.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अन्नत्याग आंदोलनाचा समारोप, शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात संघर्ष सुरुच राहणार : आ. पाटील

लातूर येथे गेल्या तीन दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू होते. 72 तासाच्या अन्नत्याग आंदोलनाचे लोण महाराष्ट्रात पोहचेले होते. शिवाय या आंदोलनात शेतकऱ्यांचाही सहभाग वाढत होता. राज्य सरकारने जाहीर केलेली मदत म्हणजे शेतकर्‍यांच्या तोंडाला पाणे पुसण्याचे काम आहे. जोपर्यंत शेतकर्‍यांना योग्य न्याय मिळणार नाही तोपर्यंत संघर्ष सुरूच राहील असा इशारा माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिला आहे.

अन्नत्याग आंदोलनाचा समारोप, शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात संघर्ष सुरुच राहणार : आ. पाटील
लातूर येथे सुरु असलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा समारोप
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Oct 14, 2021 | 2:30 PM
Share

लातूर : मराठवाड्यातील (Marathwada) शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीची सरसकट भरपाई मिळावी याकरिता लातूर (Latur) येथे गेल्या तीन दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू होते. 72 तासाच्या अन्नत्याग आंदोलनाचे लोण महाराष्ट्रात पोहचेले होते. शिवाय या आंदोलनात शेतकऱ्यांचाही सहभाग (Participation of Farmers) वाढत होता. राज्य सरकारने जाहीर केलेली मदत म्हणजे शेतकर्‍यांच्या तोंडाला पाणे पुसण्याचे काम आहे. जोपर्यंत शेतकर्‍यांना योग्य न्याय मिळणार नाही तोपर्यंत संघर्ष सुरूच राहील असा इशारा माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिला आहे.

लातूर येथील शिवाजी चौकात जिल्ह्यातील 127 शेतकर्‍यांना सोबत घेवून आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी 72 तासाचे अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. नुकसानभरपाईच्या अनुशंगाने सुरु करण्यात आलेल्या आंदोलनात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता. केवळ बारामतीचा विकास करत आपण महाराष्ट्राचा विकास केला आहे आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आपण खंबीर आहोत असे सांगणार्‍या या जाणत्या राजाच्या सरकारने आता जी मदत घोषीत केली आहे ती मदत आम्हा शेतकर्‍यांना मान्य नसून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तर मराठवाडा महाराष्ट्रात आहे की नाही असेच वाटू लागलेले आहे.

कदाचितही मराठवाडा हा महाराष्ट्राचा भाग आहे याचा विसर पडला असावा असा प्रश्‍न उपस्थित केला. शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रूपयांची मदत द्यावी अशी मागणी करणाऱ्या मुख्यमंत्र्यानीच आता एकरी चार हजार रूपयांची मदत घोषीत करून शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोपही यावेळी आ. संभाजी पाटील यांनी केला.

14 शेतकऱ्यांची प्रकृती खालावली होती

अन्नत्याग आंदोलनात सहभागी झालेल्या 127 शेतकर्‍यांपैकी 14 शेतकर्‍यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आंदोलनाची सांगता जिल्ह्यातील वयोवृध्द शेतकर्‍यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत लिंबूपाणी देवून करण्यात आली. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी जिल्ह्यातील शंभर पेक्षा अधिक सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी आंदोलनस्थळी भेट दिली आणि आपल्या समर्थनाचे पत्र दिले. मात्र, हे आंदोलन एक शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचे व्यासपीठ होते. आंदोलनाचा समारोप झाला असला तरी शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्याविरोधात लढा हा सुरुच असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले आहे.

लातूरच्या पालकमंत्र्यावर नाव न घेता टीकास्त्र

मराठवाड्यातील कांहीजण मंत्री म्हणून काम करत आहेत. मात्र हे मंत्री केवळ आपली खुर्ची सांभाळण्यात व्यस्त असून त्यांना जनतेच्या आणि शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाशी कांहीच देणे-घेणे नसल्याचे वारंवार स्पष्ट झालेले आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजा मोठ्या संकटात सापडलेला असतांना त्यांना सरकारकडून मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करून त्यांनी सरकारला भाग पाडणे क्रमप्राप्त होते. या सर्वच मंत्र्यांचे तोंडावर बोट आणि हाताची घडी अशी स्थिती असून या मंत्र्यांकडून आता कोणतीच अपेक्षा ठेवू नये असे म्हणत त्यांनी पालकमंत्री अमित देशमुख यांच्यावर टीका केली.

हेक्टरी 50 हजार रुपये मदतीची मागणी

72 तासाच्या या आंदोलनात शेतकऱ्यांनीही एकच मागणी लावून धरली ती म्हणजे हेक्टरी 50 हजार रुपये मदत देण्याची. महाविकास सरकार सत्तेत येण्यापूर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली होती. त्या दरम्यान, त्यांनी हेक्टरी 50 हजार रुपये मदत करण्याची मागणी केली होती. आता तोच मुद्दा विरोधकांनी समोर आणला आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून हेक्टरी 50 हजार रुपये देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. (Food sacrifice agitation in Latur concludes, demands rs 50,000 per hectare assistance)

संबंधित बातमी :

कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू, ग्राहकांचे मात्र वांदे..!

आगोदर प्रोत्साहन अन् आता हात आखडता, शेतकरी कंपन्या अडचणीत

सोयाबीन 5 हजार रुपये क्विंटल तर काढणीला मजुरावर एकरी 5 हजाराचा खर्च

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर