AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kharif Season : खरिपात सोयाबीन अन् कापसावरच राहणार भर, प्रतिकूल परस्थितीमध्येही अन्नधान्य उत्पादनात वाढ

उन्हाळी हंगामातील कापूस वगळता इतर पिकांची काढणी झालेली आहे. एवढेच नाही तर आता खरिपात उत्पादन कसे वाढवायचे या दृष्टीकोनातून प्रयत्न केले जात आहेत. कृषी विभागाच्या माध्यमातून उत्पादनवाढीसाठी शिवारनिहाय मार्गदर्शन करीत आहेत. पेरणीपूर्वी नांगरण, कोळपणी, मोगडा यासारखी कामे आटोपून घेतली जात आहेत. तर काही शेतकऱ्यांची कामे पूर्ण झाली असून आता प्रतिक्षा आहे ती पावसाची.

Kharif Season : खरिपात सोयाबीन अन् कापसावरच राहणार भर, प्रतिकूल परस्थितीमध्येही अन्नधान्य उत्पादनात वाढ
उत्पादनवाढीसाठी यंदाच्या खरिपात शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला आहे.Image Credit source: TV9 Marathi
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: May 20, 2022 | 4:23 PM
Share

मुंबई : सध्या शेतशिवारात केवळ (Agricultural cultivation) शेती मशागत आणि बांधबंधिस्तीची कामे सुरु आहेत. (Kharif Season) खरीपपूर्व मशागतीच्या कामांनी वेग घेतला असला तरी शेतकऱ्यांचे लक्ष राहणार आहे ते यंदाच्या हंगामातील पीक पध्दतीवर. यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन की कापूस अशीच स्थिती शेतकऱ्यांची होणार आहे. याकरिता या दोन्ही पिकांचे विक्रमी दर कारणीभूत ठरणार आहेत. असे असले तरी (Agricultural Department) कृषी विभागाने वर्तवलेला अंदाज तेवढाच महत्वाचा असून यंदाही खरिपात सोयाबीनचीच सरशी राहणार आहे. त्याचअनुशंगाने शेतकऱ्यांची वाटचाल असल्याचे दिसून येत आहे. कारण राज्यात 46 लाख हेक्टरावर सोयाबीन तर 42 लाख हेक्टरावर कापसाचा पेरा होईल असा अंदाज आहे. उत्पादनवाढीसाठी शेतकरी रात्रीचा दिवस करीत आहे. त्याला निसर्गाची साथ मिळाल्यावर उत्पादनात अधिकची भर पडणार आहे.

खरिपाची तयारी अंतिम टप्प्यात आता वेध पावसाचे

उन्हाळी हंगामातील कापूस वगळता इतर पिकांची काढणी झालेली आहे. एवढेच नाही तर आता खरिपात उत्पादन कसे वाढवायचे या दृष्टीकोनातून प्रयत्न केले जात आहेत. कृषी विभागाच्या माध्यमातून उत्पादनवाढीसाठी शिवारनिहाय मार्गदर्शन करीत आहेत. पेरणीपूर्वी नांगरण, कोळपणी, मोगडा यासारखी कामे आटोपून घेतली जात आहेत. तर काही शेतकऱ्यांची कामे पूर्ण झाली असून आता प्रतिक्षा आहे ती पावसाची. शिवाय 100 मिमी पेक्षा अधिक पाऊस झाल्यावरच शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ ठेवण्याचा सल्ला राज्य कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगतिले होते.पिकाचे एकूण 165.02 लाख मेट्रिक टन उत्पादन झाले असून सरासरी उत्पादनाच्या तुलनेत 39 टक्के वाढ झाली आहे. खरीप हंगाम 2021-22 मध्ये अन्नधान्य 81.60 लाख टन, खरीप गळीतधान्य 56.71 लाख टन, कापूस 71.20 लाख गाठी व ऊस 1139.33 लाख टन इतके उत्पादन झाले आहे.

कापसाला विक्रम, शेततकऱ्यांचा भऱ मात्र सोयाबीनवरच

कापसाला विक्रमी दर मिळाला असल्याने यंदाच्या खरिपात लागवड वाढणार यामध्ये शंका नाही. कापूस आता मराठावाड्यातून कमी होत असतानाच यंदाच्या वाढत्या दराचा परिणाम थेट लागवडीवर होणार आहेत. सोयाबीन आणि कापसामध्ये लागवड क्षेत्रावरुन स्पर्धा होत असली तरी शेतकऱ्यांचा कल हा सोयाबीनवरच राहणार आहे. पेरणी पासून काढणीपर्यंत कमी खर्च आणि अधिकचे उत्पादन यामुळे शेतकरी कापसाला प्राधान्य देत आहे.

अन्नधान्य उत्पादनात वाढ

गतवर्षीच्या प्रतिकूल परस्थितीमध्येही उत्पादनात वाढ झाली आहे. सरासरीच्या 39 टक्के वाढ झाली आहे. अन्नधान्याबरोबरच खरीप गळीत हंगाम 56.71 लाख टन, कापूस 71.20 लाख टन तर उसाचे उत्पादन 1139.33 लाख टन इतके झाले आहे. त्यामुळे निसर्गाचा लहरीपणा असला तरी उत्पादनामध्ये वाढ झाली ही बाब शेतकऱ्यांसाठी गर्वाची आहे.

Follow Us
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?