे शेतकऱ्यांच्या मुळावर कायम आहे. यामध्ये 10 लाखाचे नुकसान झाले असून भरपाईची मागणी शेतकरी करीत आहेत.

अधिकारीही चक्रावून गेले

फळतोडणीच्या अवस्थेतील बागेची पाहणी करुन कृषी अधिकारीही चक्रावून गेले. अवघ्या काही दिवसांवर आंबा काढणी सुरु होणार तेवढ्यात हे न भरुन निघणारे त्यांचे नुकसान झालेन आहे. आंब्याची झाडे तर करपली असून आंबा पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या तीन वर्षापासून कापसे हे बाग जोपासत होते. बागेचा काही भाग हा शॉर्चसर्किटमुळे जळाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

हे सुद्धा वाचा

वाढत्या उन्हामुळे उत्पादनावर परिणाम

गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातही ऊन्हाचा पारा वाढला आहे. 42 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामातील पिके तर धोक्यात आलीच आहेत पण फळबागांनाही त्याचा धोका निर्माण झाला आहे. आंबा फळपिकाची गळती झाली की तो एका भागाकडून भाजलाच जातो. त्यामुळे हे न भरुन निघणारे नुकसान असून भरपाईची मागणी कापसे यांनी केली आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.