AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Krishi Udan Scheme : शेतकऱ्यांचा शेतीमाल सातासमुद्रापार, असा घ्या योजनेचा लाभ..!

शेतकऱ्यांचे केवळ उत्पादन नाही तर उत्पन्नवाढीसाठीही केंद्र सरकार हे प्रयत्न करीत आहे. काळाच्या ओघात शेती उत्पादनात वाढ झाली आहे पण त्यासाठी योग्य बाजारपेठ मिळणे तेवढेच गरजेचे आहे. कारण भारतामधील 60 टक्के जनता ही केवळ शेती व्यवसायावर अवलंबून आहे. शेतीमालाला योग्य दर मिळावा म्हणून हमीभाव योजना तर राबवली जात आहेच पण मागणी असलेल्या देशांमध्ये शेतीमालाचा पुरवठा करुन शेतकऱ्यांना अधिकचा फायदा व्हावा याकरिता सन 2020 मध्ये कृषी उडान योजना सुरु करण्यात आली होती.

Krishi Udan Scheme : शेतकऱ्यांचा शेतीमाल सातासमुद्रापार, असा घ्या योजनेचा लाभ..!
कृषी उडाण योजना
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Apr 07, 2022 | 9:31 AM
Share

मुंबई : शेतकऱ्यांचे केवळ उत्पादन नाही तर उत्पन्नवाढीसाठीही (Central Government) केंद्र सरकार हे प्रयत्न करीत आहे. काळाच्या ओघात (Farm Production) शेती उत्पादनात वाढ झाली आहे पण त्यासाठी योग्य बाजारपेठ मिळणे तेवढेच गरजेचे आहे. कारण भारतामधील 60 टक्के जनता ही केवळ शेती व्यवसायावर अवलंबून आहे. शेतीमालाला योग्य दर मिळावा म्हणून हमीभाव योजना तर राबवली जात आहेच पण मागणी असलेल्या देशांमध्ये शेतीमालाचा पुरवठा करुन शेतकऱ्यांना अधिकचा फायदा व्हावा याकरिता सन 2020 मध्ये (Krushi Udan Yojna) कृषी उडान योजना सुरु करण्यात आली होती. एवढेच नाही तर योजनेचे स्वरुप पाहून पुन्हा ऑक्टोंबर 2021 मध्ये 2.0 मध्ये श्रेणी सुधार करण्यात आला आहे. यामुळे नाशवंत शेतीमालाची वाहतूक ही वेळीच करणे शक्य झाले आहे. जिथे सर्व नुकसानीचे ठरत होते त्याठिकाणी आता योजनेमुळे अधिकचा फायदा होऊ लागला आहे.

विमानातील जागा शेतीमालासाठी आरक्षित

केवळ योजनांची घोषणाच नाही तर त्याची अंमलबजावणीकडेही सरकारने लक्ष दिले आहे. देशातून शेतीमालाची योग्य पध्दतीने वाहतूक व्हावी या दृष्टीने विमानातील निम्या जागा आरक्षित करुन याकरिता अनुदानही दिले जात आहे. यामध्यमातून मासे, दूध, दुग्धजन्य पदार्थ तसेच मांस यासारख्या व्यवसयासंबधीची वाहतूक करणे सोपे होणार आहे. शेतीमाल उत्पादित झाल्यानंतर तो साठवून राहिला तर अधिक प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे कष्ट हे वाया जाते. या नुकसानीपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि योग्य वेळी पिके बाजारात नेण्यासाठी पंतप्रधान कृषी उडान योजना उपयोगी पडत आहे.

कृषी उडान योजनेत 8 मंत्रालयांचा हातभार

कुण्या एका शेतीमालासाठी नाही तर वेगवेगळा शेतीमाल परदेशातील बाजारपेठेत उपलब्ध करुन शेतकऱ्यांना अधिकचा फायदा मिळवून देण्याचा सरकारचा उद्देश आहे. त्यामुळे कृषी उडान योजनेमध्ये नागरी हवाई वाहतूक मंत्रालय, कृषी व शेतकरी कल्याण विभाग, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय, वाणिज्य विभाग, आदिवासी व्यवहार मंत्रालय, ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय यांचा समावेश आहे. वर्षागणीस विमानतळांचा सहभाग वाढवला जात आहे. औरंगाबादची यामध्ये नुकतीच भर पडली आहे. देशभरातील 53 विमानतळे ही या योजनेसाठी जोडण्यात आली आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय हवाई मार्गाचाही समावेश असल्याचे हवाई वाहतूक राज्यमंत्री व्ही.के सिंह यांनी सांगितले आहे. शेतकरी शेतीमालाची आयात-निर्यातीमधून अधिकचा नफा कमावत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

योजनेत सहभागी होण्यासाठी पात्रता अन् आवश्यक कागदपत्रे

1) प्रधानमंत्री कृषी उडान योजनेचा लाभ झाल्यास अर्जदाराला भारताचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे. 2)अर्जदार शेतकरी असावा, तरच त्याला हा फायदा होईल. 3) अर्जासाठी आवश्यक आधार कार्ड 4) अर्जदाराला शेतीशी संबंधित कागदपत्रे दाखवावी लागतील 5) अर्जदाराने निवास प्रमाणपत्र दाखवायलाच हवे. 6) दोन उत्पन्न प्रमाणपत्रातही अर्जदार दाखवू शकतो. 7) रेशन कार्ड. 8) मोबाइल क्रमांक आदी बाबींची आवश्यकता आहे.

संबंधित बातम्या :

मराठवाड्यात उभा राहतोय रेशीम शेतीचा पर्याय, लागवड ते काढणी असे करा नियोजन..!

Rabi Season: ज्वारी बाजारात, पहिला मान सोलापूर बाजार समितीला, हंगामाच्या सुरवातीला मुख्य पिकाचे चित्र काय?

Drone Farming: ‘ड्रोन’ खरेदीबाबत महत्वाचा निर्णय, नियमांचे पालन करा अन्यथा कृषी संस्थांनाचा भुर्दंड

Follow Us
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं कृत्य, थेट स्टेटस  ठेवला अन्... पुढे काय घडलं?
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी...
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी अरेरावी, थेट अर्वाच्च भाषेत... व्हिडीओ व्हायरल
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे..
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच..
Bhandara | क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच जण....
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...
छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर...; सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा
Supriya Sule | छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर...; सुप्रिया सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा
मला राज्यसभेवर जायचंय पण आता... छगन भुजबळ अखेर बोललेच, राष्ट्रवादीत...
मला राज्यसभेवर जायचंय पण आता... छगन भुजबळ अखेर बोललेच, राष्ट्रवादीत मोठी खलबत
INDIA आघाडीच्या बैठकीआधी दिल्लीत बॅनरबाजी! राहुल गांधींसह विरोधी नेते.
INDIA आघाडीच्या बैठकीआधी दिल्लीत बॅनरबाजी! राहुल गांधींसह विरोधी नेते टार्गेट, राजकारण तापलं
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दिल्लीत; राजकीय घडामोडींना वेग
DCM Eknath Shinde | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दिल्लीत; राजकीय घडामोडींना वेग, चर्चांना उधाण!