AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nandurbar : पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी की, विमा कंपन्यांच्या हितासाठी, नंदुरबारमध्ये विमा कंपन्यांचा अजबच प्रकार

नंदुरबार जिल्ह्यामध्ये कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागतो म्हणून शेतकऱ्यांनी पिकविमा योजनेत सहभाग नोंदवला शिवाय सर्व प्रक्रिया होऊन शेतकरी विमा योजनेच्या लाभासाठी पात्रही झाले. मात्र, आता पुन्हा यंदाच्या खरिपाचा हप्ता भरण्याची वेळ आली असतानाही गतवर्षाचा विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही.

Nandurbar : पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी की, विमा कंपन्यांच्या हितासाठी, नंदुरबारमध्ये विमा कंपन्यांचा अजबच प्रकार
नंदुबार जिल्ह्यातील शेतकरी गेल्या वर्षभरापासून पीकविमा योजनेपासून वंचित आहेतImage Credit source: TV9 Marathi
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: May 20, 2022 | 12:35 PM
Share

नंदुरबार : नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर त्याला दिलासा देण्याच्या अनुशंगाने (Central Government) केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीकविमा योजना राबवण्यास सुरवात केली होती. मात्र, काळाच्या ओघात विमा संरक्षण देण्यासाठी ज्या (Crop Insurance) विमा कंपन्यांची निवड करण्यात आली आहे त्यांचाच मनमानी कारभार आणि सरकारच्या धोरणामध्ये हस्तक्षेप वाढला आहे. आता (Nandurbar) नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्यापही गतवर्षीच्या नुकसानीचा विमा मिळालेला नाही. विशेष म्हणजे सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन देखील विमा रक्कम देण्यासाठी टाळटाळ केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

वर्षभरानंतरही कापसाचा परतावाच मिळाला नाही

नंदुरबार जिल्ह्यामध्ये कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागतो म्हणून शेतकऱ्यांनी पिकविमा योजनेत सहभाग नोंदवला शिवाय सर्व प्रक्रिया होऊन शेतकरी विमा योजनेच्या लाभासाठी पात्रही झाले. मात्र, आता पुन्हा यंदाच्या खरिपाचा हप्ता भरण्याची वेळ आली असतानाही गतवर्षाचा विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही. जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळांतर्गत गावातील शेतकऱ्यांना 2021 साली करण्यात आलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा परतावा देण्यात आलेला नाही. जिल्ह्यातील हजारो शेतकरी भरपाईसाठी पात्र असूनही रक्कम मिळत नसल्याने विमा कंपन्यांवर काहीतरी कार्यवाही करण्याची मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

महसूल विभागाकडून पंचनामे

गतवर्षी अतिवृष्टीमुळे खरिपातील सर्वच पिकांचे नुकसान झाले होते. मात्र, जिल्ह्यात अधिकच्या क्षेत्रावर कापसाची लागवड होती. पण पावसामुळे न भरुन निघणारे नुकसान तर पण दर्जा ढासळल्याने लागलीच दर मिळाला नाही. गेल्या हंगामात झालेल्या नुकसानीचे पंचनामे देखील महसूल विभागाकडून करण्यात आले होते. त्यानंतर तलाठींकडून पंचनामा करण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांनी विविध कागदपत्रेही जमा केली होती. परंतू नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान होवूनही शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळालेली नाही.

शेतकऱ्यांकडून तक्रारी दाखल

पीकविम्याचा लाभ घेण्यासाठी नुकसान झाल्यापासून अवघ्या दोन दिवसांमध्ये यासंबंधीचा अर्ज करुन नुकासन झालेल्या पिकांच्या बदल्यात नुकासानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून असते. मात्र, ज्या शेतकऱ्य़ांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले नाही तर त्यांना ऑफलाईन अर्ज करता येतात. अशा प्रकारे ऑनलाईन, ऑफलाईन ज्या गोंधाळात शेतकरी मदतीपासून वंचित राहिलेला आहे. विमा कंपन्यांनी 10 दिवसात रक्कम मिळाली नाही तर शेतकऱ्यांनी विमा कंपनी विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा