AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सेंद्रीय भाजीपाल्याची चव लई न्यारी, विषमुक्त अन्नाला ग्राहकांचे प्राधान्य

उन्हामुळे पाण्याचा स्तर खाली गेला आहे. यामुळे भाजीपाल्याचे उत्पन्न घेण्यासाठी मेहनत घ्यावी लागत आहे. भाजीपाला पिकं वाळत आहेत.

सेंद्रीय भाजीपाल्याची चव लई न्यारी, विषमुक्त अन्नाला ग्राहकांचे प्राधान्य
| Updated on: Jun 20, 2023 | 10:26 PM
Share

नवी दिल्ली : हिरवा भाजीपाला खाणे सर्वांची पसंती असते. यासाठी काही लोकं खूप खर्च करतात. तरीही लोकांना विषमुक्त भाजीपाला मिळत नाही. कारण बहुतेक शेतकरी जास्त उत्पादन व्हावे म्हणून रासायनिक शेती करतात. शेणाच्या ऐवजी शेतात रासायनिक खत आणि कीटकनाशकांचा वापर करतात. यामुळे हिरव्या भाजीपाल्याच्या टेस्टवर परिणाम पडतो. परंतु, देशात काही शेतकरी आहेत की जे सेंद्रीय शेती करतात. त्यांच्याकडून उगवण्यात आलेला भाजीपाला हातोहात बाराजात खपतो. आता आपण बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याची माहिती जाणून घेणार आहोत. कारण यांनी सेंद्रीय शेती करून आदर्श निर्माण केला.

उन्हाचा उत्पादनावर परिणाम

न्यूज १८ हिंदीच्या रिपोर्टनुसार, सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव मोहम्मद वसीम आहे. ते दरभंगा जिल्ह्यातील सीमइसीपूर गावात सेंद्रीय शेती करतात. शेतात पिकवलेला भाजीपाला बाजारात विकतात. यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळते. परंतु, उन्ह आणि लूमुळे भाजीपाला पिकावर वाईट परिणाम होतो. यामुळे उत्पन्नावर फरक पडतो.

पाण्याचा स्तर खाली गेला

मोहम्मद वसीम सांगतात की, उन्हामुळे पाण्याचा स्तर खाली गेला आहे. यामुळे भाजीपाल्याचे उत्पन्न घेण्यासाठी मेहनत घ्यावी लागत आहे. भाजीपाला पिकं वाळत आहेत. दूरवरून पाणी आणून सिंचन करावे लागत आहे. याशिवाय रासायनिक शेतीला पाणी जास्त लागते. त्यामुळे जलस्तर खाली गेला आहे.

२५ रुपये किलो विकतात भाजीपाला

मोहम्मद वसीम यांच्या शेतात कारले लावलेले आहेत. यासह अन्य भाजीपालाही होतो. हिरव्या भाजीपाल्याचे ते उत्पादन घेतात. परंतु, उन्हाळ्यात उन्हामुळे उत्पादनात घट होते. कारले सध्या २० ते २५ रुपये प्रती किलो विक्री करत आहेत. इतर भाजीपालाही महागला आहे. कारण उन्हामुळे उत्पादनात घट झाली आहे.

मोहम्मद वसीम यांनी सेंद्रीय शेतीची कास धरली. त्यामुळे त्यांच्या जीवनात परिवर्तन झाले आहे. विषमुक्त अन्न ते स्वतः खातात आणि ग्राहकांनाही देतात. यामुळे ते आनंदी आहेत. सेंद्रीय शेतातील माल असल्याने ग्राहक या भाजीपाल्यावर तुटून पडतात. बाजारात त्यांचा भाजीपाला हातोहात विकतो.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.