AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुष्काळात तेरावा : डाळिंबाचे उत्पादन निम्म्याने घटले तरीही दर गडगडले, काय आहेत नेमकी कारणं?

उत्पादनात घट म्हणजे दरात वाढ हे निश्चित मानले जाते आणि हेच बाजारपेठेचे सुत्रही आहे. मात्र, डाळिंबाच्या बाबतीत हे उलटे होताना दिसत आहे. कारण यंदा अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि वातावरणातील बदल यामुळे राज्यातील उत्पादनात निम्म्याने घट झाली आहे.

दुष्काळात तेरावा : डाळिंबाचे उत्पादन निम्म्याने घटले तरीही दर गडगडले, काय आहेत नेमकी कारणं?
वातावरणातील बदलामुळे डाळिंब बागेवर परिणाम झााल आहे, त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे.
| Edited By: | Updated on: Dec 29, 2021 | 5:22 PM
Share

नागपूर : उत्पादनात घट म्हणजे दरात वाढ हे निश्चित मानले जाते आणि हेच बाजारपेठेचे सुत्रही आहे. मात्र, (Pomegranate production) डाळिंबाच्या बाबतीत हे उलटे होताना दिसत आहे. कारण यंदा (Heavy Rain) अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि वातावरणातील बदल यामुळे राज्यातील उत्पादनात निम्म्याने घट झाली आहे. असे असताना पदरी पडलेल्या डाळिंबाला अधिकचा दर मिळून झालेल्या नुकसानीची कसर भरुन काढता येईल असा शेतकऱ्यांचा कयास होता. पण झाले उलटे (Market) बाजारपेठेतले दर अणखीन घसरले आहेत. राज्यातील डाळिंबाचे उत्पादन घटले असले तरी गुजरात आणि राजस्थानमधून मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने हा परिणाम झाला आहे. त्यामुळे राज्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसलेला आहे.

मृग बहर अधिकचा असूनही उत्पादनात घटच

देशात तब्बल 2 लाख हेक्टरावर डाळिंबाची लागवड केली जाते. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. देशात 80 हजार हेक्टरवर डाळिंबाचा मृग बहर धरला जातो. त्यापैकी महाराष्ट्राचा मृग बहरातील 70 टक्के इतका वाटा आहे. कर्नाटक राज्यात काही भागांत अतिवृष्टी तर काही भागात कमी पाऊस झाला. त्यामुळे तेथील डाळिंबावर फारसा परिणाम झाला नाही. मात्र, महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. येथील नुकसान पाहूनच आता परराज्यातून डाळिंबाची आवक वाढलेली आहे.

असा राहिला आहे डाळिंबाचा दर

यंदा हंगामाच्या सुरवातीला डाळिंबाला 130 ते 150 रुपये दर होता. शिवाय मध्यंतरी नुकसानीच्या दरम्यान यामध्ये अजून 15 ते 20 रुपयांची वाढ झाली होती. निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट झाली तरी वाढलेल्या दरातून अधिकचा पैसा पदरी पडेल अशी आशा डाळिंब उत्पादकांना होती. पण ऐन वेळी आता परराज्यातून डाळिंबाची आवक वाढल्याने दरात घसरण सुरु झाले आहे. आता डाळिंब थेट 100 ते 80 रुपये किलोवर येऊन ठेपले आहेत. त्यामुळे राज्यातील डाळिंब उत्पादकांना याचा दुहेरी फटका बसलेला आहे.

निर्यातीवरही परिणाम

देशातून निर्यात होणाऱ्या डाळिंबामध्ये महाराष्ट्र राज्याची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. दरवर्षी देशातून डाळिंबाची युरोपला 2 हजार टन निर्यात होते. गतवर्षी देखील अतिवृष्टीचा फटका बसल्याने देशातून अवघे 300 टन डाळिंबाची युरोपला निर्यात झाली होती. मात्र यंदा सुद्धा राज्यात अतिवृष्टी, तेलकट रोगाचा प्रादुर्भाव आणि पिन बोअर होल या तिहेरी संकटाचा फटका डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना करावा लागला आहे. त्यामुळे अवकाळी, अतिवृष्टी आणि वातावरणातील बदलाचा परिणाम केवळ हंगामातील पिकांवरच नाही फळबागांवरही झालेला आहे. शिवाय तो अधिक परिणामकारक आहे हे महत्वाचे.

संबंधित बातम्या :

आता खासगी बाजार समित्यांच्या उभारणीवरुन शेतकरी संघटना आक्रमक, काय आहे केंद्र सरकारला लिहलेल्या पत्रात?

Positive News | आवक वाढूनही सोयाबीनचे दर स्थिरावले, तरीही शेतकऱ्यांनी…

पुन्हा पहिले दिवस : पांढऱ्या कापसाला सोन्याचा भाव, दोन दिवसात असे काय झाले अन् विक्रमी दर मिळाला!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.