AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fertilizer : खरीप पेरणी अंतिम टप्प्यात तरीही शेतकरी खताच्या प्रतिक्षेत..! तुटवड्याचे कारण ऐकूण चक्रावून जाताल

पिकांची वाढ आणि उत्पादनासाठी रासायनिक खताचा मारा हा गरजेचाच आहे. यावरच उत्पादन अवलंबून आहे. काळाच्या ओघात सेंद्रीय शेतीचा प्रचार आणि प्रसार केला जात असला तरी प्रत्यक्षात शेत शिवारातील स्थिती ही वेगळी आहे. आजही रासायनिक खताचा डोस दिला तरच उत्पादनात वाढ होणार आहे.

Fertilizer : खरीप पेरणी अंतिम टप्प्यात तरीही शेतकरी खताच्या प्रतिक्षेत..! तुटवड्याचे कारण ऐकूण चक्रावून जाताल
रासायनिक खत
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Aug 05, 2022 | 6:01 PM
Share

रत्नागिरी :  (Kharif Season) खरीप हंगामातील पेरणी अंतिम टप्प्यात असतानाही रासायनिक खताचा प्रश्न हा कायम आहे. हंगामाच्या सुरवातीपासून जागतिक स्तरावरील परस्थिती आणि खतासाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाचा तुटवडा यामुळे टंचाई निर्माण होणार याबाबत शंकाच नव्हती. पण रत्नागिरीमध्ये (Chemical Fertilizer) खताचा तुटवडा का निर्माण झाला यामागे रंजक कथाच आहे. एकीकडे पावसाने खरीप हंगाम लांबणीवर पडला आणि दुसरीकडे वेळेत खत पुरवठा न झाल्याने दुष्काळात तेरावा अशी स्थिती निर्माण झाली होती. (Kokon) कोकणात रेल्वेच्या माध्यमातून खताचा पुरवठा केला जातो. यावर्षी अधिकच्या पावसामुळे रस्त्याचा पर्याय निवडण्यात आला होता. यातूनही वेळेत खताचा पुरवठा हा झाला नसल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 3 हजार मेट्रीक टन खताची प्रतिक्षा ही कायम आहे. त्यामुळे दुष्काळात तेरावा अशीच स्थिती निर्माण झाली आहे.

खरिपासाठी 14 हजार मेट्रीक टन खत मंजूर

खरीप हंगामात शेतकऱ्यांना खताचा तुटवडा भासू नये म्हणून कृषी विभागाने हंगाम सुरु होण्यापूर्वीच 14 हजार मेट्रीक टनाची गरज असल्याचे स्पष्ट केले होते. हंगामाच्या सुरवातीला 11 हजार 121 मेट्रीक टन खताचा पुरवठा झाला. पण त्यानंतर रेल्वेने होणारा पुरवठा हा रखडला होता. एकीकडे पावसाची रिपरिप आणि दुसरीकडे खताची शेतकऱ्यांना प्रतिक्षा. त्यामुळे यंदा खरिपाबाबत कोणतेच काम वेळेत झाले नाही. याचा उत्पादनावर काय परिणाम होणार हे पहावे लागणार आहे. उर्वरित खताच्या पुरवठ्यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न हे सुरु आहेत.

खत टंचाईमुळे शेतकऱ्यांची गैरसोय

पिकांची वाढ आणि उत्पादनासाठी रासायनिक खताचा मारा हा गरजेचाच आहे. यावरच उत्पादन अवलंबून आहे. काळाच्या ओघात सेंद्रीय शेतीचा प्रचार आणि प्रसार केला जात असला तरी प्रत्यक्षात शेत शिवारातील स्थिती ही वेगळी आहे. आजही रासायनिक खताचा डोस दिला तरच उत्पादनात वाढ होणार आहे. मात्र, पेरणीसाठीच खताची आवश्यकता असताना रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्यापही प्रतिक्षा करावी लागत आहे.

उत्पादनावर काय परिणाम?

कोकणामध्ये यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला आहे. शिवाय काही भागात पावसामुळे भात लागवडही रखडलेली आहे. भर पावसात खताविना लागवड झाली तर त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होणार आहे. त्यामुळे वेळेत खत मिळाले तर अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा हातभार लागणार आहे. कृषी विभागाच्या मनमानी कारभारामुळेच खत वेळेत पुरवले गेले नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहे. तर दुसरीकडे वेळेत खत पुरवठा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.

Follow Us
अण्णा हजारे मैदानात! CJP आंदोलनाला मोठा पाठिंबा; मौन आंदोलनाची घोषणा
Anna Hajare | दिल्लीनंतर अण्णा हजारे मैदानात! CJP आंदोलनाला मोठा पाठिंबा; सरकारविरोधात मौन आंदोलनाची घोषणा
गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नेमकं काय घडलं?
Nashik Flood Rescue Operation | गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नाशिकमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन, नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही...
Jantar Mantar Students Protest | दिल्लीतील आंदोलनास्थळवरून अपडेट्स : धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही बंद
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी...

सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी..

धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागेल, नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर कॉकरोच जनता पार्टीची थेट पोस्ट...

धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागेल, नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर कॉकरोच जनता पार्टीची थेट पोस्ट..

हमारी छोरिया छोरो से कम नहीं.. मुंबईत तरुणीने थेट अडवली पोलिसांची गाडी.

हमारी छोरिया छोरो से कम नहीं.. मुंबईत तरुणीने थेट अडवली पोलिसांची गाडी

Gold Rate Today: सोन्याने पुन्हा घेतली भरारी ! किती महागलं सोनं-चांदी ? आज 1 तोळा सोन्याचे दर...

Gold Rate Today: सोन्याने पुन्हा घेतली भरारी ! किती महागलं सोनं-चांदी ? आज 1 तोळा सोन्याचे दर..

मुलांची डोकी फुटताना बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..; समीर चौघुलेंकडून तीव्र संताप व्यक्त.

मुलांची डोकी फुटताना बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..; समीर चौघुलेंकडून तीव्र संताप व्यक्त

CJP Protest: प्रत्येक मुलाला, विद्यार्थ्याला… युवराज सिंगकडून संताप व्यक्त, आंदोलनाबाबत स्पष्टच बोलला.

CJP Protest: प्रत्येक मुलाला, विद्यार्थ्याला… युवराज सिंगकडून संताप व्यक्त, आंदोलनाबाबत स्पष्टच बोलला