AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Market : निसर्गाच्या लहरीपणामुळे मिरची उत्पादनात घट, ग्राहकांना वाढीव दराचा ‘ठसका’

कांदा, मिरची, भाजीपाला ही हंगामी पिके शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर टाकतात. यंदा मात्र, निसर्गाच्या अवकृपेमुळे मुख्य पिकांना तर फटका बसलाच आहे पण हंगामी पिकांचेही उत्पादन घटले आहे. मुख्य पिकांमध्ये झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी एक ना अनेक प्रयत्न केले मात्र, अखेरच्या टप्प्यात झालेल्या अतिवृष्टी आणि किडीच्या प्रादुर्भावामुळे मिरचीचे यंदा पाच पटीने उत्पादन घटले आहे.

Nagpur Market : निसर्गाच्या लहरीपणामुळे मिरची उत्पादनात घट, ग्राहकांना वाढीव दराचा 'ठसका'
नागपूरातील कळमना येथील बाजार समितीमध्ये मिरचीची आवक सुरु झाली आहे
| Edited By: | Updated on: Feb 05, 2022 | 12:32 PM
Share

नागपूर : कांदा, मिरची, भाजीपाला ही हंगामी पिके शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर टाकतात. यंदा मात्र, निसर्गाच्या अवकृपेमुळे मुख्य पिकांना तर फटका बसलाच आहे पण (Seasonal Crop) हंगामी पिकांचेही उत्पादन घटले आहे. मुख्य पिकांमध्ये झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी एक ना अनेक प्रयत्न केले मात्र, अखेरच्या टप्प्यात झालेल्या अतिवृष्टी आणि किडीच्या प्रादुर्भावामुळे (Chilly) मिरचीचे यंदा पाच पटीने उत्पादन घटले आहे. याचा परिणाम सध्या बाजारपेठेत दिसून येत आहे. येथील (Nagpur Market) कळमना बाजार समितीमध्ये हंगामात 20 ते 25 हजार पोत्यांची मिरचीची आवक होत असते. यंदा मात्र, बाजारात मिरचीचा ठसका कमी प्रमाणात असला तरी तो ग्राहकांना अधिक बसणार आहे. कारण पाचपटीने उत्पन्न घटल्याने हंगामाच्या सुरवातीलाच मिरचीचे दर हे 200 रुपये किलोवर पोहचले आहेत. शिवाय अशीच आवक घटत गेली तर दरात वाढ होणार असल्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहेत.

अतिवृष्टीने उत्पादन घटलं अन् कीड-रोगराईने सर्वकाही हिसकावलं

निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम यंदा शेती व्यवसयावरच दिसून येऊ लागला आहे. खरीप हंगामापासून अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि गारपिट यामुळे एकही पीक पूर्ण क्षमतेने शेतकऱ्यांच्या पदरी पडलेले नाही. वर्षभर झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी कांदा, मिरची या हंगामी पिकांचा आधार घेतला पण या पिकांचीही सुटका झाली नाही. नागपूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे मिरचीवर परिणाम झाला होता. ऐन बहरात असतानाच झालेल्या पावसामुळे वाढ खुंटली तर मिरची लागवडीवरही त्याचा परिणाम झाला. असे असतानाही शेतकऱ्यांनी जोपासणा केली मात्र, पुन्हा कीड-रोगराईमुळे थेट उत्पादनावरच परिणाम झाला आहे. त्यामुळे आवक घटली असून आता दरात वाढ होत आहे.

काय आहे बाजार समितीमधील चित्र?

येथील कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिरचीची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. मिरचीची तोडणी झाली आहे, वाळलेल्या मिरचीला अधिक दर मिळतो त्यामुळे अजूनही ऊन देण्याचेच काम सुरु आहे. असे असले तरी प्रतिकूल परस्थितीमुळे आवक घटणार हे निश्चित मानले जात आहे. कारण दरवर्षी कळमना येथील बाजार समितीमध्ये हंगामाच्या सुरवातीलाच 20 ते 25 हजार पोत्यांची आवक होत असते, पण यंदा केवळ 5 हजार पोत्यांची आवक होत आहे. घटलेल्या आवकचा थेट परिणाम आता मिरची दरावर होणार आहे. ठोक बाजारापेक्षा किरकोळ बाजारात अधिकचा ठसका उठणार असल्याचे बोलले जात आहे.

हंगामाच्या सुरवातीलाच मिरची 200 रुपये किलो

आवक घटली की शेतीमालाच्या दरात वाढ हे बाजारपेठेचे सुत्रच आहे. पण हंगामाच्या सुरवातीलाच मिरची आवक ही पाच पटीने घटलेली आहे. असे असतानाच 200 रुपये किलोवर दर गेले आहेत. आता भविष्यात अजून आवक घटली तर दरात वाढ निश्चित मानली जात आहे. शिवाय ठोक बाजार आणि किरकोळ बाजारातील चित्र हे वेगळे राहणार आहे. ठोक बाजाराच्या तुलनेत यंदा किरकोळ बाजारात दुपटीनेच दर राहणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ग्राहकांना मिरची चांगलीच झोंबणार अशीच सध्याची स्थिती आहे.

संबंधित बातम्या :

राज्यातील कृषी शिक्षण धोरणामध्येच होणार बदल, कशामुळे ओढावली नामुष्की? वाचा सविस्तर!

Nagpur: शासकीय केंद्रावरही नाही तुरीला दराची हमी, शेतकऱ्यांचा कल खुल्या बाजारपेठेकडेच

टरबूज-खरबूजची लागवड करताना ‘अशी’ करा वाणांची निवड, काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.