दुष्काळात तेरावा : डाळिंबाचे उत्पादन निम्म्याने घटले तरीही दर गडगडले, काय आहेत नेमकी कारणं?

उत्पादनात घट म्हणजे दरात वाढ हे निश्चित मानले जाते आणि हेच बाजारपेठेचे सुत्रही आहे. मात्र, डाळिंबाच्या बाबतीत हे उलटे होताना दिसत आहे. कारण यंदा अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि वातावरणातील बदल यामुळे राज्यातील उत्पादनात निम्म्याने घट झाली आहे.

दुष्काळात तेरावा : डाळिंबाचे उत्पादन निम्म्याने घटले तरीही दर गडगडले, काय आहेत नेमकी कारणं?
वातावरणातील बदलामुळे डाळिंब बागेवर परिणाम झााल आहे, त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे.
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 5:22 PM

नागपूर : उत्पादनात घट म्हणजे दरात वाढ हे निश्चित मानले जाते आणि हेच बाजारपेठेचे सुत्रही आहे. मात्र, (Pomegranate production) डाळिंबाच्या बाबतीत हे उलटे होताना दिसत आहे. कारण यंदा (Heavy Rain) अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि वातावरणातील बदल यामुळे राज्यातील उत्पादनात निम्म्याने घट झाली आहे. असे असताना पदरी पडलेल्या डाळिंबाला अधिकचा दर मिळून झालेल्या नुकसानीची कसर भरुन काढता येईल असा शेतकऱ्यांचा कयास होता. पण झाले उलटे (Market) बाजारपेठेतले दर अणखीन घसरले आहेत. राज्यातील डाळिंबाचे उत्पादन घटले असले तरी गुजरात आणि राजस्थानमधून मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने हा परिणाम झाला आहे. त्यामुळे राज्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसलेला आहे.

मृग बहर अधिकचा असूनही उत्पादनात घटच

देशात तब्बल 2 लाख हेक्टरावर डाळिंबाची लागवड केली जाते. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. देशात 80 हजार हेक्टरवर डाळिंबाचा मृग बहर धरला जातो. त्यापैकी महाराष्ट्राचा मृग बहरातील 70 टक्के इतका वाटा आहे. कर्नाटक राज्यात काही भागांत अतिवृष्टी तर काही भागात कमी पाऊस झाला. त्यामुळे तेथील डाळिंबावर फारसा परिणाम झाला नाही. मात्र, महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. येथील नुकसान पाहूनच आता परराज्यातून डाळिंबाची आवक वाढलेली आहे.

असा राहिला आहे डाळिंबाचा दर

यंदा हंगामाच्या सुरवातीला डाळिंबाला 130 ते 150 रुपये दर होता. शिवाय मध्यंतरी नुकसानीच्या दरम्यान यामध्ये अजून 15 ते 20 रुपयांची वाढ झाली होती. निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट झाली तरी वाढलेल्या दरातून अधिकचा पैसा पदरी पडेल अशी आशा डाळिंब उत्पादकांना होती. पण ऐन वेळी आता परराज्यातून डाळिंबाची आवक वाढल्याने दरात घसरण सुरु झाले आहे. आता डाळिंब थेट 100 ते 80 रुपये किलोवर येऊन ठेपले आहेत. त्यामुळे राज्यातील डाळिंब उत्पादकांना याचा दुहेरी फटका बसलेला आहे.

निर्यातीवरही परिणाम

देशातून निर्यात होणाऱ्या डाळिंबामध्ये महाराष्ट्र राज्याची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. दरवर्षी देशातून डाळिंबाची युरोपला 2 हजार टन निर्यात होते. गतवर्षी देखील अतिवृष्टीचा फटका बसल्याने देशातून अवघे 300 टन डाळिंबाची युरोपला निर्यात झाली होती. मात्र यंदा सुद्धा राज्यात अतिवृष्टी, तेलकट रोगाचा प्रादुर्भाव आणि पिन बोअर होल या तिहेरी संकटाचा फटका डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना करावा लागला आहे. त्यामुळे अवकाळी, अतिवृष्टी आणि वातावरणातील बदलाचा परिणाम केवळ हंगामातील पिकांवरच नाही फळबागांवरही झालेला आहे. शिवाय तो अधिक परिणामकारक आहे हे महत्वाचे.

संबंधित बातम्या :

आता खासगी बाजार समित्यांच्या उभारणीवरुन शेतकरी संघटना आक्रमक, काय आहे केंद्र सरकारला लिहलेल्या पत्रात?

Positive News | आवक वाढूनही सोयाबीनचे दर स्थिरावले, तरीही शेतकऱ्यांनी…

पुन्हा पहिले दिवस : पांढऱ्या कापसाला सोन्याचा भाव, दोन दिवसात असे काय झाले अन् विक्रमी दर मिळाला!

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.