AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऊसाच्या रसापासून इथेनॉलच्या निर्मितीमध्ये ‘बोयोसिरप’ची महत्वाची भूमिका, काय आहे नवे तंत्र?

ऊसापासून इथेनॉलची निर्मिती हे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेतला विषय ठरलेला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वेळोवेळी इथेनॅाल निर्मितीचे अवाहन शेतकऱ्यांना केले आहे. ऊसाच्या रसापासून इथेनॉलची निर्मिती करता येते परंतू, नाशीवंत ऊसापासून याची निर्मिती होत नसल्याने 24 तासांमध्ये जेवढे उत्पादन होईल त्यावरच समाधान मानावे लागत होते. पण आता 'बायोसिरप'च्या माध्यमातून ऊसाचा रस हा वर्षभर टिकून राहणार आहे.

ऊसाच्या रसापासून इथेनॉलच्या निर्मितीमध्ये 'बोयोसिरप'ची महत्वाची भूमिका, काय आहे नवे तंत्र?
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Dec 09, 2021 | 12:40 PM
Share

पुणे : उसापासून इथेनॉलची निर्मिती हे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेतला विषय ठरलेला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वेळोवेळी इथेनॅाल निर्मितीचे अवाहन शेतकऱ्यांना केले आहे. ऊसाच्या रसापासून इथेनॉलची निर्मिती करता येते परंतू, नाशीवंत ऊसापासून याची निर्मिती होत नसल्याने 24 तासांमध्ये जेवढे उत्पादन होईल त्यावरच समाधान मानावे लागत होते. पण आता ‘बायोसिरप’च्या माध्यमातून ऊसाचा रस हा वर्षभर टिकून राहणार आहे. त्यामुळे वर्षभर इथेनॅालची निर्मिती शक्य होणार आहे. पुणे येथील प्राज कंपनीच्या वतीने हे तंत्र विकसीत करण्यात आले आहे. त्यामुळे ऊसाच्या रसावर विशिष्ट प्रक्रिया करता येणार आहे.

साखर कारखान्यांच्या अर्थकारणाला मिळेल बळकटी

सध्या उसाचे गाळप मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मात्र, इथेनॉल निर्मितीला काही तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने काही कालावधीपूरताच हा हंगाम सुरु राहत होता. कारण 24 तासानंतर ऊसाचा रस हा नाशवंत असल्याने जोपर्यंत गाळप हंगाम सुरु आहे. तोपर्यंतच इथेनॉलची निर्मिती होत होती. मात्र, आता रसाचे रुपांतर दीर्घकाळ टिकवणक्षमता असलेल्या पाकात होणार आहे. त्यामुळे साखर कारखाने हे वर्षभर या रसातून इथेनॉलची नर्मिती करु शकणार आहेत. त्यामुळे कारखान्याचे अर्थकारण तर सुधारेलच पण इंधनामध्ये जे इथेनॉल वापरण्याचा सरकारचा उद्देश आहे तो सुध्दा साध्य होणार आहे.

कुठे झाला पहिला प्रोजेक्ट?

इथेनॉल निर्मितीच्या अनुशंगाने कराड येथील जयवंत शुगरमध्ये पहिला प्रोजेक्ट ‘प्राज’ या कंपनीच्या वतीने उभारण्यात आला आहे. वर्षभर साठवलेल्या साखर पाकातील शर्कराघटक कमी झाला नसल्याचे सिद्ध झाले आहे. देशात अतिरिक्त साखरेचा साठा 60 लाख टनांचा झाला आहे. या साठ्यामुळे साखर कारखान्यांचा पैसा अडकून आर्थिक नियोजन विस्कळीत झाले आहे. मात्र बायोसिरपने इथेनॉलचा व्यावसायिक मार्ग आता शाश्‍वत केला आहे. या प्रोजेक्टच्या उद्घाटनासाठी साखर आयुक्त शेखर गायकवाड हे उपस्थित होते. या बायोसिरपमुळे साठवणूकीतील ऊसाच्या रसावर काही परिणाम होत नसल्याने इथेनॉल निर्मिती शक्य आहे.

योग्य नियोजन अन् उद्देशही साध्य

आतापर्यंत इथेनॉलची निर्मिती इथपर्यंत ठिक होते. पण यासाठी वेळेची मर्यादा होती. ऊसाचा रस चांगल्या अवस्थेत असतानाच इथेनॉलची निर्मिती शक्य होते. पण हा रस 24 तासानंतर नाशवंत होत होता. मात्र, ‘प्राज’ कंपनीने बायोसिरपच्या माध्यमातीन ऊसाच्या रसाची साठवण क्षमता तर वाढवली आहेच शिवाय यामध्ये ऊसाच्या रसाचे रुपांतर हे दीर्घकालीन टिकवणक्षमता असलेल्य पाकात होत आहे. त्यामुळे वर्षभर त्याच्या दर्जावर कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे वर्षभऱ कुठेही आणि कधीही इथेनॉलची निर्मिती होणार आहे. तर इंधनामध्ये 20 टक्के इथेनॉलचे मिश्रण हा सरकारचा उद्देशही साध्य होणार असल्याचे प्राज इंडस्टिज लिमिटेडचे अध्यक्ष प्रमोद चौधरी यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

सोयापेंड आयातीला ‘ब्रेक’, आता सोयाबीनची साठवणूक की विक्री ? शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

भाजीपाला रोपवाटिका काळाची गरज, असे करा व्यवस्थापन

दुधाळ जनावरांपासून उत्पादन वाढविण्याची शेतकऱ्यांना संधी, अनुदानावर मिळणार गाई-म्हशी

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.