AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amravati : संत्रा फळाला उन्हाची झळा, आंबिया बहर येताच फळगळ, अवकाळीनंतर वाढत्या उन्हाचा शेतकऱ्यांना ‘ताप’

संत्रा हे उन्हाळी हंगामातील मुख्य फळपीक आहे. असे असले तरी यंदा वाढत्या उन्हाचा सर्वाधिक फटका संत्रालाच बसलेला आहे. आंबिया बहरातील या फळाची आतापर्यंत 3 ते 4 वेळा गळती झाली आहे. त्यामुळे संत्रा लागवड असलेल्या 10 तालुक्यात शेती शाळेत कृषि विभाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जातं आहे.

Amravati : संत्रा फळाला उन्हाची झळा, आंबिया बहर येताच फळगळ, अवकाळीनंतर वाढत्या उन्हाचा शेतकऱ्यांना 'ताप'
वाढत्या उन्हामुळे फळगळतीचा धोका निर्माण झाला आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: May 13, 2022 | 10:50 AM
Share

अमरावती: फळ लागवड होण्यापूर्वी  (Unseasonable Rain)अवकाळीच्या अवकृपेमुळे उत्पादनात घट झाली तर आता वाढत्या (Summer) उन्हामुळे लागलेली फळे जमिनीवर गळत आहेत. निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका हा (Orchard) फळबागायत शेतकऱ्यांना बसलेला आहे. विदर्भाचा कैलिफोर्निया म्हणून समजल्या जाणारा अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी ह्या दिवसेंदिवस वाढत आहेत. जिल्ह्यातील वरूड, मोर्शी, चाँदुर बाजार ,धामणगाव तालुक्यात संत्रा फळबागेचे क्षेत्र अधिक प्रमाणात आहे. असे असताना मात्र, नैसर्गिक संकटामुळे उत्पादनात घट झाली आहे. आंबिया बहर सुरु होताच वाढत्या उन्हामुळे सुरु झालेली फळगळ ही कायम आहे.

वाढत्या उन्हामुळे तीन टप्प्यात फळगळ

संत्रा हे उन्हाळी हंगामातील मुख्य फळपीक आहे. असे असले तरी यंदा वाढत्या उन्हाचा सर्वाधिक फटका संत्रालाच बसलेला आहे. आंबिया बहरातील या फळाची आतापर्यंत 3 ते 4 वेळा गळती झाली आहे. त्यामुळे संत्रा लागवड असलेल्या 10 तालुक्यात शेती शाळेत कृषि विभाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जातं आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी शेतकऱ्यांना वेगवेगळे पर्याय सांगितले जात असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक अनिल खर्चान यांनी सांगितले आहे.

69 हजार हेक्टरावर संत्रा लागवड

विदर्भाचा कलिफोर्निया समजला जाणारा अमरावती जिल्ह्यातील मोर्शी ,वरूड, चांदुर बाजार, धामणगाव भागातला संत्रा आता अडचणीत आला आहे.अमरावती जिल्ह्यात जवळपास 69 हजार हेक्टरवर संत्रा लागवड आहे. यापैकी 40 हजार हेक्टरवर आंबिया बहार आहे. यावर्षी आंबिया बहार गळून गेला आहे. काही संत्रा बागेत तर आंबिया बहार आलाच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाल आहे .

उत्पादनापेक्षा खर्च अधिक

अमरावती जिल्ह्यात संत्रा हे मुख्य फळपिक आहे. मात्र, दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पन्नापेक्षा उत्पादनावरच अधिक खर्च होत आहे. त्यामुळे अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये सरकारकडून मदत मिळावी ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. परंतू , फळबागायत शेतकऱ्यांकडे सातत्याने सरकारचे दुर्लक्ष राहिलेले आहे. गेल्या दोन वर्षापासून अशाच संकटाचा सामना संत्रा उत्पादकांना करावा लागत आहे. अशीच परस्थिती राहिली तर संत्रा पीकच नष्ट होईल याची धास्ती शेतकऱ्यांना आहे.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.